शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे आपल्याकडील मंदिरांचे पावित्र्य जपायचे असेल तर मूर्तीस्पर्श टाळायला हवा; शास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:59 IST

मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजवल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर उपचारांखेरीज अन्यवेळी कोणीही स्पर्श न करणे हेच योग्य ठरते.

हिंदू धर्म व त्याचे पंथोपपंथ यामध्ये कुठेही देवमूर्तीस्पर्शन हा विधी दिलेला नाही. 'दर्शनमात्रे मनकामना पूर्ती', 'साधकांचा मायबाप', दरूशने हरी ताप' इ. प्राकृत वचनातदेखील देवाचे दर्शन हेच ग्राह्य आहे. स्पर्शनाचा मात्र सर्वचदृष्ट्या निषेध आहे. कारण एकाच मूर्तीला सतत सर्वांनी हस्तस्पर्श किंवा मस्तकस्पर्श होऊन मूर्तीची झीज होऊन मूर्तीची हानी होऊ शकते. शिवाय सततच्या हस्तस्पर्शाने मूर्तीची बैठक ढीली होऊ शकते. 

मनुष्याने घडवलेल्या पाषाण मूर्ती मानवी हस्तस्पर्शानी लवकर झिजतातच पण वाळूपासून बनलेल्या (ज्यांना स्वयंभू म्हणतात) अशा मूर्तीदेखील काही शतकांनी झिजतात. शालग्रामशिलेतून घडवलेल्या मूर्ती व बाणलिंगाची झीज कमी असली तरी त्यांना सातत्याने हस्तस्पर्श होत गेल्यास कालांतराने त्याच्यावरही परिणाम होतो. तसेच देवमुर्ती स्पर्श करण्यात शुचिर्भूतपणाचा अभाव असल्यास तोही समर्थनीय ठरत नाही.

देवमूर्तीस हस्तस्पर्श करण्याचा दुराग्रह बाळगणे म्हणजे निखळ परमार्थतत्त्वापासून भरकटत जाण्यासारखे आहे. पण या अज्ञानमुलक श्रद्ध्येस इलाज नाही. आधुनिक काळात दूरदर्शन संचापासून दूर राहून त्याचा आनंद घ्यावा असे सांगितले तर लगेच पटते. पण स्पर्श करून देवदर्शनाची प्रथा असणाऱ्या मंदिरात दुरूनच दर्शन घेण्याची प्रथा मनाला भावत नाही. कारण आजपर्यंत शास्त्रार्थ सांगून तशी हाकाटी प्रकर्षाने कुणीही केलेली नाही. ज्यांनी देवस्पर्शनाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा धिक्कार करण्यात आला. 'श्रद्धेला तडा जातो' या नावाखाली काही मूर्तींना आवर्जून स्पर्श करण्याची अयोग्य प्रथा अद्यापही चालू आहे. 

मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजवल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर उपचारांखेरीज अन्यवेळी कोणीही स्पर्श न करणे हेच योग्य ठरते. ज्या मंदिरातील गर्भागारात विद्युत्प्रकाशाऐवजी केवळ तेलतुपाचे नंदादीप असतात व ज्यांचे दर्शन पुरेशा अंतरावरून घेतले जाते.  त्या मूर्तीतील तेज विशेषत्वाने भावल्यामुळे त्या देवेतेविषयी श्रद्धाभाव अधिकाधिक दृढ होत जातो. दक्षिण भारतातील बहुसंख्य देवस्थानांमध्ये उपरोक्त पद्धतीने दर्शन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मंदिरातील मूर्तीस दर्शन घेण्याचा आग्रह न धरणे अत्यंत अगत्याचे ठरते.