शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे आपल्याकडील मंदिरांचे पावित्र्य जपायचे असेल तर मूर्तीस्पर्श टाळायला हवा; शास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:59 IST

मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजवल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर उपचारांखेरीज अन्यवेळी कोणीही स्पर्श न करणे हेच योग्य ठरते.

हिंदू धर्म व त्याचे पंथोपपंथ यामध्ये कुठेही देवमूर्तीस्पर्शन हा विधी दिलेला नाही. 'दर्शनमात्रे मनकामना पूर्ती', 'साधकांचा मायबाप', दरूशने हरी ताप' इ. प्राकृत वचनातदेखील देवाचे दर्शन हेच ग्राह्य आहे. स्पर्शनाचा मात्र सर्वचदृष्ट्या निषेध आहे. कारण एकाच मूर्तीला सतत सर्वांनी हस्तस्पर्श किंवा मस्तकस्पर्श होऊन मूर्तीची झीज होऊन मूर्तीची हानी होऊ शकते. शिवाय सततच्या हस्तस्पर्शाने मूर्तीची बैठक ढीली होऊ शकते. 

मनुष्याने घडवलेल्या पाषाण मूर्ती मानवी हस्तस्पर्शानी लवकर झिजतातच पण वाळूपासून बनलेल्या (ज्यांना स्वयंभू म्हणतात) अशा मूर्तीदेखील काही शतकांनी झिजतात. शालग्रामशिलेतून घडवलेल्या मूर्ती व बाणलिंगाची झीज कमी असली तरी त्यांना सातत्याने हस्तस्पर्श होत गेल्यास कालांतराने त्याच्यावरही परिणाम होतो. तसेच देवमुर्ती स्पर्श करण्यात शुचिर्भूतपणाचा अभाव असल्यास तोही समर्थनीय ठरत नाही.

देवमूर्तीस हस्तस्पर्श करण्याचा दुराग्रह बाळगणे म्हणजे निखळ परमार्थतत्त्वापासून भरकटत जाण्यासारखे आहे. पण या अज्ञानमुलक श्रद्ध्येस इलाज नाही. आधुनिक काळात दूरदर्शन संचापासून दूर राहून त्याचा आनंद घ्यावा असे सांगितले तर लगेच पटते. पण स्पर्श करून देवदर्शनाची प्रथा असणाऱ्या मंदिरात दुरूनच दर्शन घेण्याची प्रथा मनाला भावत नाही. कारण आजपर्यंत शास्त्रार्थ सांगून तशी हाकाटी प्रकर्षाने कुणीही केलेली नाही. ज्यांनी देवस्पर्शनाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा धिक्कार करण्यात आला. 'श्रद्धेला तडा जातो' या नावाखाली काही मूर्तींना आवर्जून स्पर्श करण्याची अयोग्य प्रथा अद्यापही चालू आहे. 

मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजवल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर उपचारांखेरीज अन्यवेळी कोणीही स्पर्श न करणे हेच योग्य ठरते. ज्या मंदिरातील गर्भागारात विद्युत्प्रकाशाऐवजी केवळ तेलतुपाचे नंदादीप असतात व ज्यांचे दर्शन पुरेशा अंतरावरून घेतले जाते.  त्या मूर्तीतील तेज विशेषत्वाने भावल्यामुळे त्या देवेतेविषयी श्रद्धाभाव अधिकाधिक दृढ होत जातो. दक्षिण भारतातील बहुसंख्य देवस्थानांमध्ये उपरोक्त पद्धतीने दर्शन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मंदिरातील मूर्तीस दर्शन घेण्याचा आग्रह न धरणे अत्यंत अगत्याचे ठरते.