शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

तारक मंत्राचे पहिले दोन शब्द समजून घेतले, तर उभ्या आयुष्यात कसलीही भीती राहणार नाही!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 4, 2021 18:00 IST

अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास.

स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आपल्या सर्वांना मुखोद्गत आहे. परंतु तो केवळ म्हणून भागणार नाही, तो समजून म्हटला पाहिजे. वास्तविक पाहता सर्व स्तोत्रांचे सार काव्याच्या शेवटी असते. परंतु, स्वामींच्या तारक मंत्रात सुरवातीलाच स्तोत्राचे सार वाचता येते. तेही अवघ्या दोन शब्दांत!

ते दोन शब्द कोणते? तर... नि:शंक हो... निर्भय हो मना रे...!

अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. 

प्रश्न असा, की हा विश्वास आपण देवावर दाखवतो का? माझा देवावर विश्वास आहे, हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात विश्वास दाखवणं वेगळं. 

एकदा स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या पत्नीबरोबर नावेतून प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना नाव नदीच्या मध्यापर्यंत पोहोचली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, मी तुला या नदीत ढकलून दिले, तर कोणीच तुला वाचवू शकणार नाही. 

हे ऐकून शारदा माता हसल्या. 

रामकृष्ण म्हणाले, तुला जीवे मारण्याची मी धमकी देतोय आणि तू हसतेय?

यावर शारदा माता म्हणाल्या, तुम्ही तसे करणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. जर मला तुमच्या वागणुकीबद्दल शंका वाटत नाही, तर भीती कुठून वाटणार?

याला म्हणतात अतूट विश्वास. असा विश्वास नात्यांमध्ये आणि भक्त भगवंतामध्ये निर्माण झाला, की आपोआप प्रचिती येते... प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!