शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

तारक मंत्राचे पहिले दोन शब्द समजून घेतले, तर उभ्या आयुष्यात कसलीही भीती राहणार नाही!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 4, 2021 18:00 IST

अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास.

स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आपल्या सर्वांना मुखोद्गत आहे. परंतु तो केवळ म्हणून भागणार नाही, तो समजून म्हटला पाहिजे. वास्तविक पाहता सर्व स्तोत्रांचे सार काव्याच्या शेवटी असते. परंतु, स्वामींच्या तारक मंत्रात सुरवातीलाच स्तोत्राचे सार वाचता येते. तेही अवघ्या दोन शब्दांत!

ते दोन शब्द कोणते? तर... नि:शंक हो... निर्भय हो मना रे...!

अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. 

प्रश्न असा, की हा विश्वास आपण देवावर दाखवतो का? माझा देवावर विश्वास आहे, हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात विश्वास दाखवणं वेगळं. 

एकदा स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या पत्नीबरोबर नावेतून प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना नाव नदीच्या मध्यापर्यंत पोहोचली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, मी तुला या नदीत ढकलून दिले, तर कोणीच तुला वाचवू शकणार नाही. 

हे ऐकून शारदा माता हसल्या. 

रामकृष्ण म्हणाले, तुला जीवे मारण्याची मी धमकी देतोय आणि तू हसतेय?

यावर शारदा माता म्हणाल्या, तुम्ही तसे करणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. जर मला तुमच्या वागणुकीबद्दल शंका वाटत नाही, तर भीती कुठून वाटणार?

याला म्हणतात अतूट विश्वास. असा विश्वास नात्यांमध्ये आणि भक्त भगवंतामध्ये निर्माण झाला, की आपोआप प्रचिती येते... प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!