शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी; पण....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:32 IST

देवाने आपल्याला सर्वतोपरी सक्षम बनवलेले असताना दुसऱ्यावर विसंबून का राहावे?

शीर्षकात लिहिलेली म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे आणि तिचा अर्थही आपल्याला माहित आहे. ज्याने चोच दिली तो चारा देतोच, याबद्दल दुमत नाही. परंतु चारा मिळवण्याची क्षमताही त्याने दिलेली असताना आयता चारा मिळण्याची वाट पाहत बसणे कसे चुकीचे ठरू शकते, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही सुंदर गोष्ट.

एक विरक्त माणूस संसारसुखाचा त्याग करून अरण्यात राहायला गेला होता. तिथे त्याने झोपडीवजा घर बांधले होते. पोटापाण्यापुरते तो जवळच्या गावात जाऊन माधुकरी मागत असे आणि जे धान्य मिळेल ते शिजवून उदर निर्वाह करत असे. अरण्यातल्या प्राणी-मात्रांची, त्यांच्या सवयींची त्याला ओळख झालेली होती. स्व-संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे एव्हाना त्याच्या अंगवळणी पडले होते. एक दिवस माधुकरी मागून तो झोपडीत परतत असताना काही अंतरावर त्याला पायाने अधू असलेला लांडगा दिसला. त्याच वेळेस माकडं या झाडावरून त्या झाडावर अस्वस्थतेने धावू लागली. हे चिन्ह होते वाघोबाच्या आगमनाचे. सवयीप्रमाणे तो माणूस एका झाडावर जाऊन बसला. त्याला लांडग्याची दया येत होती. आज त्याची शिकार होणार असेही त्याला वाटले. 

दूरून पाहिल्यावर कळले, की वाघाच्या तोंडात आधीच हरणाचे पाडस होते. वाघोबाच्या भूकेची सोय झालेली असल्यामुळे तो आणखी एक शिकार करेल, असे वाटत तरी नव्हते. वाघोबाने लांडग्याजवळ येऊन पाडसाच्या कोवळ्या मांसाचा एक तुकडा लांडग्याला खाऊ दिला आणि स्वत: उरलेले मांस मिटक्या मारत खाऊ लागला. 

हे दृष्य पाहणाऱ्या माणसाला कुतूहल वाटले. त्याने देवाचे आभार मानले. देवाप्रती त्याचा विश्वास अधिकच दृढ झाला. तो मनोमन म्हणाला, `देव सगळ्यांची योग्य सोय लावून देतो, हेच खरे.'

या विचाराने प्रेरणा घेत त्याने दुसऱ्या दिवसापासून माधुकरी मागणे सोडून दिले. तो देवाला म्हणाला, तू जर वाघ बनून अपंग लांडग्याच्या जेवणाची सोय करू शकतोस, तर माझी पण सोय तूच लावून दे. तू नक्की मदतीला धावून येशील याची खात्री आहे.

असे म्हणत त्या माणसाने जवळपास पंधरा दिवस काहीच खाल्ले नाही. देवाने मात्र त्याला काही दिले नाही. तो अशक्त झाला. देवाच्या नावाने शंख करू लागला. त्याचवेळेस एक साधू महाराज तिथून जात होते. त्यांनी त्या माणसाची चौकशी केली. माणसाने सगळी परिस्थिती कथन केली. त्यावर साधू महाराज म्हणाले, `अरे वेड्या, देव सर्वांची सोय करतो, हे खरे आहे. पण तू हे आजमावण्यासाठी स्वत:ला लांडग्यासारखे अपंग बनवलेस, याउलट देवाने तुला वाघासारखे कणखर बनवले आहे, हे मात्र तू विसरलास. तुझ्यामध्ये वाघासारखी स्वत:चे आणि दुसऱ्याचे पोट भरण्याची क्षमता असताना, तू मात्र आयते जेवण मिळण्याची वाट बघत बसलास. त्यामुळे उठ, मेहनत कर, स्वत:ला आणि इतरांना मदत कर. त्यांच्या अडीअचणीला धावून जा. तसे करण्याची युक्ती आणि शक्ती भगवंतच देईल. ती संधी गमवू नकोस आणि आयते काही मिळेल याची वाट बघू नकोस.