शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी; पण....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:32 IST

देवाने आपल्याला सर्वतोपरी सक्षम बनवलेले असताना दुसऱ्यावर विसंबून का राहावे?

शीर्षकात लिहिलेली म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे आणि तिचा अर्थही आपल्याला माहित आहे. ज्याने चोच दिली तो चारा देतोच, याबद्दल दुमत नाही. परंतु चारा मिळवण्याची क्षमताही त्याने दिलेली असताना आयता चारा मिळण्याची वाट पाहत बसणे कसे चुकीचे ठरू शकते, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही सुंदर गोष्ट.

एक विरक्त माणूस संसारसुखाचा त्याग करून अरण्यात राहायला गेला होता. तिथे त्याने झोपडीवजा घर बांधले होते. पोटापाण्यापुरते तो जवळच्या गावात जाऊन माधुकरी मागत असे आणि जे धान्य मिळेल ते शिजवून उदर निर्वाह करत असे. अरण्यातल्या प्राणी-मात्रांची, त्यांच्या सवयींची त्याला ओळख झालेली होती. स्व-संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे एव्हाना त्याच्या अंगवळणी पडले होते. एक दिवस माधुकरी मागून तो झोपडीत परतत असताना काही अंतरावर त्याला पायाने अधू असलेला लांडगा दिसला. त्याच वेळेस माकडं या झाडावरून त्या झाडावर अस्वस्थतेने धावू लागली. हे चिन्ह होते वाघोबाच्या आगमनाचे. सवयीप्रमाणे तो माणूस एका झाडावर जाऊन बसला. त्याला लांडग्याची दया येत होती. आज त्याची शिकार होणार असेही त्याला वाटले. 

दूरून पाहिल्यावर कळले, की वाघाच्या तोंडात आधीच हरणाचे पाडस होते. वाघोबाच्या भूकेची सोय झालेली असल्यामुळे तो आणखी एक शिकार करेल, असे वाटत तरी नव्हते. वाघोबाने लांडग्याजवळ येऊन पाडसाच्या कोवळ्या मांसाचा एक तुकडा लांडग्याला खाऊ दिला आणि स्वत: उरलेले मांस मिटक्या मारत खाऊ लागला. 

हे दृष्य पाहणाऱ्या माणसाला कुतूहल वाटले. त्याने देवाचे आभार मानले. देवाप्रती त्याचा विश्वास अधिकच दृढ झाला. तो मनोमन म्हणाला, `देव सगळ्यांची योग्य सोय लावून देतो, हेच खरे.'

या विचाराने प्रेरणा घेत त्याने दुसऱ्या दिवसापासून माधुकरी मागणे सोडून दिले. तो देवाला म्हणाला, तू जर वाघ बनून अपंग लांडग्याच्या जेवणाची सोय करू शकतोस, तर माझी पण सोय तूच लावून दे. तू नक्की मदतीला धावून येशील याची खात्री आहे.

असे म्हणत त्या माणसाने जवळपास पंधरा दिवस काहीच खाल्ले नाही. देवाने मात्र त्याला काही दिले नाही. तो अशक्त झाला. देवाच्या नावाने शंख करू लागला. त्याचवेळेस एक साधू महाराज तिथून जात होते. त्यांनी त्या माणसाची चौकशी केली. माणसाने सगळी परिस्थिती कथन केली. त्यावर साधू महाराज म्हणाले, `अरे वेड्या, देव सर्वांची सोय करतो, हे खरे आहे. पण तू हे आजमावण्यासाठी स्वत:ला लांडग्यासारखे अपंग बनवलेस, याउलट देवाने तुला वाघासारखे कणखर बनवले आहे, हे मात्र तू विसरलास. तुझ्यामध्ये वाघासारखी स्वत:चे आणि दुसऱ्याचे पोट भरण्याची क्षमता असताना, तू मात्र आयते जेवण मिळण्याची वाट बघत बसलास. त्यामुळे उठ, मेहनत कर, स्वत:ला आणि इतरांना मदत कर. त्यांच्या अडीअचणीला धावून जा. तसे करण्याची युक्ती आणि शक्ती भगवंतच देईल. ती संधी गमवू नकोस आणि आयते काही मिळेल याची वाट बघू नकोस.