शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

प्रयत्नाला सातत्याची जोड असेल, तर काम झालंच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 15:45 IST

स्वप्नांच्या दिशेने टाकलेली पावले मागे घेऊ नका. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस प्रयत्नांना यश नक्की मिळेल. 

आपल्यापैकी अनेक जण आरंभशूर असतात. म्हणजे सुरुवातीला जोश, कामाचा उत्साह दाखवणारे. पण हा उत्साह टिकवता आला, तर ठीक अन्यथा टप्प्याटप्प्यात केलेली मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून यशाचे सूत्र हेच आहे, की यश मिळवण्यासाठी प्रयत्न योग्य दिशेने करा आणि सातत्याने करा. पुढील गोष्ट वाचल्यावर प्रयत्नाला सातत्याची जोड का हवी, हे आपल्यालाही पटेल!

एका गावात पुढील बारा वर्षे दुष्काळ पडणार, असे ज्योतिषांनी भाकीत केले. शेतीकामावर अवलंबून असलेले गावकरी नुसते भाकीत ऐकून गाव सोडून जाऊ लागले. मात्र एका शेतकऱ्याने गाव न सोडण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी आणि त्याच्या घरच्यांनीदेखील त्याला वेड्यात काढले. मात्र तो आपल्या निर्णयापासून ढळला नाही. उलट त्याने दरदिवशी शेतावर जाऊन काम करण्यास सुरुवात केली. 

महिना-दोन महिने त्याचे काम सातत्याने सुरू होते. ते पाहून वर आकाशात एक छोटासा ढग आला. त्याने त्या शेतकऱ्याला हटकले आणि विचारले, 'काय रे, ज्योतिषांनी भाकीत वर्तवूनही तू इथे मेहेनत करत बसला आहेस? यावर शेतकरी म्हणाला, 'दुसरीकडे जाऊन बेरोजगार बसण्यापेक्षा आपण आपल्या शेतात राबत राहावं. उद्या देवाच्या कृपेने पाऊस आला, तर माझी जमीन किमान नांगरलेली असेल. पण तेव्हा जर मी काहीच केलेले नसेल, तर पाऊस पडूनही ते पाणी वाहून जाईल. शिवाय माझ्या कामात खंड पडल्याने मी माझे काम विसरेन किंवा कामाची गुणवत्ता घसरेल. म्हणून मी माझे काम सुरू ठेवले आहे.'

हे ऐकून छोटासा ढग विचारात पडला. तो म्हणाला, 'शेतकऱ्याच्या बोलण्यात तथ्य आहे. त्याच्याप्रमाणे मी बरसण्याचे थांबलो तर मी सुद्धा माझे काम विसरणार तर नाही ना? असे म्हणत त्याने आपल्या मित्रांना गोळा केले आणि पाऊस पाडायला सुरुवात केली. वर ढग आणि खाली शेतकरी खुश झाला. 

मात्र ज्यांनी भविष्याच्या काळजीने आज मेहनत घेणे सोडून दिले होते, त्यांचे नुकसान झाले आणि त्यांना आपले काम सोडल्याचा पश्चात्ताप झाला. 

असा पश्चात्ताप आपल्याला होऊ नये असे वाटत असेल, तर स्वप्नांच्या दिशेने टाकलेली पावले मागे घेऊ नका. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस प्रयत्नांना यश नक्की मिळेल.