शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

प्रयत्न  प्रामाणिक असतील तर देव कसलीही उणीव पडू देत नाही; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 10:35 IST

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यात कसूर न करता आपण आपली कर्तव्य पूर्ती करायची. बाकी कर्माचा हिशोब ठेवायला तो वर बसला आहे ना!

हिंदीत एक वाक्य वाचले होते, 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता।' या एका वाक्यात वास्तव एकवटून आले आहे. ते समजून घेतले, तर आपण अकारण करत असलेली धडपड,चढाओढ, मनःस्ताप या सगळ्या गोष्टीतून क्षणार्धात मुक्ती मिळेल. जे नशिबात आहे, ते कोणीही आपल्याकडून घेऊ शकत नाही आणि जे नशिबात नाही, ते कितीही आपल्याला मिळाले, तरी टिकत नाही. म्हणून प्रयत्न थांबवायचे का? तर नाही. फक्त प्रयत्नांती परमेश्वर मानून आपल्या कामात समाधान मानायचे. 

एक तरुण फळ विक्रेता बाजारात आपली फळाची गाडी लावून जात असे. त्याच्या गाडीवर एक फलक लिहिलेला होता. माझी आई आजारी असल्यामुळे अध्ये मध्ये मला घरी जावे लागते. मी गाडीवर नसेन तेव्हा फळांचा लिहिलेला दर पाहून आपण फळे खरेदी करावीत आणि कोपऱ्यात ठेवलेल्या पाकिटात पैसे ठेवून जावे. 

एका माणसाला तो फलक पाहून आश्चर्य वाटले. त्याने फळे विकत घेतली आणि फळांचा दर पाहून रक्कम पाकिटात ठेवली. त्यात आणखीही पैसे होते. ते पाहून माणसाला आणखीनच आश्चर्य वाटले. आज काहीही झाले तरी त्या फळ विक्रेत्याची भेट घेऊनच जायचे, असे त्या माणसाने ठरवून टाकले. 

दिवस मावळतीला झुकला. गाडीवरील फळे संपत आली होती. तरीही विक्रेत्याचा पत्ता नव्हता. वाट पाहणारा माणूस निराश झाला. तेवढ्यात एक जण गाडीवरील फलक बंद करून गाडी घेऊन जायला निघाला. हाच तो फळ विक्रेता असावा. अशा विचाराने त्या माणसाने फळ विक्रेत्याला गाठले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. 'आजच्या फसव्या जगात तू हा पर्याय कसा काय निवडलास?' , 'तुला नुकसान झाले नाही का?', 'पैसे किंवा फळे कोणी फुकट घेऊन गेले नाही का?', 'तुला शक्य नव्हते तर दुसऱ्या कुणाला तू उभे का करत नाही?' वगैरे वगैरे... 

त्याची उत्सुकता शमवताना फळ विक्रेता म्हणाला, 'साहेब, फलकावर मी लिहिले आहे की अध्ये मध्ये मी घरी जातो. पण वास्तविक पाहता मी सकाळी गाडी लावून जातो ते थेट संध्याकाळी गाडी न्यायला परत येतो. माझ्या आईची तब्येत एवढी खराब आहे, की सतत तिच्या जवळ कोणी तरी थांबावेच लागते. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय जगात कोणीही नाही. फळविक्री शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. तेव्हा आईनेच मला हा पर्याय सुचवला. मला म्हणाली, देवावर विश्वास ठेव आणि फलक लावून रोज गाडी सुरु ठेव. जेवढं आपल्या नशिबात आहे, तेवढं आपल्याला नक्की मिळेल. मी तसे करून पाहिले. गेली अडीच वर्षे मी हे नित्यनेमाने करत आहे, परंतु अजूनपर्यंत मला एका रुपयाचेही नुकसान झाले नाही. उलट कोणी आईसाठी औषध ठेवून जातं, कोणी फुलं. कोणी सदिच्छा तर कोणी आशीर्वाद. याउपर ज्यांनी फुकट नेले, त्याची मी मोजदाद ठेवलीच नाही. जे नशिबात नाही, त्याची काय चिंता करायची.

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यात कसूर न करता आपण आपली कर्तव्य पूर्ती करायची. बाकी कर्माचा हिशोब ठेवायला तो वर बसला आहे ना. तो काही कमी पडू देणार नाही. हा विश्वास ठेवायचा.