शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्न  प्रामाणिक असतील तर देव कसलीही उणीव पडू देत नाही; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 10:35 IST

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यात कसूर न करता आपण आपली कर्तव्य पूर्ती करायची. बाकी कर्माचा हिशोब ठेवायला तो वर बसला आहे ना!

हिंदीत एक वाक्य वाचले होते, 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता।' या एका वाक्यात वास्तव एकवटून आले आहे. ते समजून घेतले, तर आपण अकारण करत असलेली धडपड,चढाओढ, मनःस्ताप या सगळ्या गोष्टीतून क्षणार्धात मुक्ती मिळेल. जे नशिबात आहे, ते कोणीही आपल्याकडून घेऊ शकत नाही आणि जे नशिबात नाही, ते कितीही आपल्याला मिळाले, तरी टिकत नाही. म्हणून प्रयत्न थांबवायचे का? तर नाही. फक्त प्रयत्नांती परमेश्वर मानून आपल्या कामात समाधान मानायचे. 

एक तरुण फळ विक्रेता बाजारात आपली फळाची गाडी लावून जात असे. त्याच्या गाडीवर एक फलक लिहिलेला होता. माझी आई आजारी असल्यामुळे अध्ये मध्ये मला घरी जावे लागते. मी गाडीवर नसेन तेव्हा फळांचा लिहिलेला दर पाहून आपण फळे खरेदी करावीत आणि कोपऱ्यात ठेवलेल्या पाकिटात पैसे ठेवून जावे. 

एका माणसाला तो फलक पाहून आश्चर्य वाटले. त्याने फळे विकत घेतली आणि फळांचा दर पाहून रक्कम पाकिटात ठेवली. त्यात आणखीही पैसे होते. ते पाहून माणसाला आणखीनच आश्चर्य वाटले. आज काहीही झाले तरी त्या फळ विक्रेत्याची भेट घेऊनच जायचे, असे त्या माणसाने ठरवून टाकले. 

दिवस मावळतीला झुकला. गाडीवरील फळे संपत आली होती. तरीही विक्रेत्याचा पत्ता नव्हता. वाट पाहणारा माणूस निराश झाला. तेवढ्यात एक जण गाडीवरील फलक बंद करून गाडी घेऊन जायला निघाला. हाच तो फळ विक्रेता असावा. अशा विचाराने त्या माणसाने फळ विक्रेत्याला गाठले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. 'आजच्या फसव्या जगात तू हा पर्याय कसा काय निवडलास?' , 'तुला नुकसान झाले नाही का?', 'पैसे किंवा फळे कोणी फुकट घेऊन गेले नाही का?', 'तुला शक्य नव्हते तर दुसऱ्या कुणाला तू उभे का करत नाही?' वगैरे वगैरे... 

त्याची उत्सुकता शमवताना फळ विक्रेता म्हणाला, 'साहेब, फलकावर मी लिहिले आहे की अध्ये मध्ये मी घरी जातो. पण वास्तविक पाहता मी सकाळी गाडी लावून जातो ते थेट संध्याकाळी गाडी न्यायला परत येतो. माझ्या आईची तब्येत एवढी खराब आहे, की सतत तिच्या जवळ कोणी तरी थांबावेच लागते. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय जगात कोणीही नाही. फळविक्री शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. तेव्हा आईनेच मला हा पर्याय सुचवला. मला म्हणाली, देवावर विश्वास ठेव आणि फलक लावून रोज गाडी सुरु ठेव. जेवढं आपल्या नशिबात आहे, तेवढं आपल्याला नक्की मिळेल. मी तसे करून पाहिले. गेली अडीच वर्षे मी हे नित्यनेमाने करत आहे, परंतु अजूनपर्यंत मला एका रुपयाचेही नुकसान झाले नाही. उलट कोणी आईसाठी औषध ठेवून जातं, कोणी फुलं. कोणी सदिच्छा तर कोणी आशीर्वाद. याउपर ज्यांनी फुकट नेले, त्याची मी मोजदाद ठेवलीच नाही. जे नशिबात नाही, त्याची काय चिंता करायची.

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यात कसूर न करता आपण आपली कर्तव्य पूर्ती करायची. बाकी कर्माचा हिशोब ठेवायला तो वर बसला आहे ना. तो काही कमी पडू देणार नाही. हा विश्वास ठेवायचा.