शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

प्रियजनांचे तेरावे, वर्षश्राद्ध नियोजित वेळेत राहून गेले असेल तर विष्णुपुराणात दिलेले पर्याय वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:19 IST

हिंदू धर्म अत्यंत लवचिक आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत, मात्र ते शोधण्याची आणि करण्याची तयारी हवी!

'न भूतो न भविष्यति' अशी परिस्थिती कोरोनाने जगाला दाखवून दिली. अनेकांचे प्रियजन त्याने हिरावून घेतले. कित्येकांना तर प्रियजनांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली. मृत्यूपूर्वी एवढ्या यातना भोगलेल्या जीवाला निदान मृत्यूपश्चात तरी सद्गती लाभावी, म्हणून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे दहावे, बारावे, तेरावे, वर्षश्राद्ध करावे, असे सांगितले जाते. अनेकांना तर कोरोना काळात तेही करता आले नाही. यावर पर्याय तरी काय? शास्त्रात, पुराणात अशा प्रतिकूल परिस्थितीवरही तोडगे निश्चित असले पाहिजेत. ते उपाय, पर्याय कोणते, ते जाणून घेऊया.

'श्रद्धया इदं श्राद्धम्' म्हणजेच श्रद्धेने केले जाते त्याला श्राद्ध असे म्हणतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. प्रेतश्राद्ध, पितृश्राद्ध, एकोद्दिष्टश्राद्ध, पार्वणश्राद्ध याशिवाय स्थलकालानुसार नैमित्तिक प्रसंगीदेखील श्राद्ध केली जातात. त्यात तीर्थस्थानी तीर्थश्राद्ध, यात्रानिमित्तक घृतश्राद्ध व दधिश्राद्ध आणि पर्वकालीन पर्वश्राद्ध यांचा समावेश होतो. 

परंतु, जेव्हा श्राद्धविधी करण्यात काही अडचणी येतात, जसे की आर्थिक दुर्बलता, ब्राह्मणाची अनुपलब्धी, जागेचा अभाव किंवा कोरोनाजन्य परिस्थिती, अशा वेळी श्राद्ध करायची इच्छा असूनही पर्याय सापडत नाही. त्यासाठी शास्त्रात म्हटले आहे- `तस्माच्छ्राद्धं नरो भक्त्या शाकैरपि यथाविधी' म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या नावे तेरा दिवस हिरव्या भाज्या गायीला खाऊ घालाव्यात. 

तेही शक्य नसेल तर, विष्णुपुराणात सांगितले आहे, दक्षिण दिशेकडे तोंड करावे व पुढील प्रार्थना करावी-

न मे अस्ति वित्तं, न धनं न चान्यत्श्राद्धोपयोगी स्वपितृन नतोऽस्मि,तृप्यन्तु भत्तäया पितरो मयैते,भुजौ कुतौ वत्र्मनि मारुतस्य।

माझ्याजवळ द्रव्य नाही, धन नाही, श्राद्धाला उपयुक्त अशा अन्य वस्तूही नाहीत. किंवा या वस्तू उपलब्ध असूनही ते दान करावे अशी परिस्थिती नाही. पण मी मनोभावे आपल्या पितरांना नमस्कार करत आहे. माझ्या या भक्तीने माझे सर्व पितर संतुष्ट होवोत. यास्तव मी वाऱ्याच्या दिशेने मुख करून माझे दोन्ही हात वर केले आहेत.

असे म्हणून दोन्ही हात वर करावेत व पितरांना आपली असमर्थता पोचती करावी. त्या पूर्वजांचे ऋण मनी बाळगून त्यांच्या निधनतिथींना त्यांचे स्मरण करावे आणि कृतज्ञता बाळगावी. गेलेल्या व्यक्तीसाठी दक्षिण दिशेला तेरा दिवस तेलाचा दिवा लावून दीपदान करावे.

या सर्व गोष्टींसाठी मनात पितरांविषयी श्रद्धा असणे ही मूलभूत अत्यावश्यक बाब असून त्यांना उद्देशून येणाऱ्या  श्राद्धकर्मासाठी प्राप्त परिस्थितीला अनुसरून शास्त्राने उपरोक्त अनुकल्प म्हणजे पर्याय दिले आहेत. त्याचा केवळ संकटकाळीच अवलंब करावा. इतर वेळी शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध घालावे.