शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

कोणी तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्याशी कसे वागावे, हे 'या' श्लोकातून शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 08:00 IST

जशास तसे वागलो तरच या जगात आपला निभाव लागेल अन्यथा...

बालपणी आपण खेळ खेळायचो तो आठवतो का? 'कुणीही यावे टपली मारून जावे...' ज्याच्यावर राज्य, त्याचे डोळे रुमालाने बंद असत आणि बाकीचे गडी येऊन टपली मारून जात असत. मारणाऱ्याच्या आवाजाने, स्पर्शाने, हसण्याने तो कोण आहे, हे ओळखायचे. या खेळात राज्य घेणारा खेळाडू रडकुंडीला येत आणि बाकीचे खेळाडू हात धुवून घेत असत. बालपण संपले, पण आजही आपल्याशी हा खेळ अनेकदा खेळला जातो. कोणीही येतो, आपल्याला अपशब्द बोलून जातो, दोषी ठरवतो, सल्ले देतो, अपमान करतो, फसवतो. हे आपल्याशी का घडते? याचे एका श्लोकात वर्णन केले आहे... 

नात्यन्तं सरलै: भाव्यं, पश्य गत्वा वनस्थलीमछिद्यन्ते सरला: तत्र, कुब्जा तिष्ठन्ति पङगुवत।।

फार सरळपणाने कुणी वागू नये. वनातून फेरफटका मारून पाहा. सरळसोट झाडांना कापून नेतात. वेडीवाकडी झाडे तशीच ठेवतात. असा या श्लोकाचा मतितार्थ आहे. अत्यंत सरळ वृत्ती म्हणजेच भोळीसांब वृत्ती कधीही नसावी. अशा लेकांना जग फसवते. ठकासी असावे ठक, उद्धटासी उद्धट! असाच व्यवहार ठेवावा.

वास्को द गामा पोर्तुगालहून भारतात आला. कालिकतचा राजा झामोरीन याने त्याचे स्वागत केले. पुढल्या वारीला वास्को द गामाने  बंदुका आणल्या. झामोरीनला पकडून त्याने त्याच्या मुस्काटीत मारली. पोर्तुगिजांनी भारतात पहिले पाऊल टाकले, ते असे! 

आपण गुलामीत १००० वर्षे काढली याला कारणही आपली  कमालीची सरळ वृत्ती! त्याचे फलित म्हणजे वर्षानुवर्षे पत्करलेली गुलामगिरी! स्वातंत्र्य मिळाले, परंतु अजुनही आपली पारतंत्र्याकडे वाटचाल सुरू आहे. संस्कृतीचे अतिक्रमण असो किंवा आचार विचारांचे! अशामुळे दडपशाहीचे साम्राज्य सुरू होते. 

याबाबतीत लोकमान्य टिळकांचा शाळेतला प्रसंग आठवतो. वर्गातल्या मुलांनी शेंगा खाऊन टरफले टाकली. शिक्षकांनी एकेकाला कान धरून जाब विचारला. कोणीच कबुली देत नाही म्हटल्यावर सरळ स्वभावाच्या लोकमान्य टिळकांना उभे केले. त्यांच्याकडूनही उत्तर येत नाही म्हटल्यावर टरफले उचलण्याची शिक्षा सुनावली. बाकीचे वर्गमित्र गालातल्या गालात हसू लागले. तेव्हा लोकमान्यांनी बाणेदारपणे उत्तर दिले, `मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचणार नाही.' शिक्षकांच्या दृष्टीने तो उर्मटपणा ठरला असेल, परंतु हा स्वाभिमान त्यांनी स्वराज्याच्या वेळेस दाखवत ब्रिटीशांना खडसावून सांगितले, 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!'

सत्याला स्वाभिमानाची जोड मिळाली की त्याचे तेज आपोआप झळकू लागते. यासाठी सत्याची कास धरावी, म्हणजे निर्भिडपणा आपोआप अंगी बाणला जातो. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्याचा मार्ग अनुसरूया. स्वभावात सरळपणा असला तरी हरकत नाही, परंतु त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही, याबद्दल सजग राहूया.