शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते; परंतु त्याचबरोबर... 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 2, 2021 08:00 IST

आताच्या काळात नुसते अंगारकी व्रत करून भागणार नाही, तर सोबतच गणरायाचे गुणही अंगिकारावे लागतील.

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! ह्या एकमेव दैवतासाठी समस्त मंडळीr  भाविक होतात आणि भावुकही होतात. `बाप्पा साठी काही पण' असा गणेशभक्तांचा पवित्रा असतो. काही जण मंगळवारचा किंवा संकष्टीचा उपास करतात, तर काही जण नियमितपणे गणपती मंदिरात जातात. मात्र हे ज्यांना शक्य होत नाही ते आवर्जून  'अंगारकी चतुर्थी'चा उपास करतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र आताच्या काळात नुसते अंगारकी व्रत करून भागणार नाही, तर सोबतच गणरायाचे गुणही अंगिकारावे लागतील.

महाभारताच्या लिखाणात चुका होऊ नयेत म्हणून महर्षी व्यासांनी गणरायाची निवड केली. कारण तो उत्तम लेखनिक होता. म्हणजे व्याकरणाच्या बाबतीतही तो किती काटेकोर असेल, ह्याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यासारखेच आपणही भाषाशुद्धीबाबत आग्रही असले पाहिजे. मात्र आपण गणपतीची आरती म्हणताना बेधडकपणे `संकटी पावावे' ऐवजी `संकष्टी पावावे' म्हणून मोकळे होतो. तसे न म्हणता `संकटी पावावे' असाच उच्चार करणे अपेक्षित आहे. कारण, विघ्नहर्ता गणरायाने केवळ संकष्टीच्या दिवशी आपल्यावर प्रसन्न न होता, संकटसमयी आपल्याला योग्य मार्ग दाखवावा, असा अर्थ ह्या आरतीचे रचेते समर्थ रामदास स्वामी ह्यांना अभिप्रेत आहे!

बाप्पा तुंदिलतनू असला, तरी तो 'हेल्दी' आणि `फिट' आहे. त्याने रणांगणात अनेक असूरांना धारातिर्थी पाडले आहे. त्याच्या निरोगी आणि बलवान शरीराचे गुपित म्हणजे त्याचा आहार! त्यात तळलेल्या पदार्थांना अजिबात स्थान नाही. उकडून-शिजवून केलेल्या अस्सल चवीच्या पदार्थांचेच तो सेवन करतो. म्हणूनच  गणेशोत्सवात बाप्पा घरी आले की सुगरणी उकडीचे मोदक, खिरापत, सुकामेव्याचे पंचखाद्य, काळ्या वाटाण्याचे सांबार आणि आंबोळ्या, पातोळ्या असा सात्विक नैवेद्य करतात. असा पौष्टिक आहार घेणारा बाप्पा कधी सुस्तावस्थेत आपल्याला आढळत नाही. तो चवीनेच नाही, तर डोळसपणे आहार घेतो आणि आपल्याला दैनंदिन आहारशैलीकडे डोळसपणे बघायला शिकवतो.

बाप्पा मंगलमूर्ती आहे. त्याच्याकडे कधीही बघा, त्याला बघून प्रसन्न वाटते. मानवी देहावर गजमुख बसवलेले असूनही बाप्पा आपल्याला गोड दिसतो. का? कारण ज्याचे मन प्रसन्न असते, त्याचा चेहराही प्रसन्न दिसतो आणि त्याच चेहऱ्याची छाप समोरच्यावर पडते. असा बाप्पा बाह्य सौंदर्याऐवजी आंतरिक सौंदर्याला महत्त्व द्या, असे सुचवतो.

काव्यशास्त्रविनोदात रमणारा बाप्पा 'एकसूरी आयुष्य जगू नका' असाही आपल्याला संदेश देतो. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर एखादी तरी कला नक्कीच शिकून घ्या. तो स्वत: गायन-वादन-नर्तन ह्यात निपुण आहे. विविध गाण्यांमधून तसे वर्णनही आपण ऐकले आहे. आत्ताच्या काळात 'ऑलराऊंडर' असलेल्या भक्तांमागे तो ठामपणे उभा राहतो. कारण, अशीच मेहनती आणि महत्वाकांक्षी माणसे त्याला जास्त आवडतात. 

जे काम हाती घ्याल, ते मनापासून करा. वाटेत येणाऱ्या अडचणींसमोर हतबल होऊ नका. उंदरासारख्या दुष्ट प्रवृत्तीवर स्वार होऊन पुढचा मार्ग काढा, हे बाप्पा आपल्या व्यक्तिमत्त्वातून सिद्ध करतो. कोणत्याही कामात मागे न राहता, पुढाकार घेऊन नेतृत्व स्वीकारण्याचे कसब आपल्यात आले पाहिजे. जिथे शौर्य गाजवायचे तिथे 'महागणपती' आणि जिथे सर्वांचे मन जिंकून घ्यायचे तिथे 'गणू', 'गणोबा', 'गणेशा' होता आले पाहिजे, असे बाप्पा आपल्याला शिकवतो. अंगारकीनिमित्त बाप्पाच्या व्यक्तिमत्त्वातले असे विविध बारकावे टिपूया आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया!