शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते; परंतु त्याचबरोबर... 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 2, 2021 08:00 IST

आताच्या काळात नुसते अंगारकी व्रत करून भागणार नाही, तर सोबतच गणरायाचे गुणही अंगिकारावे लागतील.

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! ह्या एकमेव दैवतासाठी समस्त मंडळीr  भाविक होतात आणि भावुकही होतात. `बाप्पा साठी काही पण' असा गणेशभक्तांचा पवित्रा असतो. काही जण मंगळवारचा किंवा संकष्टीचा उपास करतात, तर काही जण नियमितपणे गणपती मंदिरात जातात. मात्र हे ज्यांना शक्य होत नाही ते आवर्जून  'अंगारकी चतुर्थी'चा उपास करतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र आताच्या काळात नुसते अंगारकी व्रत करून भागणार नाही, तर सोबतच गणरायाचे गुणही अंगिकारावे लागतील.

महाभारताच्या लिखाणात चुका होऊ नयेत म्हणून महर्षी व्यासांनी गणरायाची निवड केली. कारण तो उत्तम लेखनिक होता. म्हणजे व्याकरणाच्या बाबतीतही तो किती काटेकोर असेल, ह्याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यासारखेच आपणही भाषाशुद्धीबाबत आग्रही असले पाहिजे. मात्र आपण गणपतीची आरती म्हणताना बेधडकपणे `संकटी पावावे' ऐवजी `संकष्टी पावावे' म्हणून मोकळे होतो. तसे न म्हणता `संकटी पावावे' असाच उच्चार करणे अपेक्षित आहे. कारण, विघ्नहर्ता गणरायाने केवळ संकष्टीच्या दिवशी आपल्यावर प्रसन्न न होता, संकटसमयी आपल्याला योग्य मार्ग दाखवावा, असा अर्थ ह्या आरतीचे रचेते समर्थ रामदास स्वामी ह्यांना अभिप्रेत आहे!

बाप्पा तुंदिलतनू असला, तरी तो 'हेल्दी' आणि `फिट' आहे. त्याने रणांगणात अनेक असूरांना धारातिर्थी पाडले आहे. त्याच्या निरोगी आणि बलवान शरीराचे गुपित म्हणजे त्याचा आहार! त्यात तळलेल्या पदार्थांना अजिबात स्थान नाही. उकडून-शिजवून केलेल्या अस्सल चवीच्या पदार्थांचेच तो सेवन करतो. म्हणूनच  गणेशोत्सवात बाप्पा घरी आले की सुगरणी उकडीचे मोदक, खिरापत, सुकामेव्याचे पंचखाद्य, काळ्या वाटाण्याचे सांबार आणि आंबोळ्या, पातोळ्या असा सात्विक नैवेद्य करतात. असा पौष्टिक आहार घेणारा बाप्पा कधी सुस्तावस्थेत आपल्याला आढळत नाही. तो चवीनेच नाही, तर डोळसपणे आहार घेतो आणि आपल्याला दैनंदिन आहारशैलीकडे डोळसपणे बघायला शिकवतो.

बाप्पा मंगलमूर्ती आहे. त्याच्याकडे कधीही बघा, त्याला बघून प्रसन्न वाटते. मानवी देहावर गजमुख बसवलेले असूनही बाप्पा आपल्याला गोड दिसतो. का? कारण ज्याचे मन प्रसन्न असते, त्याचा चेहराही प्रसन्न दिसतो आणि त्याच चेहऱ्याची छाप समोरच्यावर पडते. असा बाप्पा बाह्य सौंदर्याऐवजी आंतरिक सौंदर्याला महत्त्व द्या, असे सुचवतो.

काव्यशास्त्रविनोदात रमणारा बाप्पा 'एकसूरी आयुष्य जगू नका' असाही आपल्याला संदेश देतो. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर एखादी तरी कला नक्कीच शिकून घ्या. तो स्वत: गायन-वादन-नर्तन ह्यात निपुण आहे. विविध गाण्यांमधून तसे वर्णनही आपण ऐकले आहे. आत्ताच्या काळात 'ऑलराऊंडर' असलेल्या भक्तांमागे तो ठामपणे उभा राहतो. कारण, अशीच मेहनती आणि महत्वाकांक्षी माणसे त्याला जास्त आवडतात. 

जे काम हाती घ्याल, ते मनापासून करा. वाटेत येणाऱ्या अडचणींसमोर हतबल होऊ नका. उंदरासारख्या दुष्ट प्रवृत्तीवर स्वार होऊन पुढचा मार्ग काढा, हे बाप्पा आपल्या व्यक्तिमत्त्वातून सिद्ध करतो. कोणत्याही कामात मागे न राहता, पुढाकार घेऊन नेतृत्व स्वीकारण्याचे कसब आपल्यात आले पाहिजे. जिथे शौर्य गाजवायचे तिथे 'महागणपती' आणि जिथे सर्वांचे मन जिंकून घ्यायचे तिथे 'गणू', 'गणोबा', 'गणेशा' होता आले पाहिजे, असे बाप्पा आपल्याला शिकवतो. अंगारकीनिमित्त बाप्पाच्या व्यक्तिमत्त्वातले असे विविध बारकावे टिपूया आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया!