शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

चोरावर मात कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:35 IST

एक भुरटा चोर अनेकदा रंगेहात पकडला जात असे. त्याच्याशी कसे वागायचे? खालील दोन गोष्टींमधून आपल्याला शिक्षा, दया आणि मानवी स्वभावाविषयी बोध घेता येतो.

एक गरीब, भुकेला माणूस भुरट्या चोऱ्या करू लागला. एकदा तो तुरुंगात गेला. त्याने तिथून पळून जाण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो दर वेळेस पकडला गेला आणि त्याची शिक्षा वाढत गेली. शेवटी एकदा बऱ्याच वर्षांनी त्याची सुटका झाली.

थंडी आणि भुकेने तो कासावीस झाला होता. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि एकावेळच्या जेवणाची सोय करण्या पुरता देखील कोणताही मार्ग नव्हता. कोणीही या गुन्हेगारावर विश्वास ठेवायला, त्याला काम द्यायला तयार नव्हता. तो अनेक ठिकाणी फिरला, पण तो जिथे जिथे गेला, तिथे तिथे लोकांनी त्याला हाकलून लावले. एका खेडेगावात लोकांकडून मार खाल्ल्यानंतर त्याला एका पाद्र्याच्या घरी आसरा मिळाला.

तो पाद्री त्याचे इतक्या प्रेमाने स्वागत करेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. “हे देवाचे घर आहे. कोणी गुन्हेगार असो वा पापी, जे कोणी इथे आसरा मागायला येईल ते देवाचे लेकरू आहे” असे म्हणत पाद्र्याने त्याचे सांत्वन केले, त्याला खायला अन्न दिले, घालायला कपडे दिले आणि राहायला जागा दिली.

त्याने पोटभर जेवण केले, झोपला आणि मध्यरात्र होताच मोठ्या जोमाने उठला. त्याची दृष्टी त्या खोलीतील चांदीच्या वस्तूंवर गेली. चोरीच्या प्रबळ उर्मीने, ज्याने त्याला खायला घातले त्याच्याविषयी थोडासुद्धा विचार न करता, त्याने त्या चांदीच्या वस्तू घेऊन पळ काढला.

गावात फिरत असताना, त्याच्याकडे चांदीच्या वस्तू पाहून काही गावकऱ्यांना त्याच्याबद्दल शंका आली. पोलिसांनी त्याला पकडून त्याची चौकशी केली. त्याची उत्तरे समाधानकारक न वाटल्याने त्यांनी त्याला पाद्र्याच्या घरी नेले. “याने तुमच्या चांदीच्या वस्तू चोरल्या आहेत अशी आम्हाला शंका आहे. या तुमच्या आहेत का, हे बघून सांगता का?” पोलिसांनी पाद्र्याला विचारले.

आता चोरी पकडली जाणार आणि आपल्याला पुन्हा अनेक वर्षे गजाआड काढावी लागणार या विचाराने तो माणूस घाबरला.

पण पाद्र्याचा चेहरा करुणेने भरलेला होता. तो म्हणाला,” अरे मित्रा, मी तुला या वस्तूंबरोबर चांदीच्या मेणबत्या देखील दिल्या होत्या. त्या तू न्यायला विसरलास का?” असे म्हणत त्याने त्या मेणबत्त्या त्याला दिल्या. “माफ करा, आम्हाला वाटले हा चोरीचा माल आहे” पोलीस म्हणाले. पाद्र्याच्या करुणेने भारावून गेलेल्या त्या माणसाला पोलिसांनी सोडून दिले आणि ते निघून गेले. ( ही “ले मिजरेबल” मधील कथा आहे.)

यासारखीच एक गोष्ट झेन परंपरेमध्ये आहे, ज्यामुळे पाश्चिमात्य कथाकारांना स्फूर्ती मिळाली असावी. त्यातूनही असाच संदेशदिला आहे:

एकदा एका झेन गुरूंना त्यांच्या शिष्यांमध्ये चलबिचल झालेली दिसली, म्हणून चौकशी केली.

“त्याने परत चोरी केली” शिष्य म्हणाले आणि त्यांनी एका शिष्याला गुरूंच्या पुढ्यात उभे केले. गुरु म्हणाले “त्याला माफ करा.”

“अजिबात नाही. तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्याला अनेकदा माफ केले आहे. आता जर तुम्ही त्याला हाकलून दिले नाहीत, तर आम्ही सगळे तुम्हाला सोडून जाऊ” शिष्यांनी ठणकावले.

“तुम्ही सगळे जरी सोडून गेलात तरी मला त्याला हाकलून द्यावेसे वाटत नाही” गुरूंनी सांगितले.

गुन्हा केलेल्या शिष्याने गुरूंच्या पायावर लोळण घातली आणि तो धाय मोकलून रडू लागला.सद्गुरूंचे स्पष्टीकरणसद्गुरू: माणसाच्या अंगात कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगायची ताकद असू शकते, पण अतीव दयाभावनेला तो शरण जातो. शिक्षा माणसांना दगडाप्रमाणे कठोर बनविते पण तर्कातीत करुणा त्याला विरघळून टाकते.तुम्ही जसजसे एखाद्याबरोबर कठोर होत जाता, तसतशी त्या माणसात शिक्षा सहन करण्याची ताकद येते. फक्त दयाबुद्धीने त्याला पाझर फुटतो. अध्यात्मिक गुरु कोणालाही तो या क्षणी कसा आहे त्यावरून त्याला पारखत नाही. एखादा माणूस जेव्हा नारळाचे झाड लावतो, तो फळ लागले नाही म्हणून चवथ्याच आठवड्यात ते झाड उखडून टाकत नाही. तसेच गुरु प्रत्येक शिष्याची क्षमता ओळखतो आणि ती पूर्णपणे कशी विकसित करायची याकडे लक्ष देतो. केवळ आत्ता या क्षणी त्याच्या मध्ये आवश्यक ते गुण नाहीत म्हणून, गुरु कोणाकडेही दुर्लक्ष करत नाही.

स्वतःला जे शिष्य समजतात त्यांनी प्रत्येक संधीचा उपयोग विकासासाठी आणि परिवर्तनासाठी करण्याची तयारी दाखवली पाहिजे. विशेषतः प्रतिकूल परिस्थिती ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची उत्तम संधी असते. त्या ऐवजी, ते जर गुरूलाच अमुक कर, तमुक कर म्हणू लागले तर त्याचा अर्थ त्यांना फक्त स्वतःचा अधिकार गाजवायचा आहे. त्यांना कोणतेही परिवर्तन नको आहे. अशी लोकं शिष्य म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांच्यावर वेळ घालवण्यापेक्षा त्यांना जाऊ देणेच श्रेयस्कर.