शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विवाह करूनही हनुमंत ब्रह्मचारी कसे राहिले? वाचा ही पाराशर संहितेत दिलेली कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 17:02 IST

भारतात चार-पाच ठिकाणी हनुमंत आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पहायला मिळते. त्यातले एक तेलंगणा येथे स्थित आहे.

विवाह लवकर व्हावा, म्हणून लग्नाळू मुले मुली हनुमंताची उपासना करतात हे माहित होते, परंतु ब्रह्मचारी अशी ओळख असणारा हनुमंत स्वत:देखील विवाहबद्ध झाला होता, हे फार कमी जणांना माहित असेल. परंतु, हा विवाह संसारसुखासाठी झाला नसून विद्यार्जनासाठी झाला होता. काय आहे त्यामागील सविस्तर कथा, जाणून घेऊया.

हनुमंत बालपणापासून सूर्याची उपासना करत होते. वैरागी वृत्तीच्या हनुमंतांना संसार करण्यात रस नव्हता. त्यांनी कायमस्वरूपी रामाचे दास्यत्व पत्करले होते. बलोपासनेबरोबरच त्यांचे सूर्यदेवांकडून ज्ञानार्जन सुरू होते. पुढील विद्या संपादन करण्यासाठी त्यांना ब्रह्मचर्य सोडावे लागणार होते. हनुमंताची गैरसोय पाहून सूर्यदेवांनी आपली कन्या सुवर्चला हिच्याशी हनुमंताला विवाह करायला सांगितला. 

सुवर्चलादेखील तपस्विनी होती. तिलाही संसारसुखात रस नव्हता. दोघांची सम वृत्ती आणि ज्ञानार्जनाची ओढ पाहून सूर्यदेवांनी हा मध्य साधला आणि सर्व देवी देवतांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावून दिला. हा विवाह केवळ नाममात्र होता. विवाहित झाल्यावर हनुमंत पुनश्च ज्ञानसाधनेत तर सुवर्चला तप:साधनेत रंगून गेली. त्यामुळे दोहोंनी आपले ब्रह्मचर्य अबाधित ठेवले. 

भारतात चार-पाच ठिकाणी हनुमंत आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पहायला मिळते. त्यातले एक तेलंगणा येथे स्थित आहे. तर अन्य मंदिरे येल्लांडू, सिकंदराबाद, गुंटूर, राजमुण्ड्रि या ठिकाणी आहेत. अनेक दाम्पत्य सुखी संसारासाठी त्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतात. 

तसे असले, तरीही आपल्या मनात ब्रह्मचारी हनुमंताची प्रतिमा ठासलेली आहे. त्याचा प्रभाव एवढा, की आजही हिंदू स्त्रिया हनुमंताला स्पर्शही करत नाहीत. दुरूनच नमस्कार करतात. तर अनेक युवा ब्रह्मचर्य पाळण्याबाबत हनुमंताचा आदर्श ठेवतात.