शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

नामस्मरण कसे करावे? नामस्मरण करताना कोणते नियम पाळावेत, वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 13:01 IST

नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे.

दगडावर एकाचवेळी खूप पाणी टाकले तर दगड ओला होईल आणि काही वेळानंतर पूर्वीसारखा कोरडा होईल. पण त्यावर सतत एकाच बिंदूवर थेंबाथेंबाने पाणी पडत राहिल्यास त्या दगडाला छिद्र होऊन तो भंग पावतो. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या थेंबाने जीवनातील दु:खाचा दगड फुटून जातो. 

संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, भगवंत प्राप्तीच्या सर्व प्रकारांपेक्षा सोपा प्रकार आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा! `नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' या अभंगात तर ते म्हणतात, नामस्मरणाने सकल पापांचा नाश होतो, सकल दु:खाचा विसर पडतो. ते घेण्यासाठी फार कष्ट लागत नाही. वनात जावे लागत नाही. व्यावहारिक कामे करता करताही मुखाने अखंड नामस्मरण करता येते. नामस्मरण कोणाचे करावे असा ठराविक नियमही नाही. आवडी अनंत आळवावा, म्हणजे ज्या देवतेची उपासना करता, त्याचे मनोभावे नाम घ्या. नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे.

  • स्वार्थबुद्धीचा त्याग करावा.
  • यम नियमांचे पालन करावे.
  • परान्न घेऊ नये.
  • परनिंदा करून नये.
  • दयाबुद्धी ठेवावी. 
  • कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात.
  • कितीही त्रास झाला तरी शांत राहावे.
  • मांसभक्षण, मदिरापान, व्यसन इ. निषिद्ध कर्म करू नयेत. 
  • जप सद्गुरू करून घेत आहेत, ही भावना ठेवावी.
  • शिव आणि नारायण यांच्यात भेद करू नये. सर्व देवांमध्ये परमतत्त्व पाहावे.
  • मासिक पाळीच्या काळात जपाची माळ न घेता केवळ मुखाने नामस्मरण करावे. 
  • रोज शिवकवच, पंचमुखी हनुमान कवचाचे किंवा कोणत्याही एका स्तोत्राचे नित्यनेमाने पठण करावे.
  • परस्त्रीला मातेसमान मानावे.
  • दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा ठेवू नये.
  • संशय, विकल्प आले, तरी नामस्मरण सोडू नये.