शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोणत्याही क्षेत्रात खात्रीशीर यश मिळवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' चार गोष्टी; सांगताहेत आचार्य चाणक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:13 IST

चाणक्य नीती सांगते की यश मिळवण्यासाठी ४ गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यापैकी कोणत्याही गोष्टीत कमतरता असल्यास यशापासून वंचित राहाल.

जीवनात यश मिळवण्यासाठी काही गोष्टीचे नियमन अतिशय महत्त्वाचे असते. मोठे यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी आखणीही मोठी लागते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या यश मिळविण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. चाणक्य नीती सांगते की यश मिळवण्यासाठी ४ गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यापैकी कोणत्याही गोष्टीत कमतरता असल्यास यशापासून वंचित राहाल.

यश मिळवण्यासाठी या ४ गोष्टी आवश्यक आहेत

रणनीती : रणनीती केवळ युद्धात नाही तर यशप्राप्तीसाठी सुद्धा करावी लागते. ती योग्य असेल तर अशक्य वाटणारे ध्येयही गाठता येते. त्यामुळे यश मिळवण्यासाठी रणनीती बनवा, त्याप्रमाणे योजना करा आणि मग त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. मात्र आखणी केल्याशिवाय यश मिळणार नाही हे ध्यानात ठेवा. 

कठोर परिश्रम: चाणक्य नीती सांगते, आयुष्याचे ध्येय मोठे असले तरी ते साध्य करण्यासाठी छोट्या छोट्या ध्येयांची आखणी करा. जेव्हा तुम्ही छोटे ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवता तेव्हा तुम्ही आपोआपच मोठे ध्येय प्राप्तीसाठी सज्ज होता. यशाचा शॉर्टकट नसतो. तुम्हाला ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाची तयारी ठेवावीच लागते. 

वेळेचे व्यवस्थापन : वेळेचा सदुपयोग करणारी व्यक्तीच जीवनात यश मिळवू शकते. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा, तसेच तुमच्या ध्येयानुसार कोणत्या कामात किती वेळ द्यायचा हे ठरवा. वेळेचे व्यवस्थापन चांगले असेल तर व्यक्तीला भरपूर यश मिळते. याउलट वेळ वाया घालवणारी व्यक्ती किंवा वेळ न पाळणारी व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. 

तुमची गुपिते कोणाला सांगू नका: तुम्हाला मोठे यश मिळवायचे असेल तर प्रत्येक बाबतीत गोपनीयता पाळायला शिका, अन्यथा तुमचा द्वेष करणारे लोक त्यात अडथळे आणू शकतात. म्हणून, काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या ध्येयाबद्दल किंवा त्या दिशेने करणाऱ्या प्रवासाबद्दल कोणालाही सांगू नका. कारण रणनीती ही यशाची ब्लू प्रिंट असते. ती कायम गुप्त ठेवा!