शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर हे पाच उपाय जरूर करा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 08:00 IST

दर वेळी आवडीचे काम मिळेल असे नाही, तर जे काम मिळेल ते आवडीने केले पाहिजे. 

एका आळसामुळे आपले खूप नुकसान होते. आळशी व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोक कायम आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतात. त्यामुळे त्यांच्यापासून लोक दुरावतात आणि ते एकाकी पडतात. 

आळस कशामुळे येतो? तर मेंदू कार्यान्वित न ठेवल्यामुळे. आपल्या मेंदूला सतत कामाचा पुरवठा करावा लागतो नाहीतर तो काम करणे बंद करतो. एकतर ध्येयवेडे लोक सतत कामात असतात नाहीतर परिस्थितीमुळे हतबल झालेले, अन्यथा कामाचा कंटाळा प्रत्येकालाच येतो. मेंदू शिथील झाला, की आळस येतो. 

काम नुसते करून उपयोग नाही. मेहनत तर गाढवही करते, तसे काम उपयोगाचे नाही. ध्येयाने प्रेरित होऊन काम केले पाहिजे आणि वेळ ठरवून काम केले पाहिजे. अन्यथा कामाला गती येणार नाही. दर वेळी आवडीचे काम मिळेल असे नाही, तर जे काम मिळेल ते आवडीने केले पाहिजे. 

जबाबदारी घेण्याबाबत दोन पद्धतीचे लोक असतात, एक कष्टाळू आणि दुसरे कष्ट टाळू! विनोदाचा भाग सोडा, परंतु आळशी लोकांना जबाबदारी घेण्यात अजिबात रस नसतो. ते दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतील, परंतु स्वत:कडे चांगली बौद्धिक क्षमता असूनही त्याचा योग्य वापर करणार नाहीत. ही कारणे लक्षात घ्या आणि स्वत:मध्ये पुढील बदल करा.

आयुष्यात मोठे ध्येय आणि मोठे लक्ष्य ठेवा : ध्येय नसेल, तर आयुष्यात काहीच मजा नाही. आला दिवस घालवणे हे आपले जीवनाचे लक्ष्य नसून आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करा. मग बघा, तुम्हाला दिवसाचे चोवीस तासही कमी पडतील. सुरुवात छोट्या छोट्या ध्येयापासून करा. ते ध्येय प्राप्त केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वप्नांचे क्षितीज विस्तारेल.

ताजे आणि पौष्टिक अन्न खा : अन्न हे आपल्या शरीराचे ऊर्जास्रोत आहे. कमी किंवा अधिक अन्नसेवनामुळे शरीर सुरळीतपणे काम करत नाही. म्हणून प्रमाणात अन्नसेवन करावे आणि शक्य असल्यास ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाल्यामुळे सुस्तपणा येतो आणि आळसाला निमित्त मिळते.

कामाची यादी करा : दिवसाची सुरुवात करताना आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत, त्याची यादी करा आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. त्यामुळे अनावश्यक कामात वेळ खर्च होणार नाही.

सुसंगत ठेवा : उत्साही, अभ्यासू लोकांच्या सहवासात राहा. तुम्हाला आळस आला, तरी असे लोक तुम्हाला कामासाठी प्रोत्साहित करत राहतील. त्यामुळे तुमची आपोआप प्रगती होईल.

हळू हळू बदल करा : कोणताही बदल एका दिवसात होत नाही, त्यासाठी प्रयत्न करा आणि टप्प्याटप्प्याने बदल करा. त्यामुळे सवयीत बदल होतील आणि तुमचा उत्साह टिकून राहील

वरवर छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात मोठा बदल घडवतात हे लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा.