शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

उत्तम साधना होण्यासाठी आरोग्य उत्तम हवे; त्यासाठी भोजनासंबंधित पाळा 'हे' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 12:44 IST

आजचा समाज सशक्त आणि सुसंस्कृत घडवायचा असेल, तर व्यायाम, आध्यात्म याबरोबरच आपण जे अन्नग्रहण करतो, त्याबाबतीत महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.

'हेल्थ इज वेल्थ' अर्थात आरोग्य हीच संपत्ती आहे. आपले मन भगवंताच्या चरणी रुजू करायचे असेल, तर आरोग्याच्या कुरबूरी असून चालणार नाही. आरोग्य सुदृढ असेल, तर मन शांत राहील. यासाठी सर्व संतांनीदेखील आध्यात्माबरोबर आरोग्याला महत्त्व दिले. समर्थ रामदासांनी तर हनुमंताची देवळे उभारून त्याच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीचा आदर्श घालून दिला. युवकांनी तर बलोपासना केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आजचा समाज सशक्त आणि सुसंस्कृत घडवायचा असेल, तर व्यायाम, आध्यात्म याबरोबरच आपण जे अन्नग्रहण करतो, त्याबाबतीत महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.

  • ताजे अन्न खावे.
  • मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या सहाही चवी जेवणात असाव्यात.
  • जेवणात चावून, फोडून खाण्यासारखे पदार्थ, चाटण्यासारखे, पिण्यासारखे पातळ पदार्थ याा समावेश असावा.
  • भूक लागल्यावरच जेवावे.
  • दोन जेवणांमध्ये किंवा खाण्यामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.
  • प्रत्येक घास चावून खावा.
  • जेवणात अधून मधून घोट घोट पाणी प्यावे.
  • जेवण तिखट, कडू, तुरट चवींनी संपवावे.
  • जेवण आंबट, गोड चवींनी सुरू करावे.

  • योग्य न्याहारी आणि दुपारचे जेवण घ्यावे. रात्रीचे जेवण हलके घ्यावे.
  • जेवताना काटेचमच्यांनी न जेवता हाताने जेवावे.
  • जेवणाआधी ईश्वराचे स्मरण करावे आणि सकस अन्न दिल्याबद्दल त्याचे आभार मानावेत. 
  • जेवण झाल्यावर ताटात एक थेंब सोडून आचमन करून भोजनयज्ञ पूर्ण करावा.
  • गोड आणि पचायला जड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.
  • खाण्याच्या क्षमतेसनुसार दोन भाग घन द्रव्य, एक भाग पातळ द्रव्य, एक भाग मोकळा असे ताटाचे स्वरूप असावे.
  • शांतचित्ताने, न बोलता, सावकाश जेवून ताटाला नमस्कार करून मगच उठावे.
टॅग्स :foodअन्न