शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हनुमंतांचा विवाह झाला होता अशी पाराशर संहितेत दिलेली कथा तुम्ही वाचली आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 18:29 IST

विवाहित असूनही हनुमंताला ब्रह्मचारी अशी उपाधी मिळाली, त्यामागे होते हे कारण.... 

विवाह लवकर व्हावा, म्हणून लग्नाळू मुले मुली हनुमंताची उपासना करतात हे माहित होते, परंतु ब्रह्मचारी अशी ओळख असणारा हनुमंत स्वत:देखील विवाहबद्ध झाला होता, हे फार कमी जणांना माहित असेल. परंतु, हा विवाह संसारसुखासाठी झाला नसून विद्यार्जनासाठी झाला होता. काय आहे त्यामागील सविस्तर कथा, जाणून घेऊया.

हनुमंत बालपणापासून सूर्याची उपासना करत होते. वैरागी वृत्तीच्या हनुमंतांना संसार करण्यात रस नव्हता. त्यांनी कायमस्वरूपी रामाचे दास्यत्व पत्करले होते. बलोपासनेबरोबरच त्यांचे सूर्यदेवांकडून ज्ञानार्जन सुरू होते. पुढील विद्या संपादन करण्यासाठी त्यांना ब्रह्मचर्य सोडावे लागणार होते. हनुमंताची गैरसोय पाहून सूर्यदेवांनी आपली कन्या सुवर्चला हिच्याशी हनुमंताला विवाह करायला सांगितला. 

सुवर्चलादेखील तपस्विनी होती. तिलाही संसारसुखात रस नव्हता. दोघांची सम वृत्ती आणि ज्ञानार्जनाची ओढ पाहून सूर्यदेवांनी हा मध्य साधला आणि सर्व देवी देवतांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावून दिला. हा विवाह केवळ नाममात्र होता. विवाहित झाल्यावर हनुमंत पुनश्च ज्ञानसाधनेत तर सुवर्चला तप:साधनेत रंगून गेली. त्यामुळे दोहोंनी आपले ब्रह्मचर्य अबाधित ठेवले. 

भारतात चार-पाच ठिकाणी हनुमंत आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पहायला मिळते. त्यातले एक तेलंगणा येथे स्थित आहे. तर अन्य मंदिरे येल्लांडू, सिकंदराबाद, गुंटूर, राजमुण्ड्रि या ठिकाणी आहेत. अनेक दाम्पत्य सुखी संसारासाठी त्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतात. 

तसे असले, तरीही आपल्या मनात ब्रह्मचारी हनुमंताची प्रतिमा ठासलेली आहे. त्याचा प्रभाव एवढा, की आजही हिंदू स्त्रिया हनुमंताला स्पर्शही करत नाहीत. दुरूनच नमस्कार करतात. तर अनेक युवा ब्रह्मचर्य पाळण्याबाबत हनुमंताचा आदर्श ठेवतात.