शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

हनुमंतांचा विवाह झाला होता अशी पाराशर संहितेत दिलेली कथा तुम्ही वाचली आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 18:29 IST

विवाहित असूनही हनुमंताला ब्रह्मचारी अशी उपाधी मिळाली, त्यामागे होते हे कारण.... 

विवाह लवकर व्हावा, म्हणून लग्नाळू मुले मुली हनुमंताची उपासना करतात हे माहित होते, परंतु ब्रह्मचारी अशी ओळख असणारा हनुमंत स्वत:देखील विवाहबद्ध झाला होता, हे फार कमी जणांना माहित असेल. परंतु, हा विवाह संसारसुखासाठी झाला नसून विद्यार्जनासाठी झाला होता. काय आहे त्यामागील सविस्तर कथा, जाणून घेऊया.

हनुमंत बालपणापासून सूर्याची उपासना करत होते. वैरागी वृत्तीच्या हनुमंतांना संसार करण्यात रस नव्हता. त्यांनी कायमस्वरूपी रामाचे दास्यत्व पत्करले होते. बलोपासनेबरोबरच त्यांचे सूर्यदेवांकडून ज्ञानार्जन सुरू होते. पुढील विद्या संपादन करण्यासाठी त्यांना ब्रह्मचर्य सोडावे लागणार होते. हनुमंताची गैरसोय पाहून सूर्यदेवांनी आपली कन्या सुवर्चला हिच्याशी हनुमंताला विवाह करायला सांगितला. 

सुवर्चलादेखील तपस्विनी होती. तिलाही संसारसुखात रस नव्हता. दोघांची सम वृत्ती आणि ज्ञानार्जनाची ओढ पाहून सूर्यदेवांनी हा मध्य साधला आणि सर्व देवी देवतांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावून दिला. हा विवाह केवळ नाममात्र होता. विवाहित झाल्यावर हनुमंत पुनश्च ज्ञानसाधनेत तर सुवर्चला तप:साधनेत रंगून गेली. त्यामुळे दोहोंनी आपले ब्रह्मचर्य अबाधित ठेवले. 

भारतात चार-पाच ठिकाणी हनुमंत आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पहायला मिळते. त्यातले एक तेलंगणा येथे स्थित आहे. तर अन्य मंदिरे येल्लांडू, सिकंदराबाद, गुंटूर, राजमुण्ड्रि या ठिकाणी आहेत. अनेक दाम्पत्य सुखी संसारासाठी त्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतात. 

तसे असले, तरीही आपल्या मनात ब्रह्मचारी हनुमंताची प्रतिमा ठासलेली आहे. त्याचा प्रभाव एवढा, की आजही हिंदू स्त्रिया हनुमंताला स्पर्शही करत नाहीत. दुरूनच नमस्कार करतात. तर अनेक युवा ब्रह्मचर्य पाळण्याबाबत हनुमंताचा आदर्श ठेवतात.