शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन!- ओशो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 17:34 IST

आनंद एक अनुभूती आहे. पण आमच्या मनाची सवय तर दु:खाला कवटाळण्याची आहे. तक्रार, निंदा, विरोध या आपल्या मनाच्या सवयी असतात. या सवयींच्या जंजाळातून बाहेर पडला, तर तिथे तत्क्षणी आनंदाचे घटित घडेल.

वैराग्याचे एक फार बेगडी रूप प्रचलित आहे. हे रूप आहे, निषेधात्मक, नकारात्मक, जीवनविरोधी, उत्सवविरोधी! ते शिकवतं संकोच! विस्तार होणं त्याला ठाऊकच नसतं. मी तुम्हाला विस्तार करायला शिकवतो. हे असं विस्तृत होत जाणं (सर्व चराचराला आपल्या कवेत येणं, त्याच्याशी एकरूपतेची जाणीव होणं) हाच ब्रह्माच्या निकट जाण्याचा उपाय आहे. विस्तार हा शब्द ब्रह्माचंच रूप आहे. ब्रह्मचा अर्थ आहे विस्तीर्ण होत जाणारं. त्या विस्ताराला अंतच नसतो. ते पसरतच जातं. 

आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन! तुम्हाला अनुभव आला असेल, जेव्हा तुम्ही दु:खी असता, तेव्हा आक्रसलेले असता. त्या अवस्थेत दारं खिडक्या बंद करून एका कोपऱ्यात पडून राहता. तुम्हाला वाटतं कुणाला भेटू नये, कुणाशी बाीलू नये, कोणी आपल्याला बघू नये, कुणी दिसू नये. आत्यंतिक दु:खाच्या अवस्थेत माणूस आत्महत्यासुद्धा करतो. स्वत:ला चरम अवस्थेपर्यंत आक्रसून घेण्याचा तो शेवटचा उपाय आहे. तो इतका आक्रसून घेतो, की पुन्हा सूर्याचा झळकता प्रकाश बगू नये, लोकांचे चेहरे बघावे लागू नयेत की उमलणारी  फुलं नजरेस पडू नयेत. आपल्यासाठी गुलाब उमललाच नाही, आपल्यासाठी सूर्य उगवलाच नाही, आपले प्राण जागे झाले नाहीत, तर आता जग जागं असेल, तर त्याच्याशी आमचा काय संबंध?

आत्महत्या हा स्वत:ला आक्रसण्याचा परम सीमेचा उपाय आहे. त्याहून अधिक आक्रसता येत नाही. दु:ख आत्मघाती असतं आणि आनंद हा आत्म्याचा विस्तार असतो. आत्मा इतका मोठा होत जातो, की चंद्रसूर्यसुद्धा त्यात सामावतात. विराट रूपाबरोबर आनंद एकरूप होतो. मग हा आनंद देहाच्या छोट्याशा कुडीत कसा बरं मावणार? तो उसळतो, अभिव्यक्त होतो. हजारो रागांचे सूर वाजवतो. हजार रंगांच सहस्रधारांची कारंजी उसळतात. हाच उत्सव असतो. आनंद म्हणजे आत्मानुभव. उत्सव म्हणजे परमात्म्याबद्दल व्यक्त होणारी कृतज्ञता. 

दूर कोकिळेचं कुंजन ऐकत आहात. अशीच एक कोकीळा तुमच्या प्राणांमध्ये लपली आहे. तुमच्या अंतरात्म्यात एक चातक साद घालतो आहे. माझी प्रियतमा कुठे आहे? पण तुमच्या डोक्यात इतका प्रचंड कोलाहल माजला आहे की तुम्हाला कोकिळा किंवा चातक कुणाचेच सूर ऐकू येत नाहीत. त्या कोलाहलात तुम्हाला ज्या गोष्टींचा आधार मिळेल, तो टिपून घेतला जातो.

आनंद एक अनुभूती आहे. पण आमच्या मनाची सवय तर दु:खाला कवटाळण्याची आहे. तक्रार, निंदा, विरोध या आपल्या मनाच्या सवयी असतात. या सवयींच्या जंजाळातून बाहेर पडला, तर तिथे तत्क्षणी आनंदाचे घटित घडेल. कारण सारे अस्तित्त्व आनंदाने काठोकाठ भरलेले आहे. फक्त तुम्ही त्याला आपल्या आत प्रवेश करू देत नाही. तुमची दारं खिडक्या तुम्ही घट्ट बंद करून घेतली आहेत. ही कवाडं उघडा, मग तुमची सारी इंद्रिय म्हणजे आनंदाची द्वारं ठरतील. तुमचा देह आनंद झेलून घेण्यासाठी समर्थ होईल. तुमचं मन आनंदाचा अंगीकार करण्यासाठी पात्र होईल. शांत होईल. तुमचा प्राण आनंदित होण्यायोग्य विस्तारेल. त्यानंतर जे घडेल, तो उत्सव असेल. मग तुम्हीसुद्धा चंद्रचांदण्यांबरोबर, फुलांसह, वृक्षांसंग, हवेच्या झुळकेबरोबर नाचू शकाल. उत्सव ही आनंदाची अभिव्यक्ती असते. उठा. जागे व्हा. आनंद बरसतो आहे. तो तुमचा स्वभाव आहे. तुम्ही झोपले आहात. तुम्हाला आनंद शोधायला नको. केवळ जागृत व्हा. निजरूप ओळखा. तत्क्षणी अखंड वर्षा व्हावी, तसा आनंदाचा वर्षाव होईल.