शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन!- ओशो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 17:34 IST

आनंद एक अनुभूती आहे. पण आमच्या मनाची सवय तर दु:खाला कवटाळण्याची आहे. तक्रार, निंदा, विरोध या आपल्या मनाच्या सवयी असतात. या सवयींच्या जंजाळातून बाहेर पडला, तर तिथे तत्क्षणी आनंदाचे घटित घडेल.

वैराग्याचे एक फार बेगडी रूप प्रचलित आहे. हे रूप आहे, निषेधात्मक, नकारात्मक, जीवनविरोधी, उत्सवविरोधी! ते शिकवतं संकोच! विस्तार होणं त्याला ठाऊकच नसतं. मी तुम्हाला विस्तार करायला शिकवतो. हे असं विस्तृत होत जाणं (सर्व चराचराला आपल्या कवेत येणं, त्याच्याशी एकरूपतेची जाणीव होणं) हाच ब्रह्माच्या निकट जाण्याचा उपाय आहे. विस्तार हा शब्द ब्रह्माचंच रूप आहे. ब्रह्मचा अर्थ आहे विस्तीर्ण होत जाणारं. त्या विस्ताराला अंतच नसतो. ते पसरतच जातं. 

आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन! तुम्हाला अनुभव आला असेल, जेव्हा तुम्ही दु:खी असता, तेव्हा आक्रसलेले असता. त्या अवस्थेत दारं खिडक्या बंद करून एका कोपऱ्यात पडून राहता. तुम्हाला वाटतं कुणाला भेटू नये, कुणाशी बाीलू नये, कोणी आपल्याला बघू नये, कुणी दिसू नये. आत्यंतिक दु:खाच्या अवस्थेत माणूस आत्महत्यासुद्धा करतो. स्वत:ला चरम अवस्थेपर्यंत आक्रसून घेण्याचा तो शेवटचा उपाय आहे. तो इतका आक्रसून घेतो, की पुन्हा सूर्याचा झळकता प्रकाश बगू नये, लोकांचे चेहरे बघावे लागू नयेत की उमलणारी  फुलं नजरेस पडू नयेत. आपल्यासाठी गुलाब उमललाच नाही, आपल्यासाठी सूर्य उगवलाच नाही, आपले प्राण जागे झाले नाहीत, तर आता जग जागं असेल, तर त्याच्याशी आमचा काय संबंध?

आत्महत्या हा स्वत:ला आक्रसण्याचा परम सीमेचा उपाय आहे. त्याहून अधिक आक्रसता येत नाही. दु:ख आत्मघाती असतं आणि आनंद हा आत्म्याचा विस्तार असतो. आत्मा इतका मोठा होत जातो, की चंद्रसूर्यसुद्धा त्यात सामावतात. विराट रूपाबरोबर आनंद एकरूप होतो. मग हा आनंद देहाच्या छोट्याशा कुडीत कसा बरं मावणार? तो उसळतो, अभिव्यक्त होतो. हजारो रागांचे सूर वाजवतो. हजार रंगांच सहस्रधारांची कारंजी उसळतात. हाच उत्सव असतो. आनंद म्हणजे आत्मानुभव. उत्सव म्हणजे परमात्म्याबद्दल व्यक्त होणारी कृतज्ञता. 

दूर कोकिळेचं कुंजन ऐकत आहात. अशीच एक कोकीळा तुमच्या प्राणांमध्ये लपली आहे. तुमच्या अंतरात्म्यात एक चातक साद घालतो आहे. माझी प्रियतमा कुठे आहे? पण तुमच्या डोक्यात इतका प्रचंड कोलाहल माजला आहे की तुम्हाला कोकिळा किंवा चातक कुणाचेच सूर ऐकू येत नाहीत. त्या कोलाहलात तुम्हाला ज्या गोष्टींचा आधार मिळेल, तो टिपून घेतला जातो.

आनंद एक अनुभूती आहे. पण आमच्या मनाची सवय तर दु:खाला कवटाळण्याची आहे. तक्रार, निंदा, विरोध या आपल्या मनाच्या सवयी असतात. या सवयींच्या जंजाळातून बाहेर पडला, तर तिथे तत्क्षणी आनंदाचे घटित घडेल. कारण सारे अस्तित्त्व आनंदाने काठोकाठ भरलेले आहे. फक्त तुम्ही त्याला आपल्या आत प्रवेश करू देत नाही. तुमची दारं खिडक्या तुम्ही घट्ट बंद करून घेतली आहेत. ही कवाडं उघडा, मग तुमची सारी इंद्रिय म्हणजे आनंदाची द्वारं ठरतील. तुमचा देह आनंद झेलून घेण्यासाठी समर्थ होईल. तुमचं मन आनंदाचा अंगीकार करण्यासाठी पात्र होईल. शांत होईल. तुमचा प्राण आनंदित होण्यायोग्य विस्तारेल. त्यानंतर जे घडेल, तो उत्सव असेल. मग तुम्हीसुद्धा चंद्रचांदण्यांबरोबर, फुलांसह, वृक्षांसंग, हवेच्या झुळकेबरोबर नाचू शकाल. उत्सव ही आनंदाची अभिव्यक्ती असते. उठा. जागे व्हा. आनंद बरसतो आहे. तो तुमचा स्वभाव आहे. तुम्ही झोपले आहात. तुम्हाला आनंद शोधायला नको. केवळ जागृत व्हा. निजरूप ओळखा. तत्क्षणी अखंड वर्षा व्हावी, तसा आनंदाचा वर्षाव होईल.