शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

Guru purnima 2021 : महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून पांडव स्वर्गस्थ झाले; जाणून घ्या महर्षी व्यास आणि महाभारतातल्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 13:21 IST

Guru purnima 2021 : श्रीमद्भागवत पुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचा उल्लेख आहे, महर्षी व्यास हे त्यापैकी एक अवतार आहेत. 

२३ जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची पूजा केली जाते. महर्षी व्यास हे अलौकिक ऋषी होते. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी!

  • पृथ्वीचे भौगोलिक चित्र सर्वात पहिले महर्षी व्यासांनी काढले होते.
  • त्यांचे चार महान शिष्य होते. मुनि पैल यांना ऋग्वेद, मुनि वैशंपायन यांना यजुर्वेद, मुनी जेमिनी यांना सामवेद आणि मुनि सुमंतु यांना अथर्ववेद शिकवला. 
  • महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते लिहिण्याचे काम गणेशाला दिले. 
  • पाराशर ऋषी आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला सुपूत्र झाला. त्याचे नाव ठेवले व्यास. त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेमुळे आणि अलौकिक शक्तीमुळे जन्मानंतर काही कालावधीतच ते युवा झाले आणि तपश्चर्या करण्यासाठी द्वैपायन द्विपावर निघून गेले.
  • अनेक वर्षे तप करून ते काळवंडून गेले म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे म्हटले जाते. तसेच या नामाची आणखी एक कथा अशी सांगितली जाते, की त्यांचा जन्म यमुना नदीच्या मध्ये एका बेटावर झाला आणि त्यांचा वर्ण सावळा असल्याने त्यांचे नाव कृष्ण द्वैपायन ठेवण्यात आले. 
  • वेद व्यास ही एक परंपरा आहे आणि महर्षी व्यास हे त्या परंपरेतले २८ वे शिष्य मानले जातात.
  • श्रीमद्भागवत पुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचा उल्लेख आहे, महर्षी व्यास हे त्यापैकी एक अवतार आहेत. 
  • धर्मग्रंथात सप्तचीरंजीवांचा उल्लेख केलेला आहे. त्यात महर्षी व्यासांचेही नाव घेतले जाते. त्यानुसार महर्षी व्यास आजही जिवीत आहेत, असे मानले जाते. 
  • सत्यवतीच्या सांगण्यानुसार महर्षी व्यासांनी विचित्रवीर्याची पत्नी अम्बा आणि अम्बालिका यांना आपल्या अद्भूत शक्तीने धृतराष्ट्र आणि पांडु हे पूत्र दिले, तसेच विचित्रवीर्याच्या दासीला विदुर नावाचा पूत्र दिला. 
  • पुढे व्यासांच्या आशीर्वादाने धृतराष्ट्राला ९९ पूत्र आणि १ कन्या झाली. 
  • महाभारताच्या शेवटी जेव्हा अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो, ते परत घेण्यासाठी महर्षी व्यास आज्ञा करतात. परंतु अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत घेण्याची कला अवगत नसल्याने तो अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडतो. या घोर पापाची शिक्षा भगवान श्रीकृष्ण अश्वत्थामाला देतात. तीन हजार वर्षे तो जखमी अवस्थेत फिरत राहील असेल सांगतात. त्याला महर्षी व्यास सहमती दर्शवतात.

  • महर्षी व्यासांच्या कृपेने संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि तो महाभारताचे वर्णन धृतराष्ट्राला सांगू शकला.
  • महाभारताच्या युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी आपल्या दिवंगत नातलगांना पाहण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा महर्षी व्यास त्यांना घेऊन गंगातटावर आले आणि त्यांनी सर्व दिवंगत योद्धांचे दर्शन घडवले. ते अंतिम दर्शन देऊन सर्व आत्मे स्वर्गस्थ झाले. 
  • कलियुगाचा वाढता प्रभाव पाहून महर्षी व्यासांनी पांडवांना स्वर्गात जाण्याची आज्ञा दिली.
टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा