शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Guru purnima 2021 : महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून पांडव स्वर्गस्थ झाले; जाणून घ्या महर्षी व्यास आणि महाभारतातल्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 13:21 IST

Guru purnima 2021 : श्रीमद्भागवत पुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचा उल्लेख आहे, महर्षी व्यास हे त्यापैकी एक अवतार आहेत. 

२३ जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची पूजा केली जाते. महर्षी व्यास हे अलौकिक ऋषी होते. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी!

  • पृथ्वीचे भौगोलिक चित्र सर्वात पहिले महर्षी व्यासांनी काढले होते.
  • त्यांचे चार महान शिष्य होते. मुनि पैल यांना ऋग्वेद, मुनि वैशंपायन यांना यजुर्वेद, मुनी जेमिनी यांना सामवेद आणि मुनि सुमंतु यांना अथर्ववेद शिकवला. 
  • महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते लिहिण्याचे काम गणेशाला दिले. 
  • पाराशर ऋषी आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला सुपूत्र झाला. त्याचे नाव ठेवले व्यास. त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेमुळे आणि अलौकिक शक्तीमुळे जन्मानंतर काही कालावधीतच ते युवा झाले आणि तपश्चर्या करण्यासाठी द्वैपायन द्विपावर निघून गेले.
  • अनेक वर्षे तप करून ते काळवंडून गेले म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे म्हटले जाते. तसेच या नामाची आणखी एक कथा अशी सांगितली जाते, की त्यांचा जन्म यमुना नदीच्या मध्ये एका बेटावर झाला आणि त्यांचा वर्ण सावळा असल्याने त्यांचे नाव कृष्ण द्वैपायन ठेवण्यात आले. 
  • वेद व्यास ही एक परंपरा आहे आणि महर्षी व्यास हे त्या परंपरेतले २८ वे शिष्य मानले जातात.
  • श्रीमद्भागवत पुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचा उल्लेख आहे, महर्षी व्यास हे त्यापैकी एक अवतार आहेत. 
  • धर्मग्रंथात सप्तचीरंजीवांचा उल्लेख केलेला आहे. त्यात महर्षी व्यासांचेही नाव घेतले जाते. त्यानुसार महर्षी व्यास आजही जिवीत आहेत, असे मानले जाते. 
  • सत्यवतीच्या सांगण्यानुसार महर्षी व्यासांनी विचित्रवीर्याची पत्नी अम्बा आणि अम्बालिका यांना आपल्या अद्भूत शक्तीने धृतराष्ट्र आणि पांडु हे पूत्र दिले, तसेच विचित्रवीर्याच्या दासीला विदुर नावाचा पूत्र दिला. 
  • पुढे व्यासांच्या आशीर्वादाने धृतराष्ट्राला ९९ पूत्र आणि १ कन्या झाली. 
  • महाभारताच्या शेवटी जेव्हा अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो, ते परत घेण्यासाठी महर्षी व्यास आज्ञा करतात. परंतु अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत घेण्याची कला अवगत नसल्याने तो अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडतो. या घोर पापाची शिक्षा भगवान श्रीकृष्ण अश्वत्थामाला देतात. तीन हजार वर्षे तो जखमी अवस्थेत फिरत राहील असेल सांगतात. त्याला महर्षी व्यास सहमती दर्शवतात.

  • महर्षी व्यासांच्या कृपेने संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि तो महाभारताचे वर्णन धृतराष्ट्राला सांगू शकला.
  • महाभारताच्या युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी आपल्या दिवंगत नातलगांना पाहण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा महर्षी व्यास त्यांना घेऊन गंगातटावर आले आणि त्यांनी सर्व दिवंगत योद्धांचे दर्शन घडवले. ते अंतिम दर्शन देऊन सर्व आत्मे स्वर्गस्थ झाले. 
  • कलियुगाचा वाढता प्रभाव पाहून महर्षी व्यासांनी पांडवांना स्वर्गात जाण्याची आज्ञा दिली.
टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा