शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

Guru purnima 2021 : ईश्वरी शक्तीची प्रचिती देणारा गाणगापुरातील मंदिराचा 'हा' प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 08:00 IST

Guru Purnima 2021: आज गुरु पौर्णिमा, त्यानिमित्त गुरु चरणांची ही मानस पूजा!

श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराष्ट्रातील नृसिंहवाडीला १२ वर्षे राहून व कार्य करून नंतर येथे पुढील कार्यासाठी आले. फार काळ येथे कार्य करीत राहिल्याने या भूमीला त्यांची कर्मभूमी म्हणतात. कार्य जाल्यावर ते श्रीशैल्यपर्वतावर निघून गेले. ते श्रीशैल्यपर्वतावर जाताना त्यांच्या भक्तांना खूप दु:खं झाले. तेव्हा भक्तांना पूजा करण्यासाठी त्यांनी निर्गुण-निर्लेप अशा जिवंत पादुका त्यांच्या मठात ठेवल्या व त्यांची सेवा केल्यास तुम्हाला जीवनात आनंद मिळेल व तुमचा उद्धारही होईल असे सांगितले.

येथे ज्या पादुका आहेत ते भगवंताचे चिन्हच आहे. येतील निर्गुण पादुकांच्या दर्शनाने भक्ताला विनम्र भाव व नम्रता येते. त्याला दर्शन व आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात. विनम्र भावाच्या ओलाव्याशिवाय त्याला आशीर्वाद मिळत नाहीत. या पादुकांना पाण्याचा अभिषेक चालत नाही. अत्तर, केशराचा लेप पादुकांना लावला जातो. त्या पादुका जिवंत असल्यानेच त्या केशरातील ओलसरपणा पादुकांद्वारे शोषला जातो. तसेच पादुका `निर्लेप' असल्याने पादुकांवरील लेप निघून येतो. संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या भगवंताच्या जिवंत पादुका इतर कुठेही नाहीत.

आपण गाणगापूरला जे मंदिर पाहतो ते इस्लाम राजवटीत बांधलेले आहे. या मंदिराला पूर्वी मठ असे म्हटले जायचे. श्रीगुरुंची तिथे वास्तव्य होते. त्या काळात स्वामी असताना त्यामानाने मठ लहान होता. आज जेथे पादुका ठेवलेल्या आहेत तेथेच पूर्वी श्रीस्वामी बसत असत. इस्लाम राजवटीत हे मंदिर बांधल्यामुळे मंदिराला झरोका ठेवला आहे. झरोका ठेवण्यामागे गाभाNयात पावित्र्य राहावे अशी भावना आहे. गाभाऱ्यात फक्त तीन माणसे बसू शकतात अथवा ६ माणसे उभी राहू शकतात. 

हे संन्यासी रूप भगवंताचेच आहे. या रूपाची सेवा केल्यास त्याची प्रचिती लवकर येते पूर्वीच्या काळी रझाकार हा मठ पाडण्यासाठी आले होते. त्या काळी मठाचे समोर एक मशीद होती. रात्रीची वेळ त्यांनी निवडली. परंतु जेव्हा ते मठ पाडायला आले तेव्हा त्यांना मठाच्या जागी मशीद दिसली व मशिदीच्या जागी मठ दिसला. त्यामुळे त्यांनी त्या रात्रीच्या काळोखात मठ समजून त्यांचीच मशीद पाडली. सकाळ झाल्यावर त्यांना हा प्रकार समजला. ईश्वरी शक्ती जागृत असल्याचा हा एक पुरावा सांगितला जातो. तेव्हापासून मुसलमान समाजही श्रीगुरुंच्या सेवेसाठी तिथे दर्शनाला येतो. 

गाणगापूरचे वैशिष्ट्य असे, की तिथे तुम्ही जी सेवा कराल त्याच्या शतपटीने तुम्हाला फळ मिळते. हे ठीकाण संन्याशाचे असल्याने येथे दर्शनाला आलेले भक्त दुपारचे भोजन गावात पाच घरात माधुकरी मागूनच करतात. आता तशी तिथे प्रथाच पडली आहे. दर्शनाला आलेले भक्तही तिथे भिक्षा घालून अन्नदानाचे पुण्य मिळवतात. गाणगापूरात दत्तभक्तांना दत्तमहात्म्याची प्रचिती येते असा आजवरचा अनुभव आहे. त्याकरिता गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा दृढ हवी!

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा