शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भवसागर पार करण्यासाठी गुरुरूपी नावाडी हवाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:12 IST

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक लागतोच. आपण कितीही स्वयंभू म्हणवून घेतले, तरी दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. ती मदत किरकोळ का असेना. बुडत्याला काडीचा आधारही पुरतो. त्याप्रमाणे भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला गुरुरुपी काडीचा आधार हवाच. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात-

सद्गुरुंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरु सांगतात. सद्गुरु आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरु जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही, असे ज्याने म्हटले, त्याने खरोखरच सद्गुरु केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तु गृहस्थ मी स्वस्थ आहे, असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते, तोपर्यंत तो स्वस्थ आहे, असे नाही म्हणता येणार.

हेही वाचा : आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो, त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली, तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते, ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरश; पाळने हेच खरे साधन. संत कुणालाही कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो, तो महत्त्वाचा आहे. पुष्काळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत, ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला, तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते, ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल, तेवढेच आपल्याला मिळणार आहे. अशी आपली वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली, की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले, की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंत:कराची शुद्धता हा पाया आहे.

हेही वाचा : परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!