शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

भवसागर पार करण्यासाठी गुरुरूपी नावाडी हवाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:12 IST

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक लागतोच. आपण कितीही स्वयंभू म्हणवून घेतले, तरी दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. ती मदत किरकोळ का असेना. बुडत्याला काडीचा आधारही पुरतो. त्याप्रमाणे भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला गुरुरुपी काडीचा आधार हवाच. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात-

सद्गुरुंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरु सांगतात. सद्गुरु आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरु जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही, असे ज्याने म्हटले, त्याने खरोखरच सद्गुरु केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तु गृहस्थ मी स्वस्थ आहे, असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते, तोपर्यंत तो स्वस्थ आहे, असे नाही म्हणता येणार.

हेही वाचा : आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो, त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली, तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते, ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरश; पाळने हेच खरे साधन. संत कुणालाही कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो, तो महत्त्वाचा आहे. पुष्काळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत, ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला, तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते, ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल, तेवढेच आपल्याला मिळणार आहे. अशी आपली वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली, की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले, की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंत:कराची शुद्धता हा पाया आहे.

हेही वाचा : परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!