शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Gudi Padwa 2022 : पूर्वी मकर संक्रांतीला हिंदू नवे वर्ष साजरे केले जात असे, मग त्यात बदल कधी व केव्हा झाला? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:34 IST

Gudi Padwa 2022 : चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली असे म्हणतात, या दिवसाबद्दल अधिक रोचक माहिती वाचा.

गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी या शकाचा प्रारंभ झाला. सातवाहनाचा अपभ्रंभ 'शालिवाहन' होय. सातवाहन राज्यकत्र्यांपी कुठल्या राजाने हे शक केव्हा सुरू केले हे आजही ठामपणे सांगत येत नाही. सातवाहनांपैकी शालिवाहन राजाने शकांवर निर्णायक विजय मिळवला. त्या विजय दिनापासून या शकाची सुरुवात झाली असावी, असे मानतात. 

याच दिवशी विक्रम संवत्सराचा प्रारंभ झाला. चैतन्यहीन झालेल्या प्रजेचा पराक्रम झाकोळून गेला होता, तेव्हा विक्रम राजाने प्रजेत नवचैतन्य निर्माण केले. त्याची स्मृती म्हणून संवत्सराला विक्रम संवत्सर नाव देण्यात आले. 

पूर्वी संक्रांतीला प्रारंभ : प्राचीन काळी नवीन वर्षाचा दिवस ज्योतिषशास्त्रावरून ठरत असे. पूर्वी मकरसंक्रांतीलाच वर्षारंभ होत असे, परंतु ती शिशिर ऋतूत येते. त्यापेक्षा वसंत ऋतू श्रेष्ठ समजला जातो. कारण या ऋतूत सृष्टीचे रूप आमुलाग्र बदलते. वृक्षांना नवी पालवी फुटते. वातावरणातला उत्साह ओसंडून वाहत असतो आणि म्हणूनच आपल्या पूर्वसुरींना चैत्र महिना नव वर्षारंभाला अधिक योग्य वाटला. 

इतकेच नव्हे, तर सूर्यही २१ मार्च रोजी वसंत संपा बिंदूवर येतो. त्यामुळे दिवस हळू हळू मोठा होत जातो. साहजिकच चैत्र प्रतिपदेला वर्षारंभ मानण्याची पद्धत रूढ झाली. ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीला आरंभ केला तो याच दिवशी. म्हणून या दिवसाला आगळे वेगळे महत्त्व आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी काश्मिरातसुद्धा चैत्र हाच वर्षारंभाचा पहिला महिना मानला जात, असे भारत प्रवासी आल्बेरुनीने नोंदून ठेवले आहे. तिथे चैत्र शुद्ध प्रतिपदेला 'अगदु' हे नाव रूढ आहे. 

तर कर्नाटकात 'इगादि' असे नाव असून मलबारमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी घरातले दागदागिने, रत्ने, मौल्यवान वस्तू देव्हाऱ्यासमोर मांडून ठेवतात. सकाळी उठून घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्ती या संपत्तीला दीपारती दाखवतात. नंतर कुटुंबातले सभासद एकापाठोपाठ डोळे मिटून त्या मांडून ठेवलेल्या संपत्तीजवळ जाऊन दृष्टीक्षेप टाकतात.  सर्वांना फळांचा प्रसाद दिला जातो. यावेळी शुभ्र म्हणजे पांढऱ्या पदार्थावर नजर पडली, की आगामी वर्ष सुखासमाधानात जाते, अशी लोकांची समजूत आहे. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा