शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

खुद्द गोपाळकृष्णाने भक्ताच्या हाती दिली, अक्षय्य दुधाची वाटी; वाचा ही छान गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 08:00 IST

देव भावाचा भुकेला असे का म्हणतात, ते या गोष्टीवरून तुम्हाला खात्री पटेल!

भक्तीयोगातील शुद्ध अंत:करणाचे महत्त्व सांगताना स्वामी विवेकानंद गोपाळची गोष्ट सांगत. ती गोष्ट पुढीलप्रमाणे -गोपाळ नावाचा एक लहान मुलगा होता. त्याचे वडील लहानपणीच वारले. त्याच्या आईची बाळकृष्णावर अनन्य भक्ती असल्याने छोट्या गोपाळाला त्या श्रद्धेनेच सांभाळत होती. स्वत:चा व गोपाळाचा भार बाळकृष्णावर टाकल्याने ती निश्चिंत होती. तिच्या या भक्तीभावातच गोपाळ वाढत होता. 

गोपाळ सात वर्षांचा झाला. आईने त्याला शाळेत घातले. शाळा खूप दूर. रानरस्ता पार करूनच जावे लागत असे. बाकीची मुले गाडीतून किंवा नोकरांबरोबर जातात, माझ्याबरोबर कोण येणार? असे गोपाळ आईला विचारत असे. आई म्हणत, `बाळ, भिऊ नकोस. अरे, या रानात बन्सीधर नावाचा तुझा एक भाऊ राहतो. तुला भीती वाटली, तर तू त्याला बन्सीधर म्हणून हाक मार. तो नक्की येईल.' 

गोपाळ दुसऱ्या दिवशी दप्तर घेऊन निघाला. रानात भीती वाटू लागली, तेव्हा म्हणाला, `दादा, तू लवकर इथे ये, आई म्हणाली तू इथेच आहेस.' तेवढ्यात झाडीतून आवाज आला, `गोपाळ, भिऊ नकोस, मी तुझा पाठीराखा आहे.' असे म्हणत एक सात्विक रूप झाडीबाहेर आले. कमरेला धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात बासरी व आसपास चार-पाच गाय वासरे, अशी त्या बन्सीदादाने गोपाळला शाळेपर्यंत पोहोचवले.

गोपाळ घरी आला तो खुशीतच. मला बन्सीदादा भेटला, मला बन्सीदादा भेटला असे आनंदाने म्हणत गोपाळने आईच्या गळ्यात हातात घालून सांगितले. हे ऐकून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.एके दिवशी गोपाळच्या गुरुजींकडे धार्मिक कार्य होते. वर्गातल्या श्रीमंत मुलांनी गुरुजींना भेट द्यायचे ठरवले. गोपाळला प्रश्न पडला, आपण काय द्यायचे असे त्याने आईला विचारले. आई म्हणाली, `तुझ्या बन्सीदादाला विचार.'

गोपाळने दुसऱ्या दिवशी बन्सीदादाला हाक मारून विचारले. बन्सीदादाने वाटीभर दूध दिले. ते घेऊन गोपाळ गुरुजींच्या घरी आनंदाने गेला. तिथे मुलांनी शाल, सुवर्ण दक्षिणा, फळे असे विविध उपहार दिले. गोपाळने पुढे होत आपली दुधाची वाटी पुढे केली. ते घेतील की नाही अशा विचारात असताना गुरुजींनी वाटी घेतली. पण त्यांना ती भेट आवडली नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. गुरुजींनी एका पातेल्यात दूधाची वाटी रिकामी केली, तरी वाटी रिकामी होत नव्हती. अनेकदा तेच ते घडत होते. हे पाहून गुरुजींना आश्चर्य वाटले. बाकीचे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गोपाळ मनोमन बन्सीदादाचे आभार मानू लागला. 

गुरुजींनी विचारले, गोपाळ हे दूध कोणी दिले? गोपाळ म्हणाला, रानात राहणाऱ्या बन्सीदादाने!गुरुजी म्हणाले, मला दाखव तुझा दादा!

असे म्हणत गुरुजी गोपाळसह रानात गेले. गोपाळने अनेकदा हाक मारली पण बन्सीदादा येईना. तो रडकुंडीला आला. तो म्हणाला, `दादा, तू आला नाहीस तर मी खोटा ठरेन. तू सांग ना ही वाटी तू दिली होतीस.'तेवढ्यात झाडीतून धीरगंभीर आवाज आला, `गोपाळ, तुझ्या आणि आईच्या भक्तीसाठी तुम्हाला भेटलो. पण गुरुजींना सांग, बन्सीदादाची भेट होण्यास अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.'