शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

वाणी हीच तपश्चर्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:33 IST

एखाद्याची आस्थेने विचारपूस केल्याने त्याला आपल्या विषयी प्रेम आणि आपुलकी वाढत जाते.

चांगल बोलण्याने दूरचे जवळ येतात. याउलट कठोर आणि वाईट बोलण्याने जवळचे दूर जातात. आपल्या वाणीमुळेही इतरांना शांती मिळते. एखाद्याची आस्थेने विचारपूस केल्याने त्याला आपल्या विषयी प्रेम आणि आपुलकी वाढत जाते. मनुष्याच्या जीवनात बालपणापासूनच चांगले वागणे आणि चांगले बोलण्याचे संस्कार केले जातात. अर्थातच चांगल्या संसारासाठीच अनादी काळापासून गुरूकुल, शाळा, महाविद्यालय आणि विश्वविद्यालयांची स्थापना झाली. कठोर बोलण्यासाठी तसेच वाईट वागण्यासाठी उपरोक्त गोष्टींपैकी एकाही गोष्टीची निर्मिती नाही. यावरूनच चांगले वागणे आणि बोलण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. अध्यात्मिक दृष्टीकोनातून खोलवर अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, वाणी ही एक तपश्चर्याच आहे. समाजात मृदू आणि मधूर बोलण्यानं दूरचे जवळ येतात. याउलट कठोर शब्द बोलण्यानं जवळचेही दूर जातात. म्हणूनच मनुष्याने आपल्या वाणीनेही कुणालाही दुखविता कामा नये. मधुर शब्द मृत्यूपरांतही कायम राहतात. मनुष्याच्या जीवनात चांगले अनुभव येतात. त्यावेळी तो आनंदी होतो आणि  सुखावतो देखील.  पण, एखादा जरी वाईट अनुभव आला की, माणूस लगेच दु:खी होतो. प्रत्येकाला जीवनात एक नव्हे तर अनेक कटू अनुभव  येतात. कुणी  अपमान करतो. अपशब्द वापरतो. त्यावेळी  मनुष्याला वाईट वाटते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मनुष्याने आपल्याशी वाईट वागणाºयाला अपशब्द, कठोर बोलू नये. आपला अपमान, तिरस्कार आणि वाईट करणाराचाही सन्मान करावा. जीवनातील सर्वच वाईट अनुभव स्वाहा करीत, समाजाच्या कल्याणासाठी  सत्य बोलून, प्रिय, युक्त आणि सह्य बोलून आपली वाणी तपोपूत करावी. कारण सत्य बोलणं, प्रियं बोलणं, युक्त बोलणं आणि सह्य बोलणं ही चारप्रकारची वाणीची तपश्चर्या आहे. जीवनात चार प्रकारची तपश्चर्या केली तर कुणाचीही वाणी तपोपूत होते. सकारात्मक दृष्टीकोनाचा अंगिकार करून ज्ञानाची प्राप्ती केली तर मनुष्याच्या जीवनात ज्ञानाचा समुद्र होतो आणि तपश्चर्येचे शिखर होते.

‘नम्र स्वभाव आणि गोड वाणी सर्व प्रकारच्या यशाला हातभार लागतो, म्हणून माणसाने नेहमी गोड वाणी केली पाहिजे. मनुष्याने हे नेहमी लक्षात ठेवलं पाहीजे की, ‘आवाजात इतकी शक्ती आहे की, कडू बोलणारा मध सुध्दा विकू शकत नाही आणि गोड बोलणाराची मिर्ची सुध्दा विकली जाते. ‘खरं तर गोड बोलणं हे केवळ स्वत:लाच नव्हे तर इतरांच्या कानांनाही दिलासा दायक आहे. संतांनी खरं सांगितलं आहे, दुसºयाचे तोंड गोड करण्यासाठी कुणालाही मिठाई खाण्याची आवश्यकता नाही. अथवा मिठाई वाटण्याचीही आवश्यकता नाही. तर गोड बोलून तुम्ही लोकांचे तोंड गोड करू शकता! वेद आणि  शास्त्रांतही वाणी संयमाला सर्वोत्तम तपश्चर्या मानले गेले आहे. ऋग्वेदानुसार ‘या ते जिव्हा मधुमति सुमेधाने देवेषूच्यूत उरूचि’ तर नीतिमत्ता म्हणते, ‘खोटं बोलणं, असमान शब्द बोलणं, अहंकारी शब्द बोलणं, निंदा करणं इत्यादी गोष्टी आहेत. ज्यामुळे माणूस पाय-यांवर संकटग्रस्त होतो. म्हणून एक एक शब्द विचारपूर्वक बोलला पाहिजे.वाणीचे महत्व अधोरेखीत करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात की,‘तुलसी मीठे वचन तै, सुख उपजत चहुं ओर।वशीकरण के मंत्र हैं, तज दे वचन कठोर।’तर संत कबिरांनी अतिशय समर्पक शब्दातून वाणीचे महत्व रेखाटले आहे.

ऐसी बानी बोलिए, मन का आपा खोय।औरन को शीतल करै, आपहु शीतल होय।लक्षात ठेवा तलवारीची जखम उशीरा भरली जाते, पण कडवट वाणीने झालेली जखम कधीच भरून येत नाही. त्यामुळे नेहमी ‘मधुर आणि सह्य बोला’ स्वत: आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा!

- अनिल तुळशीराम गवईखामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक