शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही; वाचा एका खिरीची छोटीशी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 07:00 IST

शरण जायचेच असेल तर देवाला शरण जा, कारण तोच आपला भाग्यविधाता आहे, अन्य कोणी नाही!

एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षारक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत. त्यातला एक भिकारी म्हणत, `राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे...'त्याचवेळेस दुसरा भिकारी म्हणत, `देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस, तर तू मलाही थोडे दे.'

म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे मागत असे, तर दुसरा देवाकडे मागणे मागत असे. राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत, `राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नसतो, राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल.' त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, `राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे, म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो!'

भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठवली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला. तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, `बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा, त्याने माझे मागणे पूर्ण केले, नाहीतर तुझा देव, तुझे ऐकतही नाही!' असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, `तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान.' असे म्हणत खीरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो.

उरलेली खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या. ते पाहून भिकारी आनंदून गेला. त्याने लगेच देवाचे आभार मानले. त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही!

राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल. त्याचे आयुष्य बदलून गेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो, तर झाले उलटच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, `तुला खीर मिळाली नाही का?' भिकारी म्हणाला, `मिळाली राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसला, तरी आपला राजा आपले गाऱ्हाणे ऐकतो. तोच आपले भले करतो. त्याला राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही. गेला असेल देवाकडे मागायला!'

हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, `देवाकडे जो मागतो, त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो, तो कायम रिकामाच राहतो.'