शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

भगवंत केवळ देव्हाऱ्यात किंवा मंदिरात नाही तर चराचरात आहे - ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 08:00 IST

नाम घेताना मन लागत नसेल, तर त्यावर गोंदवलेकर महाराज पर्याय सुचवतात, नामस्मरणही मोठ्याने घ्यावे. आपण घेतलेले नाम आपल्या कानावर पडून त्याचेच चिंतन होत राहील. 

पहाटे उठून व्यायाम करा, रात्री जागून अभ्यास करा, मन लावून ग्रंथांचे वाचन करा, रोज एकदा तरी जपाची माळ ओढा, काही क्षण देवाच्या सान्निध्यात घालवा. अशा सूचनांचे पालन करा म्हटले, की त्या क्षणापासून मनाची चलबिचल सुरू होते. याउलट, सिनेमा बघताना, सहलीला जाताना, गाणी ऐकताना, नाचताना, गाताना, गप्पा मारताना मन एकाग्र करा, हे सांगावे लागत नाही. ते आपोआप होते. कारण त्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात. मात्र हरीनामाची आवड आपण लावूनच घेतलेली नसते. संत नामदेव तर उपहासाने म्हणतात, 

कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, विषयसुख।

पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्यामुळे गावकरी काम संपवून रात्री कीर्तनाला जात असत. रात्रीचा गारवा, कीर्तनकारांचे निरुपण, तालासूरांची मंद जोड आणि पाठीला मंदिराच्या खांबाचा टेकू मिळाला, की श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागत असे. त्यांना पाहून कीर्तनकार वरचेवर हरिनामाचा गजर घेत असत. झोपी गेलेले जागे होत आणि पुन्हा डुलत डुलत कीर्तनात रंगून जात असत. याचेच वर्णन नामदेव महाराज करतात, मन विषयसुखात जेवढे रंगलेले असते, तेवढे हरिनामात रंगत नाही. 

यावर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, 'नाम घेण्यासाठी चित्त एकाग्र होईल, याची वाट बघू नका, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घेत राहा. नाम घेता घेता चित्त आपोआप एकाग्र होईल. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळले असता, त्याचे वेगळे अस्तित्त्व राहात नाही, तसेच नाम घेण्याची सवय लागल्यावर चित्त वेगळे राहात नाही. मात्र, त्यासाठी नामाची गोडी लावून घ्यावी लागते.' 

नाम घेताना मन लागत नसेल, तर त्यावर गोंदवलेकर महाराज पर्याय सुचवतात, ज्याप्रमाणे अभ्यास करताना मुलांना आपण मोठ्याने वाचायला सांगतो, जेणेकरून सगळे लक्ष वाचनावर केंद्रित होते, त्याप्रमाणे नामस्मरणही मोठ्याने घ्यावे, म्हणजे लक्ष विचलित होणार नाही. आपण घेतलेले नाम आपल्या कानावर पडून त्याचेच चिंतन होत राहील. 

दुसरा पर्याय असा, की भगवंताला केवळ देवघरात न शोधता चराचरात पाहावे. आपल्या सभोवतालीच्या गोष्टी भगवंतमय दिसू लागल्या, की आपल्याकडून चांगलेच कार्य घडत राहील आणि आपोआप देवाची भक्ती घडेल.