शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भगवंत केवळ देव्हाऱ्यात किंवा मंदिरात नाही तर चराचरात आहे - ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 08:00 IST

नाम घेताना मन लागत नसेल, तर त्यावर गोंदवलेकर महाराज पर्याय सुचवतात, नामस्मरणही मोठ्याने घ्यावे. आपण घेतलेले नाम आपल्या कानावर पडून त्याचेच चिंतन होत राहील. 

पहाटे उठून व्यायाम करा, रात्री जागून अभ्यास करा, मन लावून ग्रंथांचे वाचन करा, रोज एकदा तरी जपाची माळ ओढा, काही क्षण देवाच्या सान्निध्यात घालवा. अशा सूचनांचे पालन करा म्हटले, की त्या क्षणापासून मनाची चलबिचल सुरू होते. याउलट, सिनेमा बघताना, सहलीला जाताना, गाणी ऐकताना, नाचताना, गाताना, गप्पा मारताना मन एकाग्र करा, हे सांगावे लागत नाही. ते आपोआप होते. कारण त्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात. मात्र हरीनामाची आवड आपण लावूनच घेतलेली नसते. संत नामदेव तर उपहासाने म्हणतात, 

कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, विषयसुख।

पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्यामुळे गावकरी काम संपवून रात्री कीर्तनाला जात असत. रात्रीचा गारवा, कीर्तनकारांचे निरुपण, तालासूरांची मंद जोड आणि पाठीला मंदिराच्या खांबाचा टेकू मिळाला, की श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागत असे. त्यांना पाहून कीर्तनकार वरचेवर हरिनामाचा गजर घेत असत. झोपी गेलेले जागे होत आणि पुन्हा डुलत डुलत कीर्तनात रंगून जात असत. याचेच वर्णन नामदेव महाराज करतात, मन विषयसुखात जेवढे रंगलेले असते, तेवढे हरिनामात रंगत नाही. 

यावर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, 'नाम घेण्यासाठी चित्त एकाग्र होईल, याची वाट बघू नका, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घेत राहा. नाम घेता घेता चित्त आपोआप एकाग्र होईल. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळले असता, त्याचे वेगळे अस्तित्त्व राहात नाही, तसेच नाम घेण्याची सवय लागल्यावर चित्त वेगळे राहात नाही. मात्र, त्यासाठी नामाची गोडी लावून घ्यावी लागते.' 

नाम घेताना मन लागत नसेल, तर त्यावर गोंदवलेकर महाराज पर्याय सुचवतात, ज्याप्रमाणे अभ्यास करताना मुलांना आपण मोठ्याने वाचायला सांगतो, जेणेकरून सगळे लक्ष वाचनावर केंद्रित होते, त्याप्रमाणे नामस्मरणही मोठ्याने घ्यावे, म्हणजे लक्ष विचलित होणार नाही. आपण घेतलेले नाम आपल्या कानावर पडून त्याचेच चिंतन होत राहील. 

दुसरा पर्याय असा, की भगवंताला केवळ देवघरात न शोधता चराचरात पाहावे. आपल्या सभोवतालीच्या गोष्टी भगवंतमय दिसू लागल्या, की आपल्याकडून चांगलेच कार्य घडत राहील आणि आपोआप देवाची भक्ती घडेल.