शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 13:25 IST

जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'

आपल्याला न येणाऱ्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत. तरीदेखील एखाद दुसऱ्या विषयात पारंगत होऊन आपण स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो. परंतु, सगळ्यांना सगळ्याच गोष्टी करता आल्या असत्या तर कोणीही कोणाला किंमत दिलीच नसती. सर्वांनी मिळून मिसळून राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, याच उद्दिष्टाने देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे. आता हीच गोष्ट पहा ना...

एक कावळा उडत उडत समुद्र तटावर जातो. तिथे एक हंसांचा समुह बसलेला असतो. कावळ्याला स्वत:ची बढाई मारण्याची लहर येते. तो त्यांच्या समुहात जातो आणि आपण किती माणसाळलेलो आहोत, किती लोकप्रिय आहोत याचे दाखले देऊ लागतो. 

हंसामधला एक ज्येष्ठ हंस पुढे येऊन म्हणतो, `अरे वाह ही तर चांगली गोष्ट आहे. पण त्याचा अभिमान बाळगू नकोस आणि दुसऱ्यांना कमी समजू नकोस. तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा.'

कावळ्याला चेव चढतो. तो हंसाशी पैज लावतो आणि आपली कर्तबगारी दाखवून त्याच्याशी तुलना करण्याचे आव्हान देतो. समुहातला एक तरुण हंस पुढे येतो. तो ते आव्हान स्वीकारतो. दोन टप्प्यांमध्ये स्पर्धा होणार असे ठरते. पहिल्या टप्प्यात हंसाने कावळ्याचे अनुकरण करायचे आणि दुसऱ्या टप्प्यात कावळ्याने हंसाचे अनुकरण करायचे, असे ठरले.

 

स्पर्धा सुरू झाली. कावळा खर्जात आवाज लावून तर कधी तार सप्तकात आवाज लावून काव काव करू लागला. इथून तिथे उडू लागला. या झाडावरून त्या झाडावर जाऊ लागला. हंसाने तसे सगळे करण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे जमले नाही. जिंकलो या आविर्भावात कावळा दुसऱ्या टप्प्याला सामोरा गेला. हंस काही न बोलता समुद्राच्या दिशेने उडू लागला. कावळा त्याच्या पाठोपाठ उडू लागला. पण नुसते उडण्यात कसली आलीये कर्तबगारी, या विचाराने कावळ्याने हंसाला हटकले. दोघेही समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचले होते. हंसाला रोजचा सराव होता, पण कावळ्याला एवढावेळ उडण्याची सवय नव्हती. तो दमला. टेकायला फांदीही नव्हती. सगळीकडे फक्त पाणीच पाणी होते. कावळ्याचा अभिमान गळून पडला. त्याने हार मान्य केली. तेव्हा दमलेल्या कावळ्याला खांद्यावर बसवून हंस उडत उडत समुद्रकिनारी पोहोचला. 

त्यावेळी स्पर्धेचा निकाल लावत ज्येष्ठ हंस म्हणाला, `देवाने प्रत्येकाला जसे काही ना काही वैशिष्ट्य दिले आहे. तशी प्रत्येकात काही न काही उणीव देखील ठेवली आहे. म्हणून जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'