शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 13:25 IST

जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'

आपल्याला न येणाऱ्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत. तरीदेखील एखाद दुसऱ्या विषयात पारंगत होऊन आपण स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो. परंतु, सगळ्यांना सगळ्याच गोष्टी करता आल्या असत्या तर कोणीही कोणाला किंमत दिलीच नसती. सर्वांनी मिळून मिसळून राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, याच उद्दिष्टाने देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे. आता हीच गोष्ट पहा ना...

एक कावळा उडत उडत समुद्र तटावर जातो. तिथे एक हंसांचा समुह बसलेला असतो. कावळ्याला स्वत:ची बढाई मारण्याची लहर येते. तो त्यांच्या समुहात जातो आणि आपण किती माणसाळलेलो आहोत, किती लोकप्रिय आहोत याचे दाखले देऊ लागतो. 

हंसामधला एक ज्येष्ठ हंस पुढे येऊन म्हणतो, `अरे वाह ही तर चांगली गोष्ट आहे. पण त्याचा अभिमान बाळगू नकोस आणि दुसऱ्यांना कमी समजू नकोस. तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा.'

कावळ्याला चेव चढतो. तो हंसाशी पैज लावतो आणि आपली कर्तबगारी दाखवून त्याच्याशी तुलना करण्याचे आव्हान देतो. समुहातला एक तरुण हंस पुढे येतो. तो ते आव्हान स्वीकारतो. दोन टप्प्यांमध्ये स्पर्धा होणार असे ठरते. पहिल्या टप्प्यात हंसाने कावळ्याचे अनुकरण करायचे आणि दुसऱ्या टप्प्यात कावळ्याने हंसाचे अनुकरण करायचे, असे ठरले.

 

स्पर्धा सुरू झाली. कावळा खर्जात आवाज लावून तर कधी तार सप्तकात आवाज लावून काव काव करू लागला. इथून तिथे उडू लागला. या झाडावरून त्या झाडावर जाऊ लागला. हंसाने तसे सगळे करण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे जमले नाही. जिंकलो या आविर्भावात कावळा दुसऱ्या टप्प्याला सामोरा गेला. हंस काही न बोलता समुद्राच्या दिशेने उडू लागला. कावळा त्याच्या पाठोपाठ उडू लागला. पण नुसते उडण्यात कसली आलीये कर्तबगारी, या विचाराने कावळ्याने हंसाला हटकले. दोघेही समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचले होते. हंसाला रोजचा सराव होता, पण कावळ्याला एवढावेळ उडण्याची सवय नव्हती. तो दमला. टेकायला फांदीही नव्हती. सगळीकडे फक्त पाणीच पाणी होते. कावळ्याचा अभिमान गळून पडला. त्याने हार मान्य केली. तेव्हा दमलेल्या कावळ्याला खांद्यावर बसवून हंस उडत उडत समुद्रकिनारी पोहोचला. 

त्यावेळी स्पर्धेचा निकाल लावत ज्येष्ठ हंस म्हणाला, `देवाने प्रत्येकाला जसे काही ना काही वैशिष्ट्य दिले आहे. तशी प्रत्येकात काही न काही उणीव देखील ठेवली आहे. म्हणून जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'