शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 13:25 IST

जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'

आपल्याला न येणाऱ्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत. तरीदेखील एखाद दुसऱ्या विषयात पारंगत होऊन आपण स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो. परंतु, सगळ्यांना सगळ्याच गोष्टी करता आल्या असत्या तर कोणीही कोणाला किंमत दिलीच नसती. सर्वांनी मिळून मिसळून राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, याच उद्दिष्टाने देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे. आता हीच गोष्ट पहा ना...

एक कावळा उडत उडत समुद्र तटावर जातो. तिथे एक हंसांचा समुह बसलेला असतो. कावळ्याला स्वत:ची बढाई मारण्याची लहर येते. तो त्यांच्या समुहात जातो आणि आपण किती माणसाळलेलो आहोत, किती लोकप्रिय आहोत याचे दाखले देऊ लागतो. 

हंसामधला एक ज्येष्ठ हंस पुढे येऊन म्हणतो, `अरे वाह ही तर चांगली गोष्ट आहे. पण त्याचा अभिमान बाळगू नकोस आणि दुसऱ्यांना कमी समजू नकोस. तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा.'

कावळ्याला चेव चढतो. तो हंसाशी पैज लावतो आणि आपली कर्तबगारी दाखवून त्याच्याशी तुलना करण्याचे आव्हान देतो. समुहातला एक तरुण हंस पुढे येतो. तो ते आव्हान स्वीकारतो. दोन टप्प्यांमध्ये स्पर्धा होणार असे ठरते. पहिल्या टप्प्यात हंसाने कावळ्याचे अनुकरण करायचे आणि दुसऱ्या टप्प्यात कावळ्याने हंसाचे अनुकरण करायचे, असे ठरले.

 

स्पर्धा सुरू झाली. कावळा खर्जात आवाज लावून तर कधी तार सप्तकात आवाज लावून काव काव करू लागला. इथून तिथे उडू लागला. या झाडावरून त्या झाडावर जाऊ लागला. हंसाने तसे सगळे करण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे जमले नाही. जिंकलो या आविर्भावात कावळा दुसऱ्या टप्प्याला सामोरा गेला. हंस काही न बोलता समुद्राच्या दिशेने उडू लागला. कावळा त्याच्या पाठोपाठ उडू लागला. पण नुसते उडण्यात कसली आलीये कर्तबगारी, या विचाराने कावळ्याने हंसाला हटकले. दोघेही समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचले होते. हंसाला रोजचा सराव होता, पण कावळ्याला एवढावेळ उडण्याची सवय नव्हती. तो दमला. टेकायला फांदीही नव्हती. सगळीकडे फक्त पाणीच पाणी होते. कावळ्याचा अभिमान गळून पडला. त्याने हार मान्य केली. तेव्हा दमलेल्या कावळ्याला खांद्यावर बसवून हंस उडत उडत समुद्रकिनारी पोहोचला. 

त्यावेळी स्पर्धेचा निकाल लावत ज्येष्ठ हंस म्हणाला, `देवाने प्रत्येकाला जसे काही ना काही वैशिष्ट्य दिले आहे. तशी प्रत्येकात काही न काही उणीव देखील ठेवली आहे. म्हणून जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'