शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

हरी मदतीला आला होता, पण शेठजी खाटल्यावरच बसून राहिला, अन...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 11, 2021 11:41 IST

देव म्हणतो, 'तुम्ही ९९ टक्के प्रयत्न केलेत, तर १ टक्क्याची उणीव मी भरून काढत तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश देतो. परंतु, तुम्ही ९९ टक्के माझ्यावरच विसंबून राहिलात, तर मी १ टक्कासुद्धा तुम्हाला यश देणार नाही.'

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपल्याला फार वाईट खोड असते, ती म्हणजे 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!' असे म्हणत निर्धास्त राहणे. हा भगवंतावर टाकलेला विश्वास नाही, तर अंधविश्वास आहे. यालाच दुसऱ्या शब्दात आळशीपणा असे म्हणतात. असे आळशी लोक देवाला अजिबात आवडत नाहीत. हात, पाय, कान, नाक, डोळे सगळे काही देऊनही `देवाने आम्हाला काहीच दिले नाही' असा सूर लावणाऱ्या लोकांचा देवाला राग येतो. तरी बिचारा वेळोवेळी आपल्याला मदतीचा हात देत असतो. मात्र, आपणच त्याला ओळखायला कमी पडतो.

एकदा एका गावात पूर येतो. गावातली घरे, गोठे, बैलगाड्या, माणसे, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून जातात. गावातल्या एका शेठजीचे घर बऱ्यापैकी उंचावर असते. त्याला वाटते, आपण सुखरूप आहोत. परंतु हळू हळू नदीचे पाणी वाढू लागते. ते शेठजींच्या घरात घुसू लागते. 

हेही वाचा : पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!

अग्निशमन दलाचे लोक धावून येतात. पुराच्या पाण्यातून शक्य तेवढे गावकरी, जनावरे यांना बाहेर काढतात. नदीच्या पल्याड असलेल्या टेकाडावर शेठजींचा बंगला असतो. नदीचे पाणी घरात शिरू लागल्यावर शेठजी घाबरून छतावर जाऊन बसतात. पलीकडून लोक त्यांना पाहत असतात. बचावकार्यासाठी आलेले जवान शेठजींसाठी जीवावर उदार होऊन नौका घेऊन जातात. शेठजींना आवाज देतात. बाजूच्या झाडाच्या मदतीने खाली उतरायला सांगतात. शेठजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत म्हणतात, `असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!'

शेठजी घाबरून पाण्यात उतरण्याचे धैर्य करत नाहीत, असा समज करून सुरक्षारक्षक माघारी येतात. फोन करून हेलिकॉप्टर मागवतात. साधारण दोन अडीच तासांनी हेलिकॉप्टर येते. शेठजींच्या बंगल्यावर घिरट्या घालू लागते. सुरक्षा जवान हेलिकॉप्टरमधून शिडी खाली सोडून शेठजींना शिडी धरून वर यायला सांगतात. आम्ही तुम्हाला सुरक्षित वर ओढून घेऊ, हाही दिलासा देतात. परंतु, शेठजी तेव्हाही हट्ट धरून बसले, 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!'

एका माणसामागे एवढा वेळ खर्च करूनही तो प्रतिसाद देत नाही पाहून गावकऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी गावतल्या इतर दुर्घटनास्थळी बचावकार्यार्थ मोर्चा वळवला. शेठजी देवाचे नाव घेत रात्रभर छतावर कुडकुडत बसले. थंडीने, भुकेने, तहानेने तिसऱ्या दिवशी शेठजींचा मृत्यू झाला. मेल्यावर शेठजींचा आत्मा देवासमोर जाऊन तक्रार करू लागला. अविश्वास व्यक्त करू लागला. दोष देऊ लागला. देवाने सगळे निमुटपणे ऐकून घेतले आणि शेठजींना 'काय घडले त्या रात्री' याची चित्रफित दाखवली. देव म्हणाला, 'तुझ्या रक्षणासाठी मी माझ्या मूळ रूपात येणे तुला अपेक्षित होते का? तसा आलो असतो, तरी तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता. कारण या रूपात तू फक्त मला मंदिरात पाहिले आहेस, प्रत्यक्षात नाही. म्हणून बचावासाठी आलेले जवान, गावकरी ही माझीच रूपे होती. परंतु तुला इतक्यांदा मदतीचा हात देऊनही तू स्वत:हून एकही पाऊल पुुढे टाकले नाहीस, यात चूक कोणाची? 

सगळाच भार माझ्यावर टाकून कसे चालेल? जो प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी मी सदैव असतो. त्याची मदत करतो. एवढेच काय, तर तुझ्यासारख्या आळशी लोकांनाही पुढे जाण्याची संधी देतो. एक-दोनदा नाही, तर वारंवार देतो. परंतु, तुम्हाला आयत्या गोष्टींची एवढी सवय लागली आहे, की कष्टाची तयारीच उरलेली नाही. तुम्ही ९९ टक्के प्रयत्न केलेत, तर १ टक्क्याची उणीव मी भरून काढत तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश देतो. परंतु, तुम्ही ९९ टक्के माझ्यावरच विसंबून राहिलात, तर मी १ टक्कासुद्धा तुम्हाला यश देणार नाही. लक्षात ठेवा, `प्रयत्नांती परमेश्वर....प्रयत्नाआधी नाही!'

हेही वाचा : तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'