शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 19, 2020 16:24 IST

हृदय हे परमात्म्याला साठवण्यासाठी बनवलेले असते. परमात्म्याला मनात साठवायचे सोडून आपण इतर अनेक गोष्टी हृदयात साठवून ठेवतो.

ज्योत्स्ना गाडगीळ 

एक सम्राट होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या दारावरून कोणीही याचक विन्मुख होऊन परतत नसे, अशी त्याची ख्याती होती. दरदिवशी कामातून ठराविक वेळ काढून तो दानधर्म करत असे. एकदा त्याच्या दरबाराबाहेर याचकांची अशीच गर्दी जमली होती. त्याच गर्दीत एक फकीरही आला होता.

सगळे जण तृप्त होऊन, आनंदून, सम्राटाला आशीर्वाद देऊन परत जात होते. फकिराची पाळी आली. सम्राट म्हणाले, `याचका, तुला हवे ते माग!' याचकाने आपले भिक्षापात्र सम्राटापुढे केले व म्हणाला, `महाराज, माझे हे पात्र सोन्याच्या नाण्यांनी भरून टाक.' सम्राटाला वाटले, ही मागणी सरळ व सोपी आहे. त्याने सेवकाकडून नाणी आनवली व तो ती पात्रात टाकू लागला. परंतु, गंमत अशी की, कितीही नाणी टाकली, तरी पात्र रिकामेच दिसत होते. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!

सम्राटाचा पडलेला चेहरा पाहून याचक म्हणाला, `महाराज, तुम्हाला पात्र भरता येत नाही, असे दिसते. मी आपल्या रिकाम्या पात्राने परत जातो. जास्तीत जास्त काय, प्रजा म्हणेल, `आपले सम्राट, वचन पूर्ण करू शकले नाहीत.'

हे ऐकून सम्राट चिडला. त्याने आपल्या खजिन्यातील नाणी आणून पात्रात ओतली. पण व्यर्थ पात्र रिकामे ते रिकामेच.

तेव्हा सम्राट म्हणाला, `याचका, हे कसले तुझे अद्भुत पात्र?'

त्यावर याचकाने हसून सांगितले, 'सम्राट, हे काही जादूचे पात्र नाही. याचे रहस्य अगदी साधे आहे. हे माणसाच्या हृदयाचे बनलेले आहे. तुम्हाला माहित नाही का? माणसाचे हृदय कधीच भरत नाही. संपत्तीने नाही, अधिकाराने नाही, ज्ञानाने नाही. कारण अशा गोष्टींनी भरण्यासाठी मुळात बनविलेच नाही. हे सत्य ज्याला समजले नाही, तो जितके मिळवतो, तितका तो दरिद्री होत जातो. काही प्राप्त झाले, म्हणून हृदयात उत्पन्न होणाऱ्या इच्छा शांत होत नाहीत.

हृदय हे परमात्म्याला साठवण्यासाठी बनवलेले असते. परमात्म्याला मनात साठवायचे सोडून आपण इतर अनेक गोष्टी हृदयात साठवून ठेवतो. चांगल्या-वाईट गोष्टींनी हृदयाची सगळी जागा व्यापून जाते. त्यात नवनव्या गोष्टींची भरच पडत राहते. या विषयांमध्ये गुंतलेली व्यक्ती ईश्वराला विसरून जाते. याउलट ज्या व्यक्तीच्या हृदयात केवळ ईश्वर भरलेला असतो, तिचे हृदय कधीच रिकामे होत नाही. ते केवळ परमानंदाचा अनुभव घेते. त्यामुळे, हे सम्राट तुम्हीसुद्धा स्वत:ला परमेश्वराच्या कार्याचे माध्यम समजा. दानाचा कैफ अहंकाराला खतपाणी घालतो आणि अहंकारी हृदयात परमेश्वर राहूच शकत नाही.'

म्हणून तुम्ही आपले कर्तव्य बजावत राहा आणि म्हणा, 'मला शांती हवी, संतृप्ती हवी, दुसरे काही नको.'

हे ऐकून सम्राटाने याचकाचे पाय धरले.

हेही वाचा: ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट