शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 19, 2020 16:24 IST

हृदय हे परमात्म्याला साठवण्यासाठी बनवलेले असते. परमात्म्याला मनात साठवायचे सोडून आपण इतर अनेक गोष्टी हृदयात साठवून ठेवतो.

ज्योत्स्ना गाडगीळ 

एक सम्राट होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या दारावरून कोणीही याचक विन्मुख होऊन परतत नसे, अशी त्याची ख्याती होती. दरदिवशी कामातून ठराविक वेळ काढून तो दानधर्म करत असे. एकदा त्याच्या दरबाराबाहेर याचकांची अशीच गर्दी जमली होती. त्याच गर्दीत एक फकीरही आला होता.

सगळे जण तृप्त होऊन, आनंदून, सम्राटाला आशीर्वाद देऊन परत जात होते. फकिराची पाळी आली. सम्राट म्हणाले, `याचका, तुला हवे ते माग!' याचकाने आपले भिक्षापात्र सम्राटापुढे केले व म्हणाला, `महाराज, माझे हे पात्र सोन्याच्या नाण्यांनी भरून टाक.' सम्राटाला वाटले, ही मागणी सरळ व सोपी आहे. त्याने सेवकाकडून नाणी आनवली व तो ती पात्रात टाकू लागला. परंतु, गंमत अशी की, कितीही नाणी टाकली, तरी पात्र रिकामेच दिसत होते. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!

सम्राटाचा पडलेला चेहरा पाहून याचक म्हणाला, `महाराज, तुम्हाला पात्र भरता येत नाही, असे दिसते. मी आपल्या रिकाम्या पात्राने परत जातो. जास्तीत जास्त काय, प्रजा म्हणेल, `आपले सम्राट, वचन पूर्ण करू शकले नाहीत.'

हे ऐकून सम्राट चिडला. त्याने आपल्या खजिन्यातील नाणी आणून पात्रात ओतली. पण व्यर्थ पात्र रिकामे ते रिकामेच.

तेव्हा सम्राट म्हणाला, `याचका, हे कसले तुझे अद्भुत पात्र?'

त्यावर याचकाने हसून सांगितले, 'सम्राट, हे काही जादूचे पात्र नाही. याचे रहस्य अगदी साधे आहे. हे माणसाच्या हृदयाचे बनलेले आहे. तुम्हाला माहित नाही का? माणसाचे हृदय कधीच भरत नाही. संपत्तीने नाही, अधिकाराने नाही, ज्ञानाने नाही. कारण अशा गोष्टींनी भरण्यासाठी मुळात बनविलेच नाही. हे सत्य ज्याला समजले नाही, तो जितके मिळवतो, तितका तो दरिद्री होत जातो. काही प्राप्त झाले, म्हणून हृदयात उत्पन्न होणाऱ्या इच्छा शांत होत नाहीत.

हृदय हे परमात्म्याला साठवण्यासाठी बनवलेले असते. परमात्म्याला मनात साठवायचे सोडून आपण इतर अनेक गोष्टी हृदयात साठवून ठेवतो. चांगल्या-वाईट गोष्टींनी हृदयाची सगळी जागा व्यापून जाते. त्यात नवनव्या गोष्टींची भरच पडत राहते. या विषयांमध्ये गुंतलेली व्यक्ती ईश्वराला विसरून जाते. याउलट ज्या व्यक्तीच्या हृदयात केवळ ईश्वर भरलेला असतो, तिचे हृदय कधीच रिकामे होत नाही. ते केवळ परमानंदाचा अनुभव घेते. त्यामुळे, हे सम्राट तुम्हीसुद्धा स्वत:ला परमेश्वराच्या कार्याचे माध्यम समजा. दानाचा कैफ अहंकाराला खतपाणी घालतो आणि अहंकारी हृदयात परमेश्वर राहूच शकत नाही.'

म्हणून तुम्ही आपले कर्तव्य बजावत राहा आणि म्हणा, 'मला शांती हवी, संतृप्ती हवी, दुसरे काही नको.'

हे ऐकून सम्राटाने याचकाचे पाय धरले.

हेही वाचा: ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट