शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

देवाने प्रत्येकाला जगण्याचे उद्दिष्ट दिले आहे, तुम्हाला ते सापडले नसेल तर ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:00 IST

एक ना एक दिवस आपणा सर्वाना स्वतःची किंमत आणि जगण्याचे उद्दिष्ट नक्की गवसेल. तोवर धैर्य सोडू नका आणि सत्कर्म करत आनंदाने जगत राहा. 

आयुष्यात बऱ्याचदा अशी वेळ येते, जेव्हा 'कशासाठी जगतो आहोत आम्ही' असे विचार आपल्या मनात डोकावतात. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याअर्थी आपल्याला आजचा दिवस देवाने दाखवला आहे,त्यामागे नक्कीच त्याचे काही ना काही उद्दिष्ट आहे. जगण्याचे उद्दिष्ट, ध्येय कधी स्वतःला शोधावे लागते, तर कधी ते आपणहून सापडते. ते उद्दिष्ट सापडले, की जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. कसा ते पहा...

एका शहरात सुंदर बाग होती. बागेत नानाविध फुले होती. छोटे छोटे तलाव होते, कारंजी होती. ही सुंदर बाग पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत असत. त्या बागेत एक सुंदर गुलाबाचे रोपटे होते. त्या रोपाला बारमाही सुंदर व सुंगंधी गुलाब येत असत. लोक वाट वाकडी करून त्या गुलाबाच्या रोपट्याला वळसा घालून जात असत. त्या रोपट्याचे एक पान नेहमी नाराज असत. त्याला वाटे, सगळे जण इथे गुलाब पाहायला येतात. आपण असूनही कोणाला आपले कौतुक नाही. मग आपल्या अस्तित्त्वाचा नेमका फायदा तरी काय? 

त्याचवेळेस सोसाट्याचा वारा सुटतो. दुःखी असणारे ते पान वाऱ्याबरोबर उडत तलावात येऊन पडते. ते पाण्यावर तरंगत असते. थोड्या वेळाने वातावरण शांत होते. त्यावेळेस पानाचे लक्ष तळ्याकाठी अडकलेल्या मुंगीकडे जाते. तिला वर जाता येत नव्हते आणि पाण्यात पडता येत नव्हते. पानाने मुंगीला विचारले, 'मी करू शकतो का?'मुंगी म्हणाली, 'पण तू तर पाण्यात आहेस, तू बुडणार नाहीस का?'पान म्हणाले, 'नाही, देवाने मला तरंगून जाण्याचे वरदान दिले आहे. मी तुला माझ्या पाठीवर बसवून तळ्याच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षित पोहोचवू शकतो.'

मुंगीने पानाची मदत घेतली. ती तळ्याच्या दुसऱ्या काठावर सुरक्षित पणे पोहोचली. उतरल्यावर तिने पानाचे आभार मानले व म्हणाली, 'तुझ्यामुळे माझे प्राण वाचले.'त्यावर पान म्हणाले, 'उलट मीच तुझे आभार मानले पाहिजेत, कारण तुझ्यामुळे मला मिळालेले वरदान कोणते याची मला जाणीव झाली आणि मी कोणाच्या उपयोगी पडू शकलो याचा आनंद झाला.'

अशा रीतीने एक ना एक दिवस आपणा सर्वाना स्वतःची किंमत आणि जगण्याचे उद्दिष्ट नक्की गवसेल. तोवर धैर्य सोडू नका आणि सत्कर्म करत आनंदाने जगत राहा.