शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

तुम्ही रोज गायत्री मंत्र म्हणता? ‘हे’ नियम पाळणे अत्यावश्यक; चुका टाळा, अन्यथा नुकसान अटळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 15:40 IST

Gayatri Mantra Rules in Marathi: हिंदू धर्मांत सर्वाधिक महत्त्व असलेल्या गायत्री मंत्राच्या नित्य पठणाचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र, काही नियम पाळणे आवश्यक आहे. जाणून घ्या...

भारतात प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. देशात विविध देवतांची शेकडो मंदिरे, प्रार्थनास्थळे असल्याचे दिसते. यातच कोट्यवधी भाविक दररोज अगदी न चुकता आपले आराध्य, कुलदेवता यांचे नामस्मरण, जप, पूजन करत असतात. तसेच प्राचीन ग्रंथात आपल्याला देवतांचे नानाविध मंत्र, उपासना पद्धती, श्लोक, स्तोत्रे आढळून येतात. हिंदू धर्मात गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. गायत्री मंत्राचे अनेकविध फायदे सांगितले जातात. गायत्री मंत्राचा जप अतिशय शुभ तसेच उपयुक्त मानला जातो. मात्र, या गायत्री मंत्राचे काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. (Gayatri Mantra Rules in Marathi)

गायत्री देवी ही त्रिदेवाची आराध्य असल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला विशेष महत्त्व आहे. ब्रह्मऋषी विश्वामित्रांनी गायत्री मंत्राचा प्रसार केला.त्यांनी गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे सांगितले, अशी मान्यता आहे. गायत्री मंत्राचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात आढळतो. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. सर्व विधींमध्ये त्याचा जप केला जातो. गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती, ऑफिसमध्ये येणाऱ्या अडचणी इत्यादी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. गायत्री मंत्राचे अनेक फायदे आहेत. मात्र, यासंबंधी नियमांची काळजी घेतली नाही, तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. (Gayatri Mantra Significance And Auspicious Benefits)

गायत्री मंत्र पठणाचे शुभफल

- गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि जीवनात आनंद मिळतो. हा सर्वात फायदेशीर मंत्र मानला जातो.

- गायत्री मंत्राच्या नुसत्या उच्चाराने वातावरण शुद्ध होते.या मंत्राने मनाची एकाग्रता वाढते. या मंत्राने मन मजबूत होते.

- गायत्री मंत्राचा जप केल्याने शरीराच्या अवयवांवरही सकारात्मक प्रभाव पडतो आणि त्यामध्ये ऊर्जा प्रवाहित होते.

- गायत्री मंत्राने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. हृदयाला फायदा होतो.

- गायत्री मंत्राचा नियमित जप केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते.

गायत्री मंत्राचे महत्त्वाचे नियम

- धार्मिक ग्रंथांनुसार, मंत्राचा उच्चार स्पष्टपणे केला जातो. जप करताना चुकीचा उच्चार केल्यास व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

- सूर्योदयापूर्वी गायत्री मंत्राचा जप करावा.या मंत्राचा जप दुपारीही करता येतो.

- गायत्री मंत्राचा जप सायंकाळी, सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर करावा.

- गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ व सुती वस्त्रे परिधान करून कोणतेही आसन घालावे.

- गायत्री मंत्राचा जप बसून करावा. नामजपासाठी तुळशी किंवा चंदनाची माळ वापरावी.

- गायत्री मंत्राचा जप १०८ वेळा करावा. असे केल्याने चांगले परिणाम मिळतात. गायत्री मंत्राचा जप करताना रुद्राक्षाची माळ शुभ मानली जाते. 

- गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी खाण्यापिण्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. 

- गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धी नांदते. सकारात्मक ऊर्जा राहते.  

टॅग्स :spiritualअध्यात्मिक