शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

तुम्ही रोज गायत्री मंत्र म्हणता? ‘हे’ नियम पाळणे अत्यावश्यक; चुका टाळा, अन्यथा नुकसान अटळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 15:40 IST

Gayatri Mantra Rules in Marathi: हिंदू धर्मांत सर्वाधिक महत्त्व असलेल्या गायत्री मंत्राच्या नित्य पठणाचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र, काही नियम पाळणे आवश्यक आहे. जाणून घ्या...

भारतात प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. देशात विविध देवतांची शेकडो मंदिरे, प्रार्थनास्थळे असल्याचे दिसते. यातच कोट्यवधी भाविक दररोज अगदी न चुकता आपले आराध्य, कुलदेवता यांचे नामस्मरण, जप, पूजन करत असतात. तसेच प्राचीन ग्रंथात आपल्याला देवतांचे नानाविध मंत्र, उपासना पद्धती, श्लोक, स्तोत्रे आढळून येतात. हिंदू धर्मात गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. गायत्री मंत्राचे अनेकविध फायदे सांगितले जातात. गायत्री मंत्राचा जप अतिशय शुभ तसेच उपयुक्त मानला जातो. मात्र, या गायत्री मंत्राचे काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. (Gayatri Mantra Rules in Marathi)

गायत्री देवी ही त्रिदेवाची आराध्य असल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला विशेष महत्त्व आहे. ब्रह्मऋषी विश्वामित्रांनी गायत्री मंत्राचा प्रसार केला.त्यांनी गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे सांगितले, अशी मान्यता आहे. गायत्री मंत्राचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात आढळतो. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. सर्व विधींमध्ये त्याचा जप केला जातो. गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती, ऑफिसमध्ये येणाऱ्या अडचणी इत्यादी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. गायत्री मंत्राचे अनेक फायदे आहेत. मात्र, यासंबंधी नियमांची काळजी घेतली नाही, तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. (Gayatri Mantra Significance And Auspicious Benefits)

गायत्री मंत्र पठणाचे शुभफल

- गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि जीवनात आनंद मिळतो. हा सर्वात फायदेशीर मंत्र मानला जातो.

- गायत्री मंत्राच्या नुसत्या उच्चाराने वातावरण शुद्ध होते.या मंत्राने मनाची एकाग्रता वाढते. या मंत्राने मन मजबूत होते.

- गायत्री मंत्राचा जप केल्याने शरीराच्या अवयवांवरही सकारात्मक प्रभाव पडतो आणि त्यामध्ये ऊर्जा प्रवाहित होते.

- गायत्री मंत्राने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. हृदयाला फायदा होतो.

- गायत्री मंत्राचा नियमित जप केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते.

गायत्री मंत्राचे महत्त्वाचे नियम

- धार्मिक ग्रंथांनुसार, मंत्राचा उच्चार स्पष्टपणे केला जातो. जप करताना चुकीचा उच्चार केल्यास व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

- सूर्योदयापूर्वी गायत्री मंत्राचा जप करावा.या मंत्राचा जप दुपारीही करता येतो.

- गायत्री मंत्राचा जप सायंकाळी, सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर करावा.

- गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ व सुती वस्त्रे परिधान करून कोणतेही आसन घालावे.

- गायत्री मंत्राचा जप बसून करावा. नामजपासाठी तुळशी किंवा चंदनाची माळ वापरावी.

- गायत्री मंत्राचा जप १०८ वेळा करावा. असे केल्याने चांगले परिणाम मिळतात. गायत्री मंत्राचा जप करताना रुद्राक्षाची माळ शुभ मानली जाते. 

- गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी खाण्यापिण्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. 

- गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धी नांदते. सकारात्मक ऊर्जा राहते.  

टॅग्स :spiritualअध्यात्मिक