शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Gayatri Jayanti 2024: गायत्री जयंतीनिमित्त जाणून घ्या गायत्री मंत्राचे लाभ आणि पावित्र्य राखण्याचे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 07:00 IST

Gayatri Jayanti 2024: १७ जून रोजी गायत्री जयंती आहे; गायत्री मंत्रातून चार वेदांची उत्पत्ती झाली, त्याअर्थी हा मंत्र किती प्रभावी असेल याची कल्पना करा आणि नियम जाणून घ्या. 

गायत्री मातेच्या वैभवाचे पवित्र वर्णन शास्त्रात आढळते. तिचा गौरव गायत्री मंत्रात आहे. गायत्री मंत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे सार आहे. सर्व ऋषी-मुनि मुक्त कंठाने गायत्री मातेचे गुणगान गात असत. सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये, गायत्रीचा गौरव केला जातो. गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट मंत्र मानला जातो. या मंत्राचे महत्त्व माहीत असल्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीयाला तो मुखोद्गत असतो. अनेक संशोधनाचेसार सांगितले जाते की गायत्री मंत्राचा जप केल्यास बरेच फायदे होतात.

ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।

गायत्री मंत्रांच्या जपासंदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊया-

1. एकूण वेदांची संख्या चार आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्री मंत्रांचा उल्लेख आहे. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र आणि देवता सावित्री आहे.

२. या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो नियमितपणे तीन वेळा नामस्मरण करतो त्याच्याभोवती सकारात्मक शक्तीचे वलय तयार होते. 

३. गायत्री मंत्राचा नित्य जप केल्यास सदैव सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत राहते. 

४. या मंत्राचा जप केल्याने बौद्धिक क्षमतेत वाढ होते. अडचणीतून मार्ग काढण्यास मदत होते. 

५. सूर्यास्ताच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप केल्यास त्या मंत्राचा प्रभाव अधिक पडतो. 

६. सूर्यास्ताच्या वेळेस शक्य नसल्यास दिवसभरात जेव्हा शांत वेळ मिळेल तेव्हा हा जप करावा, परंतु रात्री हा जप करू नये. 

७. गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे असतात. ही चोवीस अक्षरे चोवीस शक्ती आणि कर्तृत्त्वाचे प्रतीक आहेत. यामुळेच ऋषीमुनींनी भौतिक जगातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र म्हणून गायत्री मंत्राचे वर्णन केले आहे.

८. आर्थिक बाबतीत अडचण असल्यास गायत्री मंत्राचा जप करा असे ज्योतिष शास्त्रात सुचवले जाते. 

९. हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की गायत्री हा बुद्धीचा मंत्र आहे, म्हणूनच त्याला मंत्रांचा मुकुट रत्न म्हटले गेले.

१०. नियमितपणे १० वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी तीव्र होते आणि दीर्घकाळ कोणत्याही विषयाची आठवण ठेवण्याची क्षमता वाढते. हा मंत्र व्यक्तीची बुद्धी आणि विवेक सुधारण्यासाठी देखील कार्य करतो.