शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Gauri Poojan 2022 : वेषांतर करून गौराई आली, सुख, संपत्ती, वैभवाचा कानमंत्र देऊन गेली; त्याची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:45 IST

Gauri Poojan 2022 : पौराणिक कथांमधून बोध घेत आधुनिकतेशी सांगड घातली तरच संस्कृतीशी नाळ जोडली जाईल. 

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झाले, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, `आई, आपल्या घरी गौर आण.'

आई म्हणाली, `बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही वडिलांकडे जा, बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन.' मुले उठली. वडिलांकडे गेली. त्यांना म्हणाली, `बाबा, बाजारात जा, घावनघाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणील.' 

वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनातून फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे इलाज नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली.

जवळच एक म्हातारी सवाशीण होती. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधन केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. 

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो मडके कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. तिने पेज केली. सर्वांनी पोटभर खाल्ली. आनंदाने सगळे झोपले.

सकाळ झाली. आजीने ब्राह्मणाला उठवले आणि त्याच्या बायकोला न्हाऊ घालायला सांगितले. देवाला घावनघाटले कर म्हणाली. ब्राह्मणाने आजीचा निरोप बायकोला दिला. आपण उठून भिक्षेला गेला. बायकोने आजीला न्हाऊ घातले. तोवर ब्राह्मण भरपूर भिक्षा घेऊन आला. सगळे आनंदात होते. ब्राह्मणाच्या बायकोने वेळ न दवडता स्वयंपाक केला. आजीसकट सगळे जण घावनघाटल्याचे जेवण जेवले. तृप्त झाले. आजीने उद्या खीर कर असे ब्राह्मणाच्या बायकोला सांगितले. देवावर भार टाकून तिनेही तत्काळ मान डोलवत हो म्हटले. 

दुसऱ्या दिवशी ब्राह्मण घराबाहेर पडणार, तेव्हा आजी म्हणाली, `तू काळजी करू नका. तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचे दूध काढ.'

ब्राह्मणाने तसे केले. संध्याकाळी खीरीचे जेवण झाले. दुसऱ्या दिवशी आजीने ब्राह्मणाला सांगितले, `खूप पाहुणचार घेतला आता मला माझ्या घरी पोहोचव.' तेव्हा ब्राह्मण म्हणाला, `आजी तुझ्यामुळे माझे प्राण वाचले, मी खंबीरपणे पुन्हा माझे कार्य सुरू केले. लोकांना ज्ञानदान करून भिक्षा मिळवू लागलो. माझ्या या वैभवात अशीच वाढ होत राहावी म्हणून उपाय सांगशील का?'

यावर आजी म्हणाली, `तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक. मडक्यांवर टाक. पेटीत टाक. गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कसली कमतरता राहणार नाही. पण या सगळ्याबरोबर प्रयत्न, कष्ट सुरू ठेव. कर्तव्यात कसूर ठेवू नकोस.'

ब्राह्मणाने बरं म्हटले. तिच्या रूपाने आलेल्या गौरीची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने व्रत सांगितले, `भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे, दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. दुसरे दिवशी घावनगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे अक्षय्य सुख मिळेल. संतती संपत्ती मिळेल.' 

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण!

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी