शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

Gaur Gopal Das: सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य; गौर गोपालदास म्हणतात, जीवन आइस्क्रीमसारखं जगलं पाहिजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:22 IST

Gaur Gopal Das: सध्याच्या तरुणाईच्या मनःस्थितीचे योग्य वर्णन करताना गौर गोपाल दास यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या...

Gaur Gopal Das: आताच्या घडीला तरुण मंडळी सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. जीवनातील अगदी छोट्या छोट्या क्षणापासून ते महत्त्वाच्या बाबींपर्यंत अनेकविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, सोशल मीडिया तरुणाईसाठी घातक ठरू शकते, असे अनेक मतप्रवाह ऐकायला मिळतात. यातच मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य येत आहे, असे सांगत जीवन आइस्क्रीमप्रमाणे जगले पाहिजे, असे म्हटले आहे. 

जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना, देशातील तरुण पिढी दिवसेंदिवस अधिक हताश, निराश होताना दिसत आहे. हे सोशल मीडियामुळे होत आहे. सोशल मीडियामुळे आनंदही अनुभवता येऊ शकतो. मात्र, त्याचे माध्यम आणि प्रमाण योग्य असायला हवे. सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास प्रसन्नता, आनंद प्राप्त करता येऊ शकेल. अन्यथा सोशल मीडियाचे माध्यम एखाद्या शापापेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. 

दुसऱ्याच्या आयुष्यातून धडा घेऊन स्वतःचे आयुष्य घडवा

सोशल मीडियावर आपल्या पोस्टला किती लाइक्स मिळाले, किती जणांनी पोस्ट पाहिली तसेच दुसऱ्याच्या पोस्टचे लाइक्स, कमेंट्स यांमुळे तुलना वाढतेय. सोशल मीडियावर कधी कुणी आपले अपयश, कमतरता शेअर करत नाही. केवळ चांगल्या गोष्टीच शेअर केल्या जातात. यामुळे नकळतपणे होणारी तुलना ही एकतर्फी केली जाते. मी नेहमी सांगतो की, समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पाहायला हवे. त्यातून आपण कॉम्प्लेस न बाळगता, त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य कसे सुधारता येईल, ते कसे चांगले होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे गौर गोपाल दास यांनी नमूद केले. 

जीवन आइस्क्रीमसारखे जगले पाहिजे...

गौर गोपाल दास यांनी जीवन कसे असावे, याबाबत अगदी सोप्या शब्दांत सांगितले. त्यावेळी त्यांनी आइस्क्रीम आणि मेणबत्तीची समर्पक उदाहरणे दिली. जेव्हा आपण आइस्क्रीम खातो, त्यातून जीवनाचा धडा घेऊ शकतो. आइस्क्रीम वितळण्याआधी ते आपण संपवतो. तसेच जीवन झिजण्याआधी, वितळण्याआधी ते जगून घ्यायला हवे. जीवनाचा आनंद घ्यायला हवा. तसेच मेणबत्ती स्वतः वितळून दुसऱ्याला प्रकाश देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे आपण स्वतः थोड्या प्रमाणात का होईना झिजून दुसऱ्यांचे जीवन चांगले करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. फक्त स्वतःबाबत विचार करता कामा नये, असे गौर गोपाल दास म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :spiritualअध्यात्मिक