शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

Gaur Gopal Das: सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य; गौर गोपालदास म्हणतात, जीवन आइस्क्रीमसारखं जगलं पाहिजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:22 IST

Gaur Gopal Das: सध्याच्या तरुणाईच्या मनःस्थितीचे योग्य वर्णन करताना गौर गोपाल दास यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या...

Gaur Gopal Das: आताच्या घडीला तरुण मंडळी सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. जीवनातील अगदी छोट्या छोट्या क्षणापासून ते महत्त्वाच्या बाबींपर्यंत अनेकविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, सोशल मीडिया तरुणाईसाठी घातक ठरू शकते, असे अनेक मतप्रवाह ऐकायला मिळतात. यातच मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य येत आहे, असे सांगत जीवन आइस्क्रीमप्रमाणे जगले पाहिजे, असे म्हटले आहे. 

जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना, देशातील तरुण पिढी दिवसेंदिवस अधिक हताश, निराश होताना दिसत आहे. हे सोशल मीडियामुळे होत आहे. सोशल मीडियामुळे आनंदही अनुभवता येऊ शकतो. मात्र, त्याचे माध्यम आणि प्रमाण योग्य असायला हवे. सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास प्रसन्नता, आनंद प्राप्त करता येऊ शकेल. अन्यथा सोशल मीडियाचे माध्यम एखाद्या शापापेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. 

दुसऱ्याच्या आयुष्यातून धडा घेऊन स्वतःचे आयुष्य घडवा

सोशल मीडियावर आपल्या पोस्टला किती लाइक्स मिळाले, किती जणांनी पोस्ट पाहिली तसेच दुसऱ्याच्या पोस्टचे लाइक्स, कमेंट्स यांमुळे तुलना वाढतेय. सोशल मीडियावर कधी कुणी आपले अपयश, कमतरता शेअर करत नाही. केवळ चांगल्या गोष्टीच शेअर केल्या जातात. यामुळे नकळतपणे होणारी तुलना ही एकतर्फी केली जाते. मी नेहमी सांगतो की, समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पाहायला हवे. त्यातून आपण कॉम्प्लेस न बाळगता, त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य कसे सुधारता येईल, ते कसे चांगले होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे गौर गोपाल दास यांनी नमूद केले. 

जीवन आइस्क्रीमसारखे जगले पाहिजे...

गौर गोपाल दास यांनी जीवन कसे असावे, याबाबत अगदी सोप्या शब्दांत सांगितले. त्यावेळी त्यांनी आइस्क्रीम आणि मेणबत्तीची समर्पक उदाहरणे दिली. जेव्हा आपण आइस्क्रीम खातो, त्यातून जीवनाचा धडा घेऊ शकतो. आइस्क्रीम वितळण्याआधी ते आपण संपवतो. तसेच जीवन झिजण्याआधी, वितळण्याआधी ते जगून घ्यायला हवे. जीवनाचा आनंद घ्यायला हवा. तसेच मेणबत्ती स्वतः वितळून दुसऱ्याला प्रकाश देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे आपण स्वतः थोड्या प्रमाणात का होईना झिजून दुसऱ्यांचे जीवन चांगले करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. फक्त स्वतःबाबत विचार करता कामा नये, असे गौर गोपाल दास म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :spiritualअध्यात्मिक