शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Ganga Saptami 2022 : यंदा गंगासप्तमी कधी आहे? त्यादिवशी पितृ तर्पणाला महत्त्व का दिले जाते? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 18:07 IST

Ganga Saptami 2022 : यंदा  ८ मे रोजी रविवारी गंगा सप्तमी आहे. ती कशी साजरी करावी आणि तिचे महत्त्व काय ते जाणून घेऊ. 

वैशाख शुक्ल सप्तमीला गंगा जन्हूच्या कानातून बाहेर पडली, म्हणून हा दिवस गंगासप्तमी नावाने साजरा केला जातो. यंदा  ८ मे रोजी रविवारी गंगा सप्तमी आहे. ती कशी साजरी करावी आणि तिचे महत्त्व काय ते जाणून घेऊ. 

त्यानिमित्ताने गंगेचे स्मरण व्हावे, हा त्यामागील शुद्ध भाव आहे. वास्तविक पाहता रोज स्नान करताना सप्तनद्यांचे स्मरण करावे, म्हणजे त्या नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य लाभते, नव्हे तर आंघोळ करत असलेल्या पाण्याला पवित्र नद्यांमधील पाण्याचे स्वरूप प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्यासाठी आपले पूर्वज अंघोळ करताना पुढील श्लोक आवर्जून म्हणत असत. 

गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु ||

असा सोपा श्लोक पाठ करून रोज म्हणावा आणि मुलांनाही शिकवावा. यातूनही कधी आपल्याकडून श्लोक म्हणायचा राहून गेला, तर त्याची आठवण व्हावी आणि पुनश्च सुरुवात व्हावी, म्हणून अशा तिथींचे आयोजन केले असावे. गंगासप्तमी ही तिथीदेखील त्यासाठीच आहे, असे समजून इथून पुढे आपल्या दिनचर्येत हा श्लोक अंतर्भूत करावा आणि पवित्र नद्यांचे नित्य स्मरण करून पुण्य पदरात पाडून घ्यावे. 

आजच्या तिथीला जन्हूने गंगा पिऊन टाकली होती. परंतु राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून मोठ्या प्रयत्नाने गंगेला भूलोकी आणले होते. भगीरथाच्या विनंतीवरून जन्हूने आपल्या उजव्या कानातून तिला बाहेर काढले होते, म्हणून तिला जान्हवी असेही नाव प्राप्त झाले आणि ती भूलोकावर प्रगट झाली. भगीरथाच्या या महत्प्रयासांना पाहून तेव्हापासून भगीरथ प्रयत्न हा शब्द रूढ झाला आहे. त्या घटनेचे स्मरण म्हणून गंगा सप्तमी साजरी केली जाते. ही तिथी गंगेची जन्मतिथी मानली जाते. 

आजच्या तिथीला गंगेची अथवा गंगेच्या मूर्तीची पूजा करायची असते. काही ठिकाणी आजच्या दिवशी गंगेच्या काठावर पितृतर्पणदेखील केले जाते. परंतु आपल्याजवळ गंगाकाठ नसेल किंवा गंगेची मूर्तीही नसेल, तर वर दिलेल्या श्लोकाचा पुनरुच्चार करून गंगेचे स्मरण करावे. आपल्या पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि गंगेप्रमाणे आपले चारित्र्य पवित्र राहावे, अशी गंगा मातेला मनोमन प्रार्थना करावी.