शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Ganesh festival 2022: बाप्पाच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण  झालो तर तो सगळ्या प्रकारची सुखं पदरात कशी टाकतो; त्याची ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:26 IST

Ganesh Utsav 2022: बाप्पाला सुखकर्ता दुःखहर्ता का म्हणतात, हे या छोट्याशा गोष्टीवरून पण सहज लक्षात येईल . 

एका गावात एक शिवमंदिर होते. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर-पार्वती आणि गाभाऱ्याबाहेरील सभागृहात गणपती बाप्पा. ते मंदिर एवढे सुरेख बांधले होते, की तिथल्या प्रसन्न वातावरणात देवदर्शनासाठी सदानकदा भक्तांची रिघ लागलेली असे. त्यामुळे साहजिकच भिकऱ्यांचीही संख्या जास्त असे. सर्व काही छान चालले होते. मात्र, मंदिराबाहेरील शेवटचा भिकारी नेहमी उपेक्षित राहत असे. त्याच्यापर्यंत दक्षिणा, दान पोहोचत नसे. 

पार्वती मातेला त्या एका भिकाऱ्याची दया आली. तिने महादेवांना विचारले, `तुम्ही सर्वांकडे कृपादृष्टीने पाहता, मग तो शेवटचा भिकारी उपेक्षित का? त्याच्या चरितार्थाची काहीतरी तजवीज करा ना.' 

महादेव म्हणाले, 'अगं, त्याच्या नशीबात जेवढे आहे, तेवढेच त्याला मिळणार. त्याच्या भाग्योदयाचा काळ आला, की त्याचीही भरभराट होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले-वाईट दिवस येत जात असतात.'

माता म्हणाली, 'तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही ठरवलं, तर आताही त्याचे दिवस पालटतील. घ्या ना मनावर.'

पार्वती मातेने हट्टच धरला म्हटल्यावर महादेवांचा नाईलाज झाला. त्यांनी बाहेर पाटावर बसलेल्या गणूला बोलावून घेतले. हाकेसरशी गणोबा हात जोडून हजर झाले. महादेव म्हणाले, 

'गणोबा, अवघ्या दीनांच्या नाथा, अशी तुझी ख्याती आहे. तुझ्या आईचा हट्ट आता तूच पुरव. मंदिराबाहेर बसलेला शेवटचा भिकारी लखपती व्हावा अशी तिची इच्छा आहे. उद्या तू ती पूर्ण कर.' बाप्पाने होकार दिला आणि लगेचच कामाला लागले. 

या त्रयींमधला संवाद दर्शनाला आलेल्या एका धनिकाच्या कानावर पडला. एक भिकारी रातोरात लखपती होणार कळल्यावर त्याने ताबडतोब भिकाऱ्याला गाठले आणि त्याच्याशी सौदा केला. `उद्या तुला मिळणारी सगळी भीक माझी. त्या मोबदल्यात मी तुला पाच हजार रुपए देतो.'

भिकारी पण वस्ताद. काही न करता पाच हजार मिळणार होते, ते निमूटपणे घ्यायचे सोडून त्याने धनिकाला अडवले आणि पाच ऐवजी पंचवीस हजार दिले, तर सौदा पक्का करतो म्हणाला. धनिकाने वीस हजारावर भिकाऱ्याची बोळवण केली. 

दुसऱ्या दिवशी धनिक, भिकाऱ्याच्या बाजूला फक्त कटोरा घेऊन बसायचा बाकी होता. एवढी त्याच्यावर पाळत ठेवून होता. भिकारी, वीस हजार मिळाल्याच्या आनंदात मनापासून देवाला आळवत होता. 

दिवस संपत आला, तरी कटोरीत शे-दीडशेच्या वर रक्कम गेली नाही. धनिकाने येऊन बाप्पाची भेट घेतली. म्हणाला, `बाप्पा, तुम्ही आई-बाबांना दिलेला शब्द विसरलात तर नाही ना? त्या भिकाऱ्याला लखपती करणार होतात, त्याचे काय झाले?'

एवढे शब्द कानावर पडताच, बाप्पाने सोंडेने धनिकाचे जोडलेले हात घट्ट धरले आणि बाप्पा म्हणाले, `मी दिलेला शब्द नेहमी पाळतो. तो भिकारी नक्की लखपती होणार. मी कुठून त्याला लखपती करणार? मी बुद्धीचा दाता आहे. परंतु, व्यवहारातही चोख आहे. काल रात्री मी तुम्हा दोघांच्या पाप-पुण्याचा हिशोब काढला आणि तुला वीस हजार रुपये देण्याची बुद्धी दिली. आता उर्वरित ऐंशी हजार रुपये ताबडतोब देऊ कर. तू गेल्या जन्मात त्याच्याकडून कर्ज घेतले होतेस. त्याची परतफेड करण्याची आज वेळ आली आहे. शब्द पूर्ण करणार असलास, तर हात सोडतो. 

धनिकाने घाबरून शब्द दिला आणि तासाभराच्या आत उर्वरित पैसे भिकाऱ्याला दिले. भिकारी एका रात्रीत लखपती झाला. म्हणून तर बाप्पाला म्हणतात ना,

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता,अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा।।

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती