शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

श्रीगणेश चतुर्थी: कलियुगात बाप्पा कोणता अवतार घेणार? गणेश पुराणात केलेय भाकित; वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 07:07 IST

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या कलियुगातील अवताराबाबत गणेश पुराणात काही उल्लेख आढळून येतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद मासारंभ झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, या दिवशी कोट्यवधी घरांत पार्थिव गणपती पूजन केले जाते. विशेष म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात मंगळवारी होत असल्यामुळे अतिशय विशेष मानला गेलेला अंगारक योग जुळून येत आहे. या शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. भाद्रपद चतुर्थी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा मिळतात. महादेव शिवशंकरांनी प्रथम जन्मोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. महादेव, श्रीविष्णू यांप्रमाणे गणेशाचेही अनेक अवतार झाले आहेत. कलियुगात कोणता अवतार बाप्पा घेणार आहे? गणपती कधी हा अवतार घेणार? नाव काय असणार? याबाबत गणेश पुराणात काही उल्लेख असल्याचे म्हटले जाते. 

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला, असेही सांगितले जाते.  (Lord Ganpati Bappa Kaliyug Avatar)

कलियुगात गणपती बाप्पा अवतार घेणार

भगवान विष्णूच्या कल्की अवताराबद्दल विष्णु पुराणात भाकित करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे गणेश पुराणात सांगितले आहे की, जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अत्याचार सर्वोच्च शिखरावर असतील, तेव्हा गणेश मनुष्य धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार घेतील. जेव्हा तपश्चर्या, यज्ञ आणि शुभ कर्मे करणे बंद होतील. वेळेवर पाऊस न पडल्याने लोक नदीकाठी शेती करू लागतील. जेव्हा लोक लोभामुळे एकमेकांना फसवायला मागेपुढे पाहणार नाहीत. लोभापोटी पैसा कमावण्याच्या नादात विद्वान आणि धार्मिक लोकांना लुबाडले जाईल. दुष्कृत्य करण्यांची हानी होणार नाही. बलवान लोक दुर्बलांना त्रास देत असतील तर या पृथ्वीवरून अन्याय नष्ट करण्यासाठी भगवान गणेशाचा नवा अवतार जन्म घेईल, असे गणेश पुराणात सांगितले असल्याचे म्हटले जाते. (Ganesh Puran Lord Ganesha Kaliyuga Avatar)

कलियुगात देवी-देवतांऐवजी आसुरी शक्तींची पूजा 

गणेश पुराणात असे सांगितले आहे की, कलियुगात अनेक लोक धर्माचा मार्ग सोडून अधर्माच्या मार्गावर जातील किंवा लोक आपली आसक्ती पूर्ण करण्यासाठी देवी-देवतांऐवजी आसुरी शक्तींची पूजा करू लागतील. सर्व दुष्कृत्ये दूर करण्यासाठी गणेशाचा कलियुग अवतार होईल. लोक आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा अपमान करू लागले तर अशा दुष्कृत्यांना दूर करण्यासाठी गणेशाला पृथ्वीवर येऊन अवतार घ्यावा लागेल, असे सांगितले जाते. 

गणेश अवताराचे नाव काय असेल?

कलियुगातील गणेशाच्या अवताराचे नाव ‘धूम्रकेतू’ असेल. कलियुगात समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लोकांना बुद्धी देण्यासाठी गणपती या अवतारात अवतरणार आहेत. असे भाकित गणेश पुराणात केल्याचे सांगितले जाते. - सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी