शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

श्रीगणेश चतुर्थी: कलियुगात बाप्पा कोणता अवतार घेणार? गणेश पुराणात केलेय भाकित; वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 07:07 IST

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या कलियुगातील अवताराबाबत गणेश पुराणात काही उल्लेख आढळून येतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद मासारंभ झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, या दिवशी कोट्यवधी घरांत पार्थिव गणपती पूजन केले जाते. विशेष म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात मंगळवारी होत असल्यामुळे अतिशय विशेष मानला गेलेला अंगारक योग जुळून येत आहे. या शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. भाद्रपद चतुर्थी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा मिळतात. महादेव शिवशंकरांनी प्रथम जन्मोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. महादेव, श्रीविष्णू यांप्रमाणे गणेशाचेही अनेक अवतार झाले आहेत. कलियुगात कोणता अवतार बाप्पा घेणार आहे? गणपती कधी हा अवतार घेणार? नाव काय असणार? याबाबत गणेश पुराणात काही उल्लेख असल्याचे म्हटले जाते. 

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला, असेही सांगितले जाते.  (Lord Ganpati Bappa Kaliyug Avatar)

कलियुगात गणपती बाप्पा अवतार घेणार

भगवान विष्णूच्या कल्की अवताराबद्दल विष्णु पुराणात भाकित करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे गणेश पुराणात सांगितले आहे की, जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अत्याचार सर्वोच्च शिखरावर असतील, तेव्हा गणेश मनुष्य धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार घेतील. जेव्हा तपश्चर्या, यज्ञ आणि शुभ कर्मे करणे बंद होतील. वेळेवर पाऊस न पडल्याने लोक नदीकाठी शेती करू लागतील. जेव्हा लोक लोभामुळे एकमेकांना फसवायला मागेपुढे पाहणार नाहीत. लोभापोटी पैसा कमावण्याच्या नादात विद्वान आणि धार्मिक लोकांना लुबाडले जाईल. दुष्कृत्य करण्यांची हानी होणार नाही. बलवान लोक दुर्बलांना त्रास देत असतील तर या पृथ्वीवरून अन्याय नष्ट करण्यासाठी भगवान गणेशाचा नवा अवतार जन्म घेईल, असे गणेश पुराणात सांगितले असल्याचे म्हटले जाते. (Ganesh Puran Lord Ganesha Kaliyuga Avatar)

कलियुगात देवी-देवतांऐवजी आसुरी शक्तींची पूजा 

गणेश पुराणात असे सांगितले आहे की, कलियुगात अनेक लोक धर्माचा मार्ग सोडून अधर्माच्या मार्गावर जातील किंवा लोक आपली आसक्ती पूर्ण करण्यासाठी देवी-देवतांऐवजी आसुरी शक्तींची पूजा करू लागतील. सर्व दुष्कृत्ये दूर करण्यासाठी गणेशाचा कलियुग अवतार होईल. लोक आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा अपमान करू लागले तर अशा दुष्कृत्यांना दूर करण्यासाठी गणेशाला पृथ्वीवर येऊन अवतार घ्यावा लागेल, असे सांगितले जाते. 

गणेश अवताराचे नाव काय असेल?

कलियुगातील गणेशाच्या अवताराचे नाव ‘धूम्रकेतू’ असेल. कलियुगात समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लोकांना बुद्धी देण्यासाठी गणपती या अवतारात अवतरणार आहेत. असे भाकित गणेश पुराणात केल्याचे सांगितले जाते. - सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी