शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाचा अवयव दुखावला जाणे हा अपशकुन नाही, पण आवर्जून घ्या 'ही' काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 15:43 IST

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाला आपण पाहुणचार घेण्यासाठी आपल्या घरी बोलावतो, पण आपल्यामुळे त्याला इजा झाली तर घाबरतो; म्हणून घाबरू नका, दिलेली माहिती वाचा!

गणेश मूर्ती ही बाळाला हाताळतो तेवढ्याच काळजीने हाताळणे अभिप्रेत असते. परंतु कधी कधी अनावधानाने पूजा करते वेळी, हार घालते वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी मूर्ती जागची हलवताना मूर्तीला धक्का लागतो आणि चुकून एखादा अवयव दुखावतो. अशावेळी घाबरून जाऊ नका. अशा प्रसंगाचा दूरदृष्टीने विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे आणि त्यावर उपायही सुचवला आहे. त्याबद्दल सविस्तर वाचा. 

गणेशमूर्तीच्या एखाद्या अवयवास इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण वास्तवदृष्टीने इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण वास्तवदृष्टीने विचार केला असता या अवास्तव भयाचे निरसन होते. त्यानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा व्रतसमाप्तीदिनी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर त्या मूर्तीचा अवयव दुखावल्यास या अवस्थांमध्ये देवत्व नसल्यामुळे यासंदर्भात विचार करण्याचे काहीच कारण नाही. याबाबत 'शास्त्र काय सांगते' या ग्रंथात दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया. 

प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पूजावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदमच विसर्जन करावे. गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखावल्यास मनात कोणताही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे. 

प्राणप्रतिष्ठा झाल्यावर महानैवेद्यातील महारतीनंतर गणेशमूर्तीस इजा पोचल्यास दोष येत नाही. कारण शास्त्रानुसार पार्थिवपूजेत मूर्तीमधील देवत्व त्यादिवशी आरतीपर्यंतच असते. त्यामुळे अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे. त्यावेली मन:शांतीसाठी देवासमोर तुपाचे निरांजन लावून 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा यथासांख्य जप करावा. 

गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी नाजूक मूर्तीला धक्का लागून ती दुखावल्यास मनात शंका कुशंका आणू नका, धर्मशास्त्राने सांगितलेले उपाय करा!

परंतु गणेशचतुर्थीदिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूजा करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास वा मूर्ती पूर्णतया भंग पाल्यास करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास या मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. 

मात्र अशा प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत घाबरून, धीर सोडून सैरभैर होऊ नये. कारण त्यामुळे विवेकबुद्धी क्षीण होऊन मानसिक दुर्बलता येऊ शकते. अशावेळी `ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा सहस्त्र जप करावा. तसेच 'विघ्न येऊ देऊ नकोस' अशी विघ्नहर्त्या गणेशाला प्रार्थना करावी म्हणजे मनातील सर्व शंका कुशंका दूर होतात. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी