शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

गुरूंमुळे जीवनात आनंदाची पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:34 IST

गुरूंमुळे आपल्या जीवनात आनंदाची पौर्णिमा साजरी होते.

गुरु पौर्णिमेला प्रपंच व परमार्थ या दोन्ही अंगाने जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. 

चंद्र जसा स्वयं प्रकाशीत नसतो पण सुर्याचा प्रकाश स्वत:च्या अंगावर घेतो व कले कलेने वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण प्रकाशीत होऊन सुर्याचा प्रकाश तो पृथ्वीला देतो.  

अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस हा आप आपल्या क्षेत्रात गुरूंकडून ज्ञान घेत घेत ते आत्मसात करत करत आपल्या आचरणातून तो इतरांना देत असतो. 

तेंव्हा तो त्या त्या क्षेत्रात परिपूर्ण होतो व ज्ञान रुपाने स्वयंप्रकाशीत होतो आणि गुरुंचे परिपूर्ण ज्ञान पूर्णपणे जसेच्या तसे तो इतरांना देतो तेव्हा होते ती गुरुपौर्णिमा. म्हणजेच गुरूंमुळे आपल्या जीवनात आनंदाची पौर्णिमा साजरी होते.

प्रथम प्रापंचिक अंगाने पाहू.

जन्म व मृत्यू यामधील प्रवास म्हणजे जीवन. हा प्रवास जर आनंदमय, सुखमय, यशस्वी व समृध्द करायचा असेल तर आपल्याला योग्य रस्ता दाखविणारा व त्या मार्गावर चालण्यास शिकविणारा योग्य मार्गदर्शक अर्थात गुरु मिळणे महत्त्वाचे असते.

गुरु दत्तात्रयांनी २४ गुरु केले. सदगुरु श्री वामनराव पै सांगतात की, जगातील प्रत्येक गोष्ट, वृक्ष, पक्षी, प्राणी, व्यक्ती ही आपला गुरु असते कारण ती आपल्याला काहीना काही शिकवितच असते. फक्त ते पहाण्याची व शिकण्याची दृष्टी आपल्याकडे हवी असते. 

आई, बाबा, नवरा, बायको, मुले, घरातली सर्व वडीलधारी मंडळी, आपली भावंडे म्हणजेच आपले कुटूंबिय व नातेवाईक हे संस्कार किंवा शिकवण देत असतात, त्या संस्कारातूनच कळत नकळत आपली जडणघडण होते व ते संस्कार आपल्या आचरणातून इतरांनाही दिसतात. म्हणूनच हे सर्वजण आपले गुरू असतात.

मित्र- मैत्रिणींची संगत व त्याचबरोबरच पुस्तक, टी. व्ही., मोबाईल, इंटरनेट यांचीही लाभलेली संगत आपल्यावर चांगले- वाईट संस्कार करतच असते व त्यातून आपले जीवन घडत व बिघडत असते व हेच संस्कार आपल्या आचरणातून इतरांनाही दिसत असतात म्हणून तेही आपले गुरूच असतात.

शाळा, कॉलेज मधील शिक्षक, नोकरी किंवा व्यवसायात आपले सहकारी, स्पर्धक, अधिकारी, कामगार, ग्राहक इ. आपल्याला काहीतरी शिकवतच असतात म्हणूनच हे सर्वजण खर्‍या अर्थाने आपले गुरूच असतात.

आपल्या कौटुंबिक व व्यावसायिक क्षेत्राबरोबर कला, विद्या, क्रिडा, अभिनय, संगीत, साहित्य, वक्तृत्व, व्यायाम, सामाजिक व राजकीय कार्य इ. अनेक व विविध क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीला गुरु करून त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून ते विशेष ज्ञान संपादन करावे लागते नंतर तीच कला किंवा विद्या आपल्यातून जगाला दिसू लागते.

खरतर जगातील प्रत्येक व्यक्ती कडून आपण काहीना काही शिकतच असतो म्हणून ती आपल्याला गुरूस्थानीच असते.उदा.- अगदी दारु पिणारा माणूस सुध्दा आपला गुरु असतो, कारण तो आपल्याला शिकवितो की, या दारुच्या व्यसनापायी माझ्या जीवनाची जी वाताहात झाली, ती तूला जर तुझ्या आयुष्यात करुन घ्यायची नसेल तर दारु पासून दूर रहा.

तसेच जगातील प्रत्येक वृक्ष, वेली, फुले, पाखरे, प्राणी आपल्याला काहीना काही शिकवतच असतात. उदा. मुंगी कडून चिकाटी, सदाफुली कडून सतत आनंद रहाणे, गुलाब कडून परिस्थती कितीही काटेरी असो आपण मात्र इतरांना सुगंधच द्यायचा.

निसर्गाकडूनही आपण सतत शिकतच असतो, त्यातूनच आपले जीवन बहरत व फुलत असते. म्हणूनच आपले जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध करणार्‍या या सर्व गुरुंच्या चरणाशी मनापासून नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा.

प्रापंचिक जीवनात जसे गुरूचे महत्त्व आहे तसेच पारमार्थिक अंगानेही सदगुरूंचे महत्त्व अनन्य साधारण आहे. म्हणूनच तर सर्व संत सदगुरूंची महती मुक्त कंठाने गायतात.

जाणतेने गुरू भजिजे...

गुरु (गुप्त+रुप) म्हणजेच जे आपल्या आत आहे ते आपले गुप्त रुप.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात..सर्व उपाधी माजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत।

भगवान कृष्ण सांगतात...ईश्वर सर्व भूतानाम। हृदयस्य अर्जुन तिष्ठती 

चैतन्य किंवा ईश्वर म्हणजेच आपले गुप्त रुप अर्थात गुरु. वास्तविक ह्या गुप्त रुपामुळेच आपल्याला जीवन प्रकाश मिळतो.

पण माणूस ' मी अमुक ' या अहंकाराच्या म्हणजेच 'मी पणा'च्या अधिष्ठानावर जीवन जगतो म्हणून आमवस्येचा चंद्र जसा असून ही दिसत नाही व काळोख होतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात दु:खाचा अंधार होतो.

म्हणून या आत्मसुर्याचा प्रकाश आपल्या शरीररुपी चंद्रातून जसाच्या तसा बाहेर पडतो त्यावेळी त्याचा आनंद समाजरूपी विश्वाला मिळायला लागतो.

हा आत्मसुर्याचा, चैतन्याचा म्हणजेच गुप्त रुपाचा प्रकाश कसा मिळवायचा ह्याचे ज्ञान जे देतात, त्यांनाच खरे सदगुरु म्हणतात. 

सदगुरूंनी दिलेले दिव्यज्ञान शिष्य आत्मसात करून आपल्या आचरणातून तो इतरांना देतो तेव्हा त्याचे ठिकाणी ज्ञान रुपाने मिळालेला प्रकाश, चंद्रा सारखा कले कले वाढत जातो व जीवनातील दु:खाचा अंधार कमी कमी होत जातो.

सदगुरुंचे दिव्य ज्ञान घेत घेत, कले कलेने वाढणार्‍या या शिष्याच्या ठिकाणी एक दिवस त्याचे गुप्तरुप प्रगट होऊन परीपूर्ण व स्वयंप्रकाशीत होते, हीच असते जीवनातील सार्थकता म्हणजेच गुरुपौर्णिमा.

ही गुरुपौर्णिमा साजरी करायची असेल तर सदगुरु शिवाय पर्याय नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, 

सदगुरु वाचोनी सापडेना सोय।धरावेते पाय आधी आधी॥

पण कोणालाही सदगुरू करून हा आध्यात्मिक प्रवास पुर्ण करता येत नाही. त्यासाठी सदगुरू ओळखायचे कसे? हेही जाणून घेणे गरजेचे आहे.१) ते निरपेक्ष असतात,२) ते आत्मज्ञानी असतात३) शिष्यांचा उध्दार करण्याची त्यांच्याजवळ तीव्र तळमळ असते.४) लोकांचा उध्दार करण्यासाठी ते सदैव आपला देह चंदनासारखा झिजवितात.५) दिव्यबोध व दिव्यसाधना शिकविण्याचे अतुल सामर्थ्य त्यांच्याजवळ असते.

असे "शाब्दे परेची निष्णात" सदगुरू आपल्याला लाभणे, ही आपली जन्मोजन्मीची पुण्याईच असते.

ज्या मार्गाने गेले असता सुखाचे दर्शन होते ते खरे मार्गदर्शन.                     -- सदगुरू श्री वामनराव पै.

असे सदगुरू गंडे-दोरे, उदी-भस्म, अंगारे-धुपारे देत नाहीत तर प्रपंचाच्या अंगाने शहाणपण व परमार्थाच्या अंगाने दिव्यज्ञान देतात. कर्मकांड नाही तर कर्मचांग करावयास शिकवितात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, गुरू तेथे ज्ञान। ज्ञानी आत्मदर्शन॥दर्शनी समाधान। आथी जैसे॥

त्यांच्या कृपेने आपला प्रपंच चांग होतो व परमार्थ सांग होतो. सदगुरू माणसातील माणूसपण जागे करून त्याला दिव्यत्वाकडे नेतात. "अधिकार तैसा करू उपदेश" या संतोक्ती प्रमाणे ते शिष्यांची पात्रता पाहून उपदेश करतातच पण त्याची पात्रता वाढविण्याचा प्रयत्नही करतात. 

आपणासारिखे करीती तात्काळ।नाही काळवेळ तयालागी॥लोह परीसाची न साहे उपमा । सदगुरू महिमा अगाधची॥

परीसाच्या संगाने लोहाचे सोने होते पण त्याचा परीस होत नाही. पण सदगुरू शिष्याला आपल्यासारखेच देव पदावर नेतात.

देव पहावया गेलो। तेथे देवची होऊन ठेलो॥

हा प्रवास केवळ सदगुरूंमुळेच शक्य आहे. म्हणून अशा सदगुरूंचे उतराई होणे कधीच शक्य नाही.

काय द्यावे त्याशी व्हावे उतराई। ठेविताई पायी जीव थोडा॥

त्यांनी दिलेले दिव्यज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधकाच्या ठिकाणी सदगुरुंप्रती कृतज्ञता व शरणागती हवी असते. हीच कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देणारा सण म्हणजेच गुरुपौर्णिमा.

खर्‍या अर्थाने हा दिवस म्हणजे गुरु-शिष्यांच्या नात्यातं एकमेकांशी कृतज्ञता प्रगट करणारा "कृतज्ञता दिन" च आहे.

- संतोष तोत्रेजीवन विद्या मिशन

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक