शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 14:57 IST

गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा.

सद्यस्थितीत स्वयंघोषित गुरुंची संख्या वाढत चालली आहे. त्याला कारण असतात, ते म्हणजे त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणारे भक्तगण. गुरु श्रद्धेला खतपाणी घालतात, अंधश्रद्धेला नाही. ते शिष्याचे चित्त स्थिर करतात, अस्थिर नाही. ते शिष्याला चिरंतन आनंदाची वाट दाखवतात, समस्येवर तात्पुरता उपाय देत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेण्यासाठी शिष्याची सद्सदविवेकबुद्धी शाबुत असायला हवी. गुरु ज्याप्रमाणे शिष्याची पारख करून घेतात, तशी शिष्यानेही डोळसपणे आपले गुरु निवडले पाहिजेत. चुकीचे गुरु भेटले, तर आयुष्य चुकीच्या वळणावर जाऊ शकते. म्हणून गुरुंशी विचारपूर्वक स्नेह जोडावा आणि मगच त्यांची आत्मियतेने सेवा करावी. ती सेवा कशास्वरूपाची असायला हवी, हे सांगत आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (पूर्वार्ध)

साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून! तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारणच नाही. नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलटा तोटा होतो. जे जे घडत असते, ते ते माझ्याच इच्छेने झाले, असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ति करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा.

माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतात, कुणी संपत्ती मागतात, कुणी रोग बरा होऊदे म्हणतात. म्हणजे माझी सेवा करायला तुम्ही येता, की तुमची सेवा करवून घ्यायला तुम्ही येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी देणार नाही असे ना, पण ते काढा घेण्याकरीता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. 

मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच, कारण ज्याला असे खरोखरच वाटत असेल, त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळले की, मला सर्व कळते आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले  एक झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दु:ख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल, तर ती नामस्मरणात आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. 

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)