शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 14:57 IST

गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा.

सद्यस्थितीत स्वयंघोषित गुरुंची संख्या वाढत चालली आहे. त्याला कारण असतात, ते म्हणजे त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणारे भक्तगण. गुरु श्रद्धेला खतपाणी घालतात, अंधश्रद्धेला नाही. ते शिष्याचे चित्त स्थिर करतात, अस्थिर नाही. ते शिष्याला चिरंतन आनंदाची वाट दाखवतात, समस्येवर तात्पुरता उपाय देत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेण्यासाठी शिष्याची सद्सदविवेकबुद्धी शाबुत असायला हवी. गुरु ज्याप्रमाणे शिष्याची पारख करून घेतात, तशी शिष्यानेही डोळसपणे आपले गुरु निवडले पाहिजेत. चुकीचे गुरु भेटले, तर आयुष्य चुकीच्या वळणावर जाऊ शकते. म्हणून गुरुंशी विचारपूर्वक स्नेह जोडावा आणि मगच त्यांची आत्मियतेने सेवा करावी. ती सेवा कशास्वरूपाची असायला हवी, हे सांगत आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (पूर्वार्ध)

साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून! तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारणच नाही. नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलटा तोटा होतो. जे जे घडत असते, ते ते माझ्याच इच्छेने झाले, असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ति करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा.

माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतात, कुणी संपत्ती मागतात, कुणी रोग बरा होऊदे म्हणतात. म्हणजे माझी सेवा करायला तुम्ही येता, की तुमची सेवा करवून घ्यायला तुम्ही येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी देणार नाही असे ना, पण ते काढा घेण्याकरीता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. 

मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच, कारण ज्याला असे खरोखरच वाटत असेल, त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळले की, मला सर्व कळते आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले  एक झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दु:ख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल, तर ती नामस्मरणात आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. 

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)