शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दत्तगुरुंच्या चोवीस गुरुंपैकी पहिला गुरु : पृथ्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:27 IST

रोज सकाळी उठल्यावर आपण, 'करागे वसते लक्ष्मी' या श्लोकाने सुरुवात करत, 'पादस्पर्शं क्षमस्वमे' म्हणत श्लोक पूर्ण करतो आणि मातृभूमीला ...

रोज सकाळी उठल्यावर आपण, 'करागे वसते लक्ष्मी' या श्लोकाने सुरुवात करत, 'पादस्पर्शं क्षमस्वमे' म्हणत श्लोक पूर्ण करतो आणि मातृभूमीला वंदन करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. हे वंदन का, कशासाठी? यात केवळ कृतज्ञता भाव आहे, की आणखीही काही? याच गोष्टींचा विचार करत दत्तगुरुंनी जे चोवीस गुरु केले, पैकी प्रथम स्थान पृथ्वीला दिले. चोवीस गुरुंचा सविस्तर परिचय देवदत्त परुळेकर देतात-

आता कोणत्या गुरुकडून कोणता गुण घेतला याचे वर्णन अवधुताने करायला सुरुवात केली. अवधुताचा पहिला गुरु कोणता, तर पृथ्वी!

परमार्थी मुख्य शांती, साधकांसी पाहिजे निश्चितीयालागी प्रथम गुरु क्षीती, निजशांतीलागूनि।

अवधूत म्हणतो, परमार्थामध्ये शांती मुख्य असल्यामुळे साधकाच्या अंगी ती निश्चितपणे असायला पाहिजे. शांतीसाठी अवधूताने पृथ्वीला गुरु केल. अंत:करण आवरणे म्हणजे शांती. बाह्य इंद्रिये आवरणे म्हणजे दांति आणि द्वंद्वे सहन करणे म्हणजे क्षांति होय. क्षांति शिकण्यासाठी क्षितीला म्हणजे धरतीला गुरु करावे. 

हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

अनेक प्रकारचे प्राणी माझी माझी म्हणत पृथ्वीवर हक्क दाखवतात. आपापल्या स्वभावानुसार अनेक प्रकारे तिचे तुकडे करत. परंतु आपले एकपण न मोडता ती नेहमी अखंड राहते. आणि सर्व जीवांचे भिन्नभिन्न व्यवहार व्यापार चालवते. आपणच सर्वत्र आत्मरूपाने सर्व प्राण्यांमध्ये व्यापून आहोत, हे अनुभवल्यामुळे योग्याला द्वंद्वाची बाधा होत नाही. येथे एका सुंदर हिंदी गीताच्या ओळी आठवतात-

मंदीर, मस्जिद, गिरीजाघरमें बाँट लिया भगवानको,धरती बाँटी, सागर बाँटे, मत बाँटो इन्सानको।

जिथे तुकडे आहेत, द्वंद्व आहे, तेथे परमार्थ नाही. खरा धर्म नाही हे प्रत्येक धर्माच्या उपासकाने लक्षात घेतले पाहिजे.  कोणी पूजा केली किंवा मलमूत्र करून गांजली तरी पृथ्वीला एकाचा हर्ष नाही वा दुसऱ्याचा विषाद नाही. आपल्या शांतीमुळे ती अगदी निश्चल राहते. अग्नी पेटवून पृथ्वी जाळली किंवा नांगर घालून फाळली, विंâवा लाथा मारून तोडली, झाडली तरी तो अपराध मनात न आणता ती प्राण्यांवर प्रसन्न होऊन नाना प्रकारच पिके पिकवून उदर भरण करते. तृप्त करते. अशा प्रकारच्या अभिनव शांतीसाठी पृथ्वीला गुरु करावे. 

माणगावचे श्रेष्ठ दत्तभक्त पू. टेंबे स्वामी म्हणजेच श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी श्री दत्तमहात्म्य या ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथातही दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंचे वर्णन स्वामींनी केले आहे. स्वामी धरणीमातेच्या तोंडून सांगतात-

सर्वथा मी मातेपरी, हे जीव पोरापरी,यांत काही केले तरी, म्या अंतरी न धरावे।