शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दत्तगुरुंच्या चोवीस गुरुंपैकी पहिला गुरु : पृथ्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:27 IST

रोज सकाळी उठल्यावर आपण, 'करागे वसते लक्ष्मी' या श्लोकाने सुरुवात करत, 'पादस्पर्शं क्षमस्वमे' म्हणत श्लोक पूर्ण करतो आणि मातृभूमीला ...

रोज सकाळी उठल्यावर आपण, 'करागे वसते लक्ष्मी' या श्लोकाने सुरुवात करत, 'पादस्पर्शं क्षमस्वमे' म्हणत श्लोक पूर्ण करतो आणि मातृभूमीला वंदन करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. हे वंदन का, कशासाठी? यात केवळ कृतज्ञता भाव आहे, की आणखीही काही? याच गोष्टींचा विचार करत दत्तगुरुंनी जे चोवीस गुरु केले, पैकी प्रथम स्थान पृथ्वीला दिले. चोवीस गुरुंचा सविस्तर परिचय देवदत्त परुळेकर देतात-

आता कोणत्या गुरुकडून कोणता गुण घेतला याचे वर्णन अवधुताने करायला सुरुवात केली. अवधुताचा पहिला गुरु कोणता, तर पृथ्वी!

परमार्थी मुख्य शांती, साधकांसी पाहिजे निश्चितीयालागी प्रथम गुरु क्षीती, निजशांतीलागूनि।

अवधूत म्हणतो, परमार्थामध्ये शांती मुख्य असल्यामुळे साधकाच्या अंगी ती निश्चितपणे असायला पाहिजे. शांतीसाठी अवधूताने पृथ्वीला गुरु केल. अंत:करण आवरणे म्हणजे शांती. बाह्य इंद्रिये आवरणे म्हणजे दांति आणि द्वंद्वे सहन करणे म्हणजे क्षांति होय. क्षांति शिकण्यासाठी क्षितीला म्हणजे धरतीला गुरु करावे. 

हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

अनेक प्रकारचे प्राणी माझी माझी म्हणत पृथ्वीवर हक्क दाखवतात. आपापल्या स्वभावानुसार अनेक प्रकारे तिचे तुकडे करत. परंतु आपले एकपण न मोडता ती नेहमी अखंड राहते. आणि सर्व जीवांचे भिन्नभिन्न व्यवहार व्यापार चालवते. आपणच सर्वत्र आत्मरूपाने सर्व प्राण्यांमध्ये व्यापून आहोत, हे अनुभवल्यामुळे योग्याला द्वंद्वाची बाधा होत नाही. येथे एका सुंदर हिंदी गीताच्या ओळी आठवतात-

मंदीर, मस्जिद, गिरीजाघरमें बाँट लिया भगवानको,धरती बाँटी, सागर बाँटे, मत बाँटो इन्सानको।

जिथे तुकडे आहेत, द्वंद्व आहे, तेथे परमार्थ नाही. खरा धर्म नाही हे प्रत्येक धर्माच्या उपासकाने लक्षात घेतले पाहिजे.  कोणी पूजा केली किंवा मलमूत्र करून गांजली तरी पृथ्वीला एकाचा हर्ष नाही वा दुसऱ्याचा विषाद नाही. आपल्या शांतीमुळे ती अगदी निश्चल राहते. अग्नी पेटवून पृथ्वी जाळली किंवा नांगर घालून फाळली, विंâवा लाथा मारून तोडली, झाडली तरी तो अपराध मनात न आणता ती प्राण्यांवर प्रसन्न होऊन नाना प्रकारच पिके पिकवून उदर भरण करते. तृप्त करते. अशा प्रकारच्या अभिनव शांतीसाठी पृथ्वीला गुरु करावे. 

माणगावचे श्रेष्ठ दत्तभक्त पू. टेंबे स्वामी म्हणजेच श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी श्री दत्तमहात्म्य या ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथातही दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंचे वर्णन स्वामींनी केले आहे. स्वामी धरणीमातेच्या तोंडून सांगतात-

सर्वथा मी मातेपरी, हे जीव पोरापरी,यांत काही केले तरी, म्या अंतरी न धरावे।