शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

चैत्र नवरात्रीत कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता फलाहार करणे आरोग्यदायी ठरेल, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:03 IST

गरिबांना महाग फळे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी सण वाराच्या निमित्ताने किंवा शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना फळांचे दान करावे. त्यांच्या सदिच्छांपेक्षा मोठे फळ कोणते...?

हिंदू धर्मात सण, उत्सव, परंपरा यांची सांगड ऋतुमानानुसार घातलेली दिसते. त्या त्या ऋतूत असलेल्या फळा-फुलांचा सण उत्सवात समावेश केला जातो. त्यामुळे स्वाभाविकच निसर्गाशी आपले नाते जोडले जाते. आजपासून चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. येत्या नऊ दिवसात आपण आपल्या राशीनुसार फलाहार केला, तर ते आपल्या प्रकृतीसाठी लाभदायक ठरू शकेल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. चला तर जाणून घेऊया, आपल्या राशीला कोणते फळ सेवन करणे उचित ठरेल ते...!

मेष, सिंह आणि धनु राशी अग्नी तत्त्वाच्या राशी मानल्या जातात. मुळात तापट वृत्तीच्या या राशींनी तिखट पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. तसेच सुका मेवा किंवा कलिंगड, द्राक्ष, पेठा अशी शीत प्रकृतीची फळे खाल्ली पाहिजेत. 

वृषभ, कन्या आणि मकर या राशी पृथ्वी तत्वांच्या राशी आहेत. या राशीच्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे व फलाहारावर भर दिला पाहिजे. अति गोड फळांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. 

मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी वायू तत्वाच्या आहेत. त्यांनी कडधान्याऐवजी पालेभाज्या, फळभाज्या यांवर भर दिला पाहिजे. तसेच बदलत्या ऋतूनुसार उपलद्ध होणाऱ्या फळांचा आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे. 

कर्क, वृश्चिक, मिन राशी जलतत्वाच्या निर्देशक आहेत. या राशींनी रसाळ फळे, सरबत, फळांचे रस यांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. फळांचे रस न काढता फळे चावून खाल्ली पाहिजेत. 

राशीनुसार दिलेले फळांचे सेवन केल्यास व्रत करताना शरीराला अपाय होत नाही. तसेच एरव्हीदेखील या गोष्टी लक्षात ठेवून आहार नियमन केले असता सुदृढ आरोग्य प्राप्त होते. फळ स्वतःसाठी जेवढे लाभदायक आहे तेवढे इतरांसाठीही लाभदायक असते. परंतु गरिबांना महाग फळे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी सण वाराच्या निमित्ताने किंवा शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना फळांचे दान करावे. त्यांच्या सदिच्छांपेक्षा मोठे फळ कोणते...?