शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

चैत्र नवरात्रीत कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता फलाहार करणे आरोग्यदायी ठरेल, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:03 IST

गरिबांना महाग फळे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी सण वाराच्या निमित्ताने किंवा शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना फळांचे दान करावे. त्यांच्या सदिच्छांपेक्षा मोठे फळ कोणते...?

हिंदू धर्मात सण, उत्सव, परंपरा यांची सांगड ऋतुमानानुसार घातलेली दिसते. त्या त्या ऋतूत असलेल्या फळा-फुलांचा सण उत्सवात समावेश केला जातो. त्यामुळे स्वाभाविकच निसर्गाशी आपले नाते जोडले जाते. आजपासून चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. येत्या नऊ दिवसात आपण आपल्या राशीनुसार फलाहार केला, तर ते आपल्या प्रकृतीसाठी लाभदायक ठरू शकेल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. चला तर जाणून घेऊया, आपल्या राशीला कोणते फळ सेवन करणे उचित ठरेल ते...!

मेष, सिंह आणि धनु राशी अग्नी तत्त्वाच्या राशी मानल्या जातात. मुळात तापट वृत्तीच्या या राशींनी तिखट पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. तसेच सुका मेवा किंवा कलिंगड, द्राक्ष, पेठा अशी शीत प्रकृतीची फळे खाल्ली पाहिजेत. 

वृषभ, कन्या आणि मकर या राशी पृथ्वी तत्वांच्या राशी आहेत. या राशीच्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे व फलाहारावर भर दिला पाहिजे. अति गोड फळांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. 

मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी वायू तत्वाच्या आहेत. त्यांनी कडधान्याऐवजी पालेभाज्या, फळभाज्या यांवर भर दिला पाहिजे. तसेच बदलत्या ऋतूनुसार उपलद्ध होणाऱ्या फळांचा आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे. 

कर्क, वृश्चिक, मिन राशी जलतत्वाच्या निर्देशक आहेत. या राशींनी रसाळ फळे, सरबत, फळांचे रस यांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. फळांचे रस न काढता फळे चावून खाल्ली पाहिजेत. 

राशीनुसार दिलेले फळांचे सेवन केल्यास व्रत करताना शरीराला अपाय होत नाही. तसेच एरव्हीदेखील या गोष्टी लक्षात ठेवून आहार नियमन केले असता सुदृढ आरोग्य प्राप्त होते. फळ स्वतःसाठी जेवढे लाभदायक आहे तेवढे इतरांसाठीही लाभदायक असते. परंतु गरिबांना महाग फळे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी सण वाराच्या निमित्ताने किंवा शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना फळांचे दान करावे. त्यांच्या सदिच्छांपेक्षा मोठे फळ कोणते...?