शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो व कशाने दूर होतो, जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:21 IST

सर्व सोयीने युक्त घरे बांधताना असणारे नियम, सिद्धांत सांगणारे शास्त्र म्हणजे वास्तूशास्त्र होय. आपल्या वास्तूतील दोष दूर करण्यासाठी त्याचा वापर जरूर करावा. 

घर घेताना शेजार पाजार, पाण्याची व्यवस्था, निसर्गसौंदर्य, वाहतुकीची सोय या सर्वांचा विचार केला जातो. पण जागेच्या गुणवत्तेसंबंधी विचार करताना वास्तुशास्त्र तज्ज्ञ आणि ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरतो. 

नदी श्रोतियों राजा दैवज्ञो न चिकित्सक:,तत्र वासो न कर्तव्य...

ज्या ठिकाणी नदी, जलाशय, विहीर, विद्वान, ज्योतिष, शासक, वैद्य नसतील अशा ठिकाणी राहू नये. अशा ठिकाणचा त्याग करावा. आजच्या भाषेत जिथे नगर रचना नसेल, नागरी सुविधा नसतील, नागरी योजना नसेल, अशा ठिकाणी वास्तू उभारून उपयोग नाही. 

दुष्ट भार्या शठम मित्रं भृत्यशोत्तर दायक:ससर्पे च गृहे वासो मृत्युदेव न संशय: 

दुष्ट पत्नी, मूर्ख मित्र, उलट उत्तर देणारा सेवक आणि साप ज्या घरात राहत असतील, त्या घरातल्या कुटुंब प्रमुखाचा कोणत्याही क्षणी मृत्यू निश्चित असतो. मृत्यू या शब्दाचा अर्थ संकट या अर्थी समजून घेऊया. त्यामुळे घराशी मानसिक अशांतता, त्रास, वाद यांचा जवळचा संबंध येतो. घरात शुभ, सुख समाधान लाभावे अशी इच्छा असेल तर वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराची दारे, त्यांच्या दिशा, इ गोष्टींचा विचार आणि त्यानुसार कृती केली असता संकटाचे प्राबल्य कमी होते आणि वास्तू त्या अरिष्ट गोष्टींना दूर ठेवते. 

भूमीवर वसवली जाणारी गावे, मंदिरे आणि सर्व सोयीने युक्त घरे बांधताना असणारे नियम, सिद्धांत सांगणारे शास्त्र म्हणजे वास्तूशास्त्र होय. आपल्या वास्तूतील दोष दूर करण्यासाठी त्याचा वापर जरूर करावा.