शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या तणाव युगात शरीर रोगमुक्त ठेवण्याचे उपाय कोणते, जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 20, 2021 11:01 IST

मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.

अवास्तव अपेक्षा आणि भरमसाठ महत्त्वाकांक्षा मनुष्याला असमाधानी बनवतात. हेच कारण अनेक प्रकारच्या व्याधींना आणि मानसिक अस्वस्थतेला खतपाणी घालते. महत्त्वाकांक्षा आणि इच्छा यांचा त्याग केला, तर चिंता आपोआप मिटेल. परंतु या दोन्ही गोष्टी इतक्या सहज शक्य नाहीत. म्हणून त्यांचा त्याग नाही, पण त्या आटोक्यात नक्कीच ठेवता येतील.

सुख वेगळे आणि सुविधा वेगळ्या! आपण दोन्ही शब्द एकत्र जोडतो. परंतु त्या दोहोंमधील फरक लक्षात घेतला पाहिजे. धनप्राप्ती ही सुविधा आहे, सुख नाही. ती तात्कालिक सोय आहे, कायमस्वरूपी सुखाचा मार्ग नाही. जी गोष्ट चिरंतन आनंद देऊ शकत नाही, त्याला सुख म्हणता येणार नाही. ती केवळ सुविधा असते.

चूका सगळ्यांकडून होतात. त्यापासून आपण किती काळ दूर पळणार? प्रयत्नांनी चूका कमी करता येतात, परंतु आयुष्य पूर्णपणे अचूक बनवता येणे कोणालाही शक्य नाही. मग त्या गोष्टींचा अट्टाहास का? आपण सगळेच जण परिपूर्ण आयुष्याचा ध्यास घेऊन जगत आहोत. परंतु कोणालाच हे माहित नाही,की आपले सुख नक्की कशात आहे? असे काय केले, की आपल्याला समाधान लाभेल? श्रीमंती हेच जर सुख असते, तर आज गर्भश्रीमंत लोक अमर असते. पण तसे होत नाही, त्यांनाही नानाविध व्याधींनी ग्रासले आहे. 

सुखाच्या अवास्तव कल्पनांमागे धावता धावता मन विविध प्रकारच्या काळजी, चिंता आणि भीतीने ग्रस्त होत चालले आहे. मन तणावाच्या ओझ्याने दबून गेलेले असते. आजाराचे मूळ मनोविकारात दडले आहे. भय, घृणा, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या हे षडरिपू आजाराला कारणीभूत आहेत. ते मनाची घुसमट करवतात आणि तीच घुसमट छोट्या मोठ्या आजारांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे रूप धारण करते. 

सतत चिंताग्रस्त असणारी व्यक्ती क्षयरोगाची शिकार होते. शिघ्रकोपी व्यक्ती हृदयविकाराची समस्या मागे लावून घेते. अन्नाचे अतिसेवन कोलेस्ट्रॉलला आमंत्रण देते, तर रागाच्या, नैराश्याच्या भरात केलेला अन्नत्याग थायरॉईड, कुपोषणाला कारणीभूत ठरते. याचाच अर्थ, मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.

आजचे युग तणावयुग झाले आह़े जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणानुसार १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. आपण आपला आनंद कुठे गमावून बसलो आहोत, याचे परीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात न देता स्वत:च्या खिशात ठेवण्याची कला आत्मसात केली, तर आजार कुठल्या कुठे पळून जातील!