शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

आजच्या तणाव युगात शरीर रोगमुक्त ठेवण्याचे उपाय कोणते, जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 20, 2021 11:01 IST

मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.

अवास्तव अपेक्षा आणि भरमसाठ महत्त्वाकांक्षा मनुष्याला असमाधानी बनवतात. हेच कारण अनेक प्रकारच्या व्याधींना आणि मानसिक अस्वस्थतेला खतपाणी घालते. महत्त्वाकांक्षा आणि इच्छा यांचा त्याग केला, तर चिंता आपोआप मिटेल. परंतु या दोन्ही गोष्टी इतक्या सहज शक्य नाहीत. म्हणून त्यांचा त्याग नाही, पण त्या आटोक्यात नक्कीच ठेवता येतील.

सुख वेगळे आणि सुविधा वेगळ्या! आपण दोन्ही शब्द एकत्र जोडतो. परंतु त्या दोहोंमधील फरक लक्षात घेतला पाहिजे. धनप्राप्ती ही सुविधा आहे, सुख नाही. ती तात्कालिक सोय आहे, कायमस्वरूपी सुखाचा मार्ग नाही. जी गोष्ट चिरंतन आनंद देऊ शकत नाही, त्याला सुख म्हणता येणार नाही. ती केवळ सुविधा असते.

चूका सगळ्यांकडून होतात. त्यापासून आपण किती काळ दूर पळणार? प्रयत्नांनी चूका कमी करता येतात, परंतु आयुष्य पूर्णपणे अचूक बनवता येणे कोणालाही शक्य नाही. मग त्या गोष्टींचा अट्टाहास का? आपण सगळेच जण परिपूर्ण आयुष्याचा ध्यास घेऊन जगत आहोत. परंतु कोणालाच हे माहित नाही,की आपले सुख नक्की कशात आहे? असे काय केले, की आपल्याला समाधान लाभेल? श्रीमंती हेच जर सुख असते, तर आज गर्भश्रीमंत लोक अमर असते. पण तसे होत नाही, त्यांनाही नानाविध व्याधींनी ग्रासले आहे. 

सुखाच्या अवास्तव कल्पनांमागे धावता धावता मन विविध प्रकारच्या काळजी, चिंता आणि भीतीने ग्रस्त होत चालले आहे. मन तणावाच्या ओझ्याने दबून गेलेले असते. आजाराचे मूळ मनोविकारात दडले आहे. भय, घृणा, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या हे षडरिपू आजाराला कारणीभूत आहेत. ते मनाची घुसमट करवतात आणि तीच घुसमट छोट्या मोठ्या आजारांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे रूप धारण करते. 

सतत चिंताग्रस्त असणारी व्यक्ती क्षयरोगाची शिकार होते. शिघ्रकोपी व्यक्ती हृदयविकाराची समस्या मागे लावून घेते. अन्नाचे अतिसेवन कोलेस्ट्रॉलला आमंत्रण देते, तर रागाच्या, नैराश्याच्या भरात केलेला अन्नत्याग थायरॉईड, कुपोषणाला कारणीभूत ठरते. याचाच अर्थ, मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.

आजचे युग तणावयुग झाले आह़े जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणानुसार १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. आपण आपला आनंद कुठे गमावून बसलो आहोत, याचे परीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात न देता स्वत:च्या खिशात ठेवण्याची कला आत्मसात केली, तर आजार कुठल्या कुठे पळून जातील!