शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जगन्नाथ मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कसा काय फडकतो, हे रहस्य जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:49 IST

ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे. हनुमंत दहा दिशांचे रक्षण करतात. तिथल्या पावन भूमीशी संबधित अनेक हनुमंत कथा सांगितल्या जातात.

श्री जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापित लाल ध्वज नेहमी नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. याचे वैज्ञानिक कारण अद्याप कळले नसले, तरी त्यामागे पौराणिक कथा नक्कीच आहे. एवढा भव्य दिव्य ध्वज कोणाचेही लक्ष वेधून घेतो आणि विशेषतः प्रवाहाविरुद्ध असलेली त्याची गती सर्वांसाठी औत्सुक्याचे कारण ठरते. हे असे का घडत असावे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पौरणिक कथा माहीत असणे गरजेचे आहे. ती कथा कोणती? चला पाहूया...

ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे. हनुमंत दहा दिशांचे रक्षण करतात. तिथल्या पावन भूमीशी संबधित अनेक हनुमंत कथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे समुद्राजवळील मंदिराच्या आत समुद्राचा आवाज थांबवणे. हा आवाज थांबविण्यासाठी झेंड्याची दिशा बदलली गेली, अशी या कथेची परस्पर जोड आहे. 

एकदा भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी महर्षी नारद पोहोचले. तिथे त्यांना हनुमंत भेटले.  ते म्हणाले की आता भगवान विश्रांती घेत आहेत, तुम्हाला थांबावे लागेल. नारद दाराबाहेर जाऊन थांबले. थोड्या वेळाने, जेव्हा त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले तेव्हा भगवान जगन्नाथ श्री लक्ष्मीसमवेत दुःखी बसले होते. त्यांनी परमेश्वराला दुःखाचे कारण विचारले तेव्हा जगन्नाथ म्हणाले, की समुद्राचा आवाज कुठे आराम करू देतो?

नारद बाहेर गेले आणि त्यांनी हनुमंताला भगवंताचे हे दुःख सांगितले. हनुमंत त्या आवाजाचा बंदोबस्त करण्यासाठी समुद्राला म्हणाले की, तू इथून निघून जा नाहीतर तू तुझा आवाज थांबव. तुझ्या आवाजामुळे माझे स्वामी विश्रांती घेऊ शकत नाही. हे ऐकून समुद्र देव प्रकट झाले आणि म्हणाले,' हे महावीर हनुमंता ! हा आवाज थांबविणे माझ्या आवाक्यात नाही. हा आवाज वा वाऱ्याच्या वेगामुळे येत आहे. वाऱ्याचा वेग जितका गतीने पुढे जाईल तितक्या वेगाने आवाजनिर्मिती होईल. वाऱ्याचा वेग वळवणे हे माझ्यापेक्षा तुमच्या हातात आहे. कारण मरुत अर्थात वारा हे तुमचे पिताश्री. तुम्ही त्यांना विनवणी करा . 

मग हनुमंतांनी त्यांचे वडील पवनदेव यांना बोलावले आणि सांगितले की तुम्ही मंदिराच्या दिशेने जाऊ नका. यावर पवन देव म्हणाले की मला हे शक्य नाही परंतु मंदिराच्या आवारात तू अशी वर्तुळनिर्मिती कर, जी वायुरहित असेल.'हे कळल्यावर हनुमंताने स्वतःच्या शरीराचे दोन भाग केले आणि ते वायुपेक्षा अधिक गतीने जगन्नाथ मंदिराच्या सभोवताली वर्तुळाकार फिरले. त्या मंडलामुळे वाऱ्याचा आवाज आत शिरू शकला नाही आणि जगन्नाथ स्वामी आराम करू शकले. 

म्हणून आजतागायत आपण समुद्राद्वारे (मंदिराच्या आतून) कोणताही आवाज मंदिराच्या सिंहद्वारात पहिल्या पायरीवर प्रवेश केल्यावर ऐकू शकत नाही. आपण (मंदिराच्या बाहेरून) एक पायरी ओलांडली तर आपण ते ऐकू शकता. हे संध्याकाळी स्पष्टपणे अनुभवता येते. त्याचप्रमाणे, मंदिराच्या बाहेर स्वर्गीय दरवाजा आहे, जिथे मोक्ष मिळविण्यासाठी मृतदेह जाळले जातात, परंतु जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडता तेव्हाच तुम्हाला मृतदेह जाळल्याचा वास येईल.

याच कारणामुळे मंदिर परिसरातील वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्याने मंदिराच्या कळसावरील ध्वज विरुद्ध दिशेने फडकत राहतो. ते आश्चर्य पाहण्यासाठी अनेक भाविक जगन्नाथाच्या यात्रेत गर्दी करतात.