शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अखेर मंदिराचे द्वार पुन्हा उघडणार आणि भक्त भगवंत भेटीचा सोहळा रंगणार, 'या' गाण्यासारखाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 17:01 IST

अनेकदा आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात तेव्हा मोजक्या काव्यपंक्तीदेखील आपल्या भावनांचे माध्यम बनतात. 

आषाढी कार्तिकीची वारी करताना वारकऱ्यांना जेवढा आनंद होतो ना, अगदी तसाच आनंद समस्त भाविकांना झाला आहे. कारण कोरोना महामारीच्या काळात सुरक्षा हेतूने बंद केलेली धार्मिक स्थळांची दारे ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा खुली होत आहेत. देव मंदिरात, अंतरात सामावलेला आहे, हे मान्य! परंतु त्याच्या दर्शनाने होणारा आनंद शब्दातून व्यक्त करायचा झाला, तर कवी जगदीश खेबुडकर लिखित भोळी भाबडी या चित्रपट गीताचा आपल्याला आधार घेता येईल. 

टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग,देवाजिच्या द्वारी आज, रंगला अभंग।।

काळानुकाळची वारीची परंपरा, कधी नव्हे ती यावर्षी खंडित झाली. परंतु, भक्तांच्या मनीचा भाव किंवा भगवंताप्रती असलेली ओढ यत्किंचितही कमी झाली नाही. मंदिराची दारे बंद असतानाही भाविक चंद्रभागेचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीवर मस्तक ठेवून समाधान मानत होती. आता, तर तोही अडसर दूर झाला आहे. पुन्हा एकदा आनंदाचा सुकाळू येईल आणि पंढरपुरच्या प्रांगणात टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा गजर होत विठुनामाने पंढरी दुमदुमून निघेल. त्याच भावावस्थेचे यथार्थ वर्णन खेबुडकरांनी प्रस्तुत काव्यात केले आहे. 

अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो.

दरबारी आले रंक आणि राव,सारे एकरूप नाही भेदभावगाउ नाचू सारे होऊनि नि:संग।

विठ्ठलनामात रंगुन गेलेला वारकरी मैलोनमैलाचे अंतर पायी कापत कधी पायरीचे तर कधी कळसाचे दर्शन घेऊन परत जातो. एरव्ही कोणी पायी चालत जा म्हटले, तर जवळचे अंतरही नकोसे होते, मात्र भगवन्नाम घेत वारीला निघालेली पावले कधीच थकत नाहीत, असा भाविकांचा अनुभव आहे. याचे वर्णन करताना खेबुडकर लिहितात, 

जनसेवेपायी काया झिजवावी,घाव सोसुनिया मने रिझवावी,ताल देऊनी हा बोलतो मृदंग

या ओळींवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य आठवते, त्यांनी आपल्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 

अमर होय वंशलता, निर्वंश जिचा देशा करिता,दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची ।

जी फुले खुडली गेल्यावर रामचरणी वाहिली जातात, ती धन्य होतात. त्याप्रमाणे ज्यांचा वंश देशकार्यासाठी निर्वंश होतो, त्यांचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित होऊन, त्यांच्यापश्चातही परिमळ दरवळत राहतो. खेबुडकरांनीदेखील हाच धागा पकडून जनसेवेपायी काया झिजवावी, असे म्हटले आहे आणि त्याचा दाखला देताना मृदंगाचे उदाहरण दिले आहे. 

ब्रह्मानंदी देह बुडुनिया जाई,एक एक खांब वारकरी होई,कैलासाचा नाथ झाला पांडुरंग।

हा ब्रह्मानंद वेगळाच आहे. तो सांगून कळणारा नाही, त्याची अनुभूती घ्यायची असते. पंढरपुराच्या कणाकणातून विठ्ठल नाम उमटते. हे सांगताना खेबुडकरांची काव्यप्रतिभा उच्चांक गाठते. ते मंदिराच्या खांबालाही वारकऱ्याचे रूप देतात आणि हा सोहळा स्वर्गसुखाचा आनंद देणारा आहे, म्हणून पंढरपुराला कैलासाची उपमा देत, पांडुरंगाला कैलासपती संबोधतात.