शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भय इथले संपत नाही, पण त्यावर मात नक्की करता येते; सांगत आहेत ओशो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 19:55 IST

भय जिंकायचा प्रयत्न नको. त्याला मारणेही नको. भयाला तुम्ही मारू शकत नाही. कारण त्याच्यात एक प्रकारची ऊर्जा असते आणि कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही.

भयाला मारता येत नाही. जिंकता येत नाही. केवळ समजून घेता येते. त्या जाणून घेण्यातूनच भयाचे रुपांतरण घडून येते. हे जाणणेच रुपांतरण घडवू शकते. अन्य काहीही नाही. तुम्ही भयाला जिंकू बघाल तर ते दडपले जाईल. आत खोल तुमच्या नेणीवेत दडून, रुजून राहील. त्याने कोणतीही समस्या सुटत नाही. उलटपक्षी गुंतागुंत वाढेल. जेव्हा भय उपजेल तेव्हा तुम्ही त्याला दडपून टाकाल. भय जिंगण्याचा हाच मार्ग तुम्हाला माहीत असतो. भयाला तुम्ही दडपू शकता. इतक्या खोलवर दडपून ठेवू शकता, की तुमच्या चेतनेतून ते नाहीसे होऊ शकते. तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही. ते खोल नेणीवेच्या तळघरात पडून राहील. पण ते आपले काम करत राहील. तेव्हाही ते तुमच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करत राहील. तुमचा ताबा घेईल. पण इतक्या अप्रत्यक्ष तऱ्हेने तुमचा ताबा घेईल की तुम्हाला पत्ताही लागणार नाही. म्हणजे धोका आणखीनच वाढला. शिवाय तो इतका अप्रत्यक्ष रुपात असेल की तुम्हाला कळणारही नाही.

म्हणून भय जिंकायचा प्रयत्न नको. त्याला मारणेही नको. भयाला तुम्ही मारू शकत नाही. कारण त्याच्यात एक प्रकारची ऊर्जा असते आणि कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. तुम्ही कधी लक्षपूर्वक जाणले आहे का? भीतीच्या क्षणी मनात ऊर्जा निर्माण होते. क्रोधाच्या वेळी जशी प्रचंड ऊर्जा निर्माण होते, तशीच ती भीतीच्या वेळी होते. एकाच ऊर्जेचे हे दोन पैलू आहेत. क्रोध आक्रमक आहे आणि भय अनाक्रमक आहे. भय ही क्रोधाची नकारात्मक अवस्था आहे आणि क्रोध भयाची साकारात्मक अवस्था आहे. तुम्हाला जेव्हा क्रोध येतो, तेव्हा किती ताकद येते. सारे शरीर ऊर्जेने भरून जाते. जेव्हा प्रचंड संताप आलेला असतो तेव्हा  तुम्ही मोठाले पाषाणखंड उचलून फेकून देऊ शकता. सर्वसामान्यपणे असे शिलाखंड तुम्ही हलवूही शकणार नाही. क्रोध आलेला असताना तिप्पट चौपट अधिक शक्ती तुमच्या अंगी संचारते. त्या वेळी तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्या एरवी साध्य होणे अशक्य असते. 

भय निर्माण झाल्यावर तुम्ही केवढ्या वेगाने धावता. ऑलिम्पिकच्या धावपटूला सुद्धा मत्सर वाटेल. भयाच्या वेळी ऊर्जा निर्माण होते. खरे तर भय ही ऊर्जाच आहे आणि ऊर्जा कधी नष्ट होत नाही. ती अविनाशी असते. ती फक्त रुपांतरित होत जाते. आपल्या अस्तित्त्वातील चिमूटभर ऊर्जासुद्धा नष्ट करता येत नाही. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा नाहीतर तुमच्या हातून मोठी चूक घडेल. कामात चुका होतील. या जगातल्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही नष्ट करू शकत नाही. केवळ त्याचे रूप बदलू शकता. छोट्याशा खड्याला तुम्ही नष्ट करू शकत नाही. इतकेच काय वाळूचा एक कणदेखील तुम्ही नष्ट करू शकत नाही. तो केवळ आपले रूप बदलेल. तुमच्या प्रयत्नांनी त्याच्या रंगरुपात बदल होईल. पण त्यचा विनाश घडून येणार नाही. पाण्याच्या एका थेंबालासुद्धा तुम्ही नष्ट करू शकत नाही. तो केवळ आपले रूप बदलेल, इतकेच! तुम्ही त्याचा बर्फ बनवू शकता. वाफ बनवू शकता. पण तो थेंब अस्तित्त्वात असेलच. कुठे ना कुठे तो राहिलच. या विश्वाच्या पसाऱ्यात त्याचे अस्तित्त्व असेलच. असेच तुम्ही भय नष्ट करू शकत नाही. युगायुगापासून माणूस असा व्यर्थ प्रयत्न करत आहे. 

भय, क्रोध, काम, लोभ आणि अशा किती एक गोष्टी त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सारे जग असा प्रयत्न करत आले आहे. काय परिणाम झाला? मनुष्यात खळबळ माजली. काहीही नष्ट झाले नाही. सगळे तसेच आहे. फक्त गोष्टींची गुंतागुंत झाली. काही नष्ट केले जाऊ शकत नाही. म्हणून भय काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, नष्ट न करता त्यावर मात करण्याच प्रयत्न करा.