शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही, पण त्यावर मात नक्की करता येते; सांगत आहेत ओशो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 19:55 IST

भय जिंकायचा प्रयत्न नको. त्याला मारणेही नको. भयाला तुम्ही मारू शकत नाही. कारण त्याच्यात एक प्रकारची ऊर्जा असते आणि कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही.

भयाला मारता येत नाही. जिंकता येत नाही. केवळ समजून घेता येते. त्या जाणून घेण्यातूनच भयाचे रुपांतरण घडून येते. हे जाणणेच रुपांतरण घडवू शकते. अन्य काहीही नाही. तुम्ही भयाला जिंकू बघाल तर ते दडपले जाईल. आत खोल तुमच्या नेणीवेत दडून, रुजून राहील. त्याने कोणतीही समस्या सुटत नाही. उलटपक्षी गुंतागुंत वाढेल. जेव्हा भय उपजेल तेव्हा तुम्ही त्याला दडपून टाकाल. भय जिंगण्याचा हाच मार्ग तुम्हाला माहीत असतो. भयाला तुम्ही दडपू शकता. इतक्या खोलवर दडपून ठेवू शकता, की तुमच्या चेतनेतून ते नाहीसे होऊ शकते. तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही. ते खोल नेणीवेच्या तळघरात पडून राहील. पण ते आपले काम करत राहील. तेव्हाही ते तुमच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करत राहील. तुमचा ताबा घेईल. पण इतक्या अप्रत्यक्ष तऱ्हेने तुमचा ताबा घेईल की तुम्हाला पत्ताही लागणार नाही. म्हणजे धोका आणखीनच वाढला. शिवाय तो इतका अप्रत्यक्ष रुपात असेल की तुम्हाला कळणारही नाही.

म्हणून भय जिंकायचा प्रयत्न नको. त्याला मारणेही नको. भयाला तुम्ही मारू शकत नाही. कारण त्याच्यात एक प्रकारची ऊर्जा असते आणि कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. तुम्ही कधी लक्षपूर्वक जाणले आहे का? भीतीच्या क्षणी मनात ऊर्जा निर्माण होते. क्रोधाच्या वेळी जशी प्रचंड ऊर्जा निर्माण होते, तशीच ती भीतीच्या वेळी होते. एकाच ऊर्जेचे हे दोन पैलू आहेत. क्रोध आक्रमक आहे आणि भय अनाक्रमक आहे. भय ही क्रोधाची नकारात्मक अवस्था आहे आणि क्रोध भयाची साकारात्मक अवस्था आहे. तुम्हाला जेव्हा क्रोध येतो, तेव्हा किती ताकद येते. सारे शरीर ऊर्जेने भरून जाते. जेव्हा प्रचंड संताप आलेला असतो तेव्हा  तुम्ही मोठाले पाषाणखंड उचलून फेकून देऊ शकता. सर्वसामान्यपणे असे शिलाखंड तुम्ही हलवूही शकणार नाही. क्रोध आलेला असताना तिप्पट चौपट अधिक शक्ती तुमच्या अंगी संचारते. त्या वेळी तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्या एरवी साध्य होणे अशक्य असते. 

भय निर्माण झाल्यावर तुम्ही केवढ्या वेगाने धावता. ऑलिम्पिकच्या धावपटूला सुद्धा मत्सर वाटेल. भयाच्या वेळी ऊर्जा निर्माण होते. खरे तर भय ही ऊर्जाच आहे आणि ऊर्जा कधी नष्ट होत नाही. ती अविनाशी असते. ती फक्त रुपांतरित होत जाते. आपल्या अस्तित्त्वातील चिमूटभर ऊर्जासुद्धा नष्ट करता येत नाही. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा नाहीतर तुमच्या हातून मोठी चूक घडेल. कामात चुका होतील. या जगातल्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही नष्ट करू शकत नाही. केवळ त्याचे रूप बदलू शकता. छोट्याशा खड्याला तुम्ही नष्ट करू शकत नाही. इतकेच काय वाळूचा एक कणदेखील तुम्ही नष्ट करू शकत नाही. तो केवळ आपले रूप बदलेल. तुमच्या प्रयत्नांनी त्याच्या रंगरुपात बदल होईल. पण त्यचा विनाश घडून येणार नाही. पाण्याच्या एका थेंबालासुद्धा तुम्ही नष्ट करू शकत नाही. तो केवळ आपले रूप बदलेल, इतकेच! तुम्ही त्याचा बर्फ बनवू शकता. वाफ बनवू शकता. पण तो थेंब अस्तित्त्वात असेलच. कुठे ना कुठे तो राहिलच. या विश्वाच्या पसाऱ्यात त्याचे अस्तित्त्व असेलच. असेच तुम्ही भय नष्ट करू शकत नाही. युगायुगापासून माणूस असा व्यर्थ प्रयत्न करत आहे. 

भय, क्रोध, काम, लोभ आणि अशा किती एक गोष्टी त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सारे जग असा प्रयत्न करत आले आहे. काय परिणाम झाला? मनुष्यात खळबळ माजली. काहीही नष्ट झाले नाही. सगळे तसेच आहे. फक्त गोष्टींची गुंतागुंत झाली. काही नष्ट केले जाऊ शकत नाही. म्हणून भय काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, नष्ट न करता त्यावर मात करण्याच प्रयत्न करा.