शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

डोळसांना ओळखता आला नाही, तो हिरा एका आंधळ्याने ओळखून दाखवला; वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 9, 2021 13:50 IST

प्रतिकूल परिस्थितीतही शांत, थंड आणि लखलखत राहता आले पाहिजे. तसे करणाऱ्या व्यक्तीलाच हिऱ्याची शान आणि हिऱ्याचा मान मिळतो. 

एका राजाचा दरबार भरला होता. प्रत्येक जण आपापली फिर्याद घेऊन राजासमोर येत होते. राजा त्यांच्या प्रश्नांचे निवारण करत होता. अशातच एक व्यापारी राजासमोर आला आणि भरदरबारात म्हणाला, 'राजा, माझ्याकडे दोन हिरे आहेत. त्यात एक खरा आहे आणि दुसरा खोटा. यातला खर हिरा, जर तुमच्या राज्यातल्या बुद्धीमान व्यक्तीने ओळखला, तर तो तुमच्या सरकारीतिजोरीत जमा होईल आणि हिरा ओळखता आला नाही, तर तुम्ही हिऱ्याची रक्कम मला देऊ कराल. मंजूर आहे?'

राजाने दरबारात नजर फिरवली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे कुतुहल पाहत आव्हान स्वीकारले. त्या व्यक्तीने दोन मंचकावर दोन हिरे ठेवले आणि राजाच्या अनुमतीने प्रत्येकाला परीक्षण करण्याची संधी दिली. काही जणांनी पुढाकार घेतला. हिऱ्याची पारख केली. परंतु असली-नकलीचा भेद त्यांना करता आला नाही. मंत्र्यांना घाम फुटला. हिरा ओळखता आला तर ठिक, नाहीतर हिऱ्याची रक्कम अदा करण्याचे खापर आपल्या डोक्यावर फुटायचे. या विचाराने त्यांनी माघार घेतली. 

कोणीच उत्तर देत नाही पाहून राजाने स्वत: परीक्षण करायचे ठरवले. तेवढ्यात त्याला सेवकांकडून निरोप आला. त्याच्याच राज्यातली एक अंध व्यक्ती हिरा ओळखून दाखवणार असे म्हणाली. राजाने त्या व्यक्तीला संधी द्यायची ठरवली. अंध व्यक्तीने राजाला अट घातली, हे परीक्षण मी दरबाराबाहेर खुल्या आसमंताखाली करू इच्छितो. हिऱ्याच्या व्यापाऱ्याने आणि राजाने दोघांनी अनुमती दिली.  

टळटळीत दुपार होती. परीक्षण करणारी व्यक्त अंध होती. तिच्यासाठी उजेड आणि अंधार दोन्ही समान असताना तिने हा हट्ट का केला असावे, याचा विचार राजाच्या मनात घोळत होता. दरबारबाहेर खुल्या प्रांगणात दोन मंचकावर दोन हिरे ठेवण्यात आले. काही वेळाने अंध व्यक्तीने हातात हिरा घेत म्हटले, 'हा आहे असली हिरा'. व्यापारी चक्रावला. जो भेद डोळस करू शकले नाही, तो अंध व्यक्तीने ओळखला. शब्द दिल्याप्रमाणे व्यापाऱ्याने तो हिरा राजाच्या हाती सुपूर्द केला. सर्वांना आनंद झाला. 

राजाने अंध व्यक्तीचा यथोचित सन्मान केला आणि हिऱ्याची पारख कशी केली, ते विचारले. अंध व्यक्ती म्हणाली, 'राजा, दरबारातल्या शांत शितल वातावरणात हिऱ्याची पारख करता आली नसती. उन्हात नेल्यामुळे सूर्यप्रकाशात काचेचा हिरा चटकन तापला परंतु खरा हिरा थंड राहिला. यावरून खऱ्या हिऱ्याची मी पारख केली.'

तात्पर्य, कठीण काळात जो तडकतो, ती काच असते आणि जो थंड राहून चकाकत राहतो, तो हिरा असतो. हिऱ्याकडून ही शिकवण घेण्यासारखी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शांत, थंड आणि लखलखत राहता आले पाहिजे. तसे करणाऱ्या व्यक्तीलाच हिऱ्याची शान आणि हिऱ्याचा मान मिळतो.