शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 10, 2020 18:26 IST

कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

ज्योत्स्ना गाडगीळ

कधी कधी कोणाच्या विश्वासावर विश्वास ठेवावा. नाही म्हणजे, हे काही शास्त्रात सांगितले नाही, पण मानसशास्त्रात नक्कीच सांगितले आहे. एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम नसतील आणि आपण 'हो' म्हटल्याने कोणाला दिलासा मिळत असेल, तर सूरात सूर मिसळायला काहीच हरकत नाही. 'असे काही नसते' म्हणत समोरच्याच्या भावना दुखावण्यापेक्षा 'मम' म्हणत एखाद्या गोष्टीला पुष्टी द्यावी. याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणे म्हणत नाहीत, तर मन राखणे असे म्हणतात. अशीच एक भोळी भाबडी समजूत,

डावा डोळा लवतोय, म्हणजे शुभवार्ता समजणार!

डोळा लवणे, याचे शास्त्रीय कारण अगदी क्षुल्लक आहे. कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

हेही वाचा: दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

मनुष्याला जगायला आशेचा एक किरण पुरेसा असतो. कधी न घडणारी गोष्ट अचानक घडू लागली, की आपण त्या कृतीमागचा अर्थ शोधू लागतो. त्यातही सोयीस्कर सकारात्मक अर्थ काढून मनाची समजूत घालणे, हा तर मनुष्यस्वभाव! डावा डोळा लवणे, या क्रियेचा संबंध शुभवार्तेशी लावून मनुष्य मोकळा झाला. पण, बिचाऱ्या  उजव्या डोळ्याची आपबिती ऐकून, तो पुरुषांसाठी शुभ ठरवला गेला. यात तथ्य किती हा भाग वेगळा, परंतु, चांगल्या विचारांनी काही चांगले घडावे, एवढाच त्यामागचा हेतू. 

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

कवयित्री शांता शेळकेसुद्धा लवणाऱ्या डाव्या डोळ्यामागील स्त्रीमन आपल्या काव्यातून रेखाटतात, 

माजो लवतोय डावा डोळा, जाई-जुईचो गजरो माळता,रतन अबोली केसात फुलता, काय शकुन गो सांगताय माका...!

काहीतरी छान घडणार, ही आशा माणसाला जगायला बळ देते. वाईट गोष्टी घडतच असतात, परंतु चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाट बघावी लागते. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणारे आपले मन शुभ शकुनांमुळे अधिक वेग घेते. आकाशाला हात लावू पहाते. याउलट, काही विपरित घडले, की आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

एकदा, एका लहान मुलाच्या धक्क्याने पाहुण्यांच्या घरी, परदेशातून आणलेली काचेची फुलदाणी फुटली. रंगात आलेल्या गप्पा-गोष्टींना खळ्ळ्खट्याक झाल्यामुळे एकाएक थांबल्या. टाचणीच्या आवाजानेही कानठळ्या बसतील, एवढी शांतता घरात पसरली. चुप्पी कोण तोडणार, सगळे याच विचारात होते. लहान मुलाला तर आज आपली कोणीही गय करणार नाही, हे चित्र स्पष्टच दिसत होते. त्यावेळी, त्या घरातल्या आजी पुढे सरसावल्या आणि मुलाला जवळ घेत त्यांनी म्हटले, 'तुझ्यामुळे घरावर येणारे मोठ्ठे अरिष्ट टळले.' आजींच्या एका वाक्याने वातावरणात सहजता आली. राग, द्वेष, नुकसान सर्व गोष्टींचा क्षणात निचरा झाला. आता, याला अंधश्रद्धा म्हणाल, की समजुतदारपणा? तीच बाब डाव्या डोळ्याची आहे. डोळ्याच्या लवण्याने कोणाचे भले होत असेल, तर होऊ द्या, त्यांच्यावर तुम्ही डोळे काढू नका. 

हेही वाचा: पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!