शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

डोळा लवतो ती खरंच शुभवार्तेची चाहूल असते?... काय आहे हे कनेक्शन?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 10, 2020 18:26 IST

कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

ज्योत्स्ना गाडगीळ

कधी कधी कोणाच्या विश्वासावर विश्वास ठेवावा. नाही म्हणजे, हे काही शास्त्रात सांगितले नाही, पण मानसशास्त्रात नक्कीच सांगितले आहे. एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम नसतील आणि आपण 'हो' म्हटल्याने कोणाला दिलासा मिळत असेल, तर सूरात सूर मिसळायला काहीच हरकत नाही. 'असे काही नसते' म्हणत समोरच्याच्या भावना दुखावण्यापेक्षा 'मम' म्हणत एखाद्या गोष्टीला पुष्टी द्यावी. याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणे म्हणत नाहीत, तर मन राखणे असे म्हणतात. अशीच एक भोळी भाबडी समजूत,

डावा डोळा लवतोय, म्हणजे शुभवार्ता समजणार!

डोळा लवणे, याचे शास्त्रीय कारण अगदी क्षुल्लक आहे. कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

हेही वाचा: दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

मनुष्याला जगायला आशेचा एक किरण पुरेसा असतो. कधी न घडणारी गोष्ट अचानक घडू लागली, की आपण त्या कृतीमागचा अर्थ शोधू लागतो. त्यातही सोयीस्कर सकारात्मक अर्थ काढून मनाची समजूत घालणे, हा तर मनुष्यस्वभाव! डावा डोळा लवणे, या क्रियेचा संबंध शुभवार्तेशी लावून मनुष्य मोकळा झाला. पण, बिचाऱ्या  उजव्या डोळ्याची आपबिती ऐकून, तो पुरुषांसाठी शुभ ठरवला गेला. यात तथ्य किती हा भाग वेगळा, परंतु, चांगल्या विचारांनी काही चांगले घडावे, एवढाच त्यामागचा हेतू. 

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

कवयित्री शांता शेळकेसुद्धा लवणाऱ्या डाव्या डोळ्यामागील स्त्रीमन आपल्या काव्यातून रेखाटतात, 

माजो लवतोय डावा डोळा, जाई-जुईचो गजरो माळता,रतन अबोली केसात फुलता, काय शकुन गो सांगताय माका...!

काहीतरी छान घडणार, ही आशा माणसाला जगायला बळ देते. वाईट गोष्टी घडतच असतात, परंतु चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाट बघावी लागते. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणारे आपले मन शुभ शकुनांमुळे अधिक वेग घेते. आकाशाला हात लावू पहाते. याउलट, काही विपरित घडले, की आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

एकदा, एका लहान मुलाच्या धक्क्याने पाहुण्यांच्या घरी, परदेशातून आणलेली काचेची फुलदाणी फुटली. रंगात आलेल्या गप्पा-गोष्टींना खळ्ळ्खट्याक झाल्यामुळे एकाएक थांबल्या. टाचणीच्या आवाजानेही कानठळ्या बसतील, एवढी शांतता घरात पसरली. चुप्पी कोण तोडणार, सगळे याच विचारात होते. लहान मुलाला तर आज आपली कोणीही गय करणार नाही, हे चित्र स्पष्टच दिसत होते. त्यावेळी, त्या घरातल्या आजी पुढे सरसावल्या आणि मुलाला जवळ घेत त्यांनी म्हटले, 'तुझ्यामुळे घरावर येणारे मोठ्ठे अरिष्ट टळले.' आजींच्या एका वाक्याने वातावरणात सहजता आली. राग, द्वेष, नुकसान सर्व गोष्टींचा क्षणात निचरा झाला. आता, याला अंधश्रद्धा म्हणाल, की समजुतदारपणा? तीच बाब डाव्या डोळ्याची आहे. डोळ्याच्या लवण्याने कोणाचे भले होत असेल, तर होऊ द्या, त्यांच्यावर तुम्ही डोळे काढू नका. 

हेही वाचा: पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!