शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खलनायक असतोच; त्याच्याशी हिरो बनून लढा कसा द्यायचा? सांगताहेत गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:16 IST

आपण आयुष्याचा सुपर हिरो व्हायचे असेल तर व्हिलनशी लढण्याचे कसब सुद्धा शिकून घेतले पाहिजे, जाणून घ्या कसे!

आपण कितीही चांगले वागलो तरी आपल्याला वाईटात पाहणारी, आपल्या कामाच्या मध्ये येणारी, आपल्याला नावे ठेवणारी माणसे सभोवताली असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्षही करतो. मात्र एखाद व्यक्ती अशीही असते, जिच्याबद्दल मनात तीव्र प्रमाणात द्वेष, संताप, नकारात्मक भावना असते. ती व्यक्ती समोर आली किंवा तिचा नुसता विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी आपण अस्वस्थ होतो. अशा खलनायकामुळे आपल्या आयुष्याची वाताहत होऊ न देता त्यांच्याशी संयमाने कसे वागायचे हे सांगताहेत गौर गोपाल दास. 

'विसरा आणि माफ करा' हे सुखी जीवनाचे सूत्र आहे. मात्र ते आचरणात आणणे महाकठीण! कारण, आपल्या बुद्धीला वाईट गोष्टींचे दीर्घकाळ स्मरण राहते. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही विसरू पाहता तेव्हा ती अधिक प्रखरतेने लक्षात राहते. म्हणून ती सोडून द्यायला शिका. उदाहरणार्थ, आपण हातात मोबाईल धरला, तर थोड्या वेळ काही वाटणार नाही, काही वेळाने हाताला मुंग्या येतील, दिवसभर धरून ठेवला तर हात जड होईल, दोन दिवस धरून ठेवला तर हाताला अर्धांग वायूचा झटका येईल. त्यापेक्षा तो थोडा वेळ हातात ठेवला आणि काम झाल्यावर बाजूला ठेवला तर यातना होणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल धरून ठेवतात त्रास मोबाईल ला नाही तर तुम्हाला होणार आहे. हीच बाब आयुष्यात आलेल्या त्या नकारात्मक व्यक्तींच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्यांच्या आठवणी दीर्घकाळ मनात उगाळत बसलात तर त्रास तुम्हाला होईल, त्यांना नाही!

ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये मेमरी फुल झाली की अनावश्यक गोष्टी आपण एका बटणासरशी डिलीट करतो, तशा आपल्या मनात साचलेल्या आठवणी एका बटणावरती डिलीट होणाऱ्या नाहीत. म्हणून त्या वेळोवेळी काढून टाकाव्या लागतील. जेणेकरून तुम्ही हँग होणार नाही. दुसऱ्यांवर रागावून, चिडून, वाट्टेल तसे बोलून मनस्ताप तुम्हाला होतो हे कायम लक्षात ठेवा, कृती करणाऱ्याला त्याचे सोहेरसुतक नसते. तो वागून मोकळा होतो, पण त्रास आपण काढतो. यासाठी अशा लोकांना माफ करा, दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्ती समजून त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. असे केल्याने तुमचे आयुष्य सोपे होईल, समाधानी होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकाल!