शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खलनायक असतोच; त्याच्याशी हिरो बनून लढा कसा द्यायचा? सांगताहेत गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:16 IST

आपण आयुष्याचा सुपर हिरो व्हायचे असेल तर व्हिलनशी लढण्याचे कसब सुद्धा शिकून घेतले पाहिजे, जाणून घ्या कसे!

आपण कितीही चांगले वागलो तरी आपल्याला वाईटात पाहणारी, आपल्या कामाच्या मध्ये येणारी, आपल्याला नावे ठेवणारी माणसे सभोवताली असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्षही करतो. मात्र एखाद व्यक्ती अशीही असते, जिच्याबद्दल मनात तीव्र प्रमाणात द्वेष, संताप, नकारात्मक भावना असते. ती व्यक्ती समोर आली किंवा तिचा नुसता विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी आपण अस्वस्थ होतो. अशा खलनायकामुळे आपल्या आयुष्याची वाताहत होऊ न देता त्यांच्याशी संयमाने कसे वागायचे हे सांगताहेत गौर गोपाल दास. 

'विसरा आणि माफ करा' हे सुखी जीवनाचे सूत्र आहे. मात्र ते आचरणात आणणे महाकठीण! कारण, आपल्या बुद्धीला वाईट गोष्टींचे दीर्घकाळ स्मरण राहते. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही विसरू पाहता तेव्हा ती अधिक प्रखरतेने लक्षात राहते. म्हणून ती सोडून द्यायला शिका. उदाहरणार्थ, आपण हातात मोबाईल धरला, तर थोड्या वेळ काही वाटणार नाही, काही वेळाने हाताला मुंग्या येतील, दिवसभर धरून ठेवला तर हात जड होईल, दोन दिवस धरून ठेवला तर हाताला अर्धांग वायूचा झटका येईल. त्यापेक्षा तो थोडा वेळ हातात ठेवला आणि काम झाल्यावर बाजूला ठेवला तर यातना होणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल धरून ठेवतात त्रास मोबाईल ला नाही तर तुम्हाला होणार आहे. हीच बाब आयुष्यात आलेल्या त्या नकारात्मक व्यक्तींच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्यांच्या आठवणी दीर्घकाळ मनात उगाळत बसलात तर त्रास तुम्हाला होईल, त्यांना नाही!

ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये मेमरी फुल झाली की अनावश्यक गोष्टी आपण एका बटणासरशी डिलीट करतो, तशा आपल्या मनात साचलेल्या आठवणी एका बटणावरती डिलीट होणाऱ्या नाहीत. म्हणून त्या वेळोवेळी काढून टाकाव्या लागतील. जेणेकरून तुम्ही हँग होणार नाही. दुसऱ्यांवर रागावून, चिडून, वाट्टेल तसे बोलून मनस्ताप तुम्हाला होतो हे कायम लक्षात ठेवा, कृती करणाऱ्याला त्याचे सोहेरसुतक नसते. तो वागून मोकळा होतो, पण त्रास आपण काढतो. यासाठी अशा लोकांना माफ करा, दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्ती समजून त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. असे केल्याने तुमचे आयुष्य सोपे होईल, समाधानी होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकाल!