शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खलनायक असतोच; त्याच्याशी हिरो बनून लढा कसा द्यायचा? सांगताहेत गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:16 IST

आपण आयुष्याचा सुपर हिरो व्हायचे असेल तर व्हिलनशी लढण्याचे कसब सुद्धा शिकून घेतले पाहिजे, जाणून घ्या कसे!

आपण कितीही चांगले वागलो तरी आपल्याला वाईटात पाहणारी, आपल्या कामाच्या मध्ये येणारी, आपल्याला नावे ठेवणारी माणसे सभोवताली असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्षही करतो. मात्र एखाद व्यक्ती अशीही असते, जिच्याबद्दल मनात तीव्र प्रमाणात द्वेष, संताप, नकारात्मक भावना असते. ती व्यक्ती समोर आली किंवा तिचा नुसता विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी आपण अस्वस्थ होतो. अशा खलनायकामुळे आपल्या आयुष्याची वाताहत होऊ न देता त्यांच्याशी संयमाने कसे वागायचे हे सांगताहेत गौर गोपाल दास. 

'विसरा आणि माफ करा' हे सुखी जीवनाचे सूत्र आहे. मात्र ते आचरणात आणणे महाकठीण! कारण, आपल्या बुद्धीला वाईट गोष्टींचे दीर्घकाळ स्मरण राहते. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही विसरू पाहता तेव्हा ती अधिक प्रखरतेने लक्षात राहते. म्हणून ती सोडून द्यायला शिका. उदाहरणार्थ, आपण हातात मोबाईल धरला, तर थोड्या वेळ काही वाटणार नाही, काही वेळाने हाताला मुंग्या येतील, दिवसभर धरून ठेवला तर हात जड होईल, दोन दिवस धरून ठेवला तर हाताला अर्धांग वायूचा झटका येईल. त्यापेक्षा तो थोडा वेळ हातात ठेवला आणि काम झाल्यावर बाजूला ठेवला तर यातना होणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल धरून ठेवतात त्रास मोबाईल ला नाही तर तुम्हाला होणार आहे. हीच बाब आयुष्यात आलेल्या त्या नकारात्मक व्यक्तींच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्यांच्या आठवणी दीर्घकाळ मनात उगाळत बसलात तर त्रास तुम्हाला होईल, त्यांना नाही!

ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये मेमरी फुल झाली की अनावश्यक गोष्टी आपण एका बटणासरशी डिलीट करतो, तशा आपल्या मनात साचलेल्या आठवणी एका बटणावरती डिलीट होणाऱ्या नाहीत. म्हणून त्या वेळोवेळी काढून टाकाव्या लागतील. जेणेकरून तुम्ही हँग होणार नाही. दुसऱ्यांवर रागावून, चिडून, वाट्टेल तसे बोलून मनस्ताप तुम्हाला होतो हे कायम लक्षात ठेवा, कृती करणाऱ्याला त्याचे सोहेरसुतक नसते. तो वागून मोकळा होतो, पण त्रास आपण काढतो. यासाठी अशा लोकांना माफ करा, दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्ती समजून त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. असे केल्याने तुमचे आयुष्य सोपे होईल, समाधानी होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकाल!