शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

आजही अनेक मराठी घरात बायका कोहळा चिरत नाहीत; कुष्मांड नवमीनिमित्त जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:35 IST

२ नोव्हेंबर रोजी कुष्मांड नवमी आहे, यादिवशी कोहळ्याचे दान केले जाते, या विधीशी संबंधित एक लोकसमजूत जाणून घ्या!

कार्तिक शुक्ल नवमीला 'कुष्मांड नवमी' म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच या तिथीला कोहळ्याचे दान करण्याला महत्त्व आहे. १२ नोव्हेंबर रोजी कुष्मांड नवमी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या व्रताविषयी! 

या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे. सद्यस्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले, तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे. तूपात बुडवून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगवेगळे देणे अधिक योग्य ठरेल. कोहळेपाक किंवा पेठासुद्धा भेट म्हणून देता येईल. हे दान देताना जो मंत्र म्हणतात, त्याचा अथर असा आहे, 'हे विष्णो, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे.' या भावनेनेच हा कोहळा दान करावा.

या व्रताशी निगडित अशी कथा स्कंदपुराणात सांगितली आहे-

द्वापर युगात सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान विष्णूंनी वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेली उत्पन्न झाल्या. त्यांना फळे लगडलेली होती. ते कोहळे होते. हे कोहळे भगवान विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले. म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी मग कोहळ्याचे दान द्यावे.

कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुषमंडळींकडून पहिला घाव घालून घेतात. यज्ञातही पशूबळीऐवजी कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच भोजनातही वापर व्हावा यादृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला गेला असावा.