शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

नेपोलियनसारखा महान सम्राट तोही उतारवयात दुःखी झाला; कशामुळे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 4:43 PM

नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला ...

नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला म्हणावयास हरकत नाही. आणि असे बेपर्वाईचे खोटे, सुखी जीवन जगण्यासाठी अनेकदा अनेकांशी शुष्क वाद-विवाद करण्यासाठी तो मागे पुढे पाहत नसे. 

उतारवय लागले आणि या भ्रामक गोष्टींच्या मागे लागून वेड्यासारखी सगळी शक्ती कुठेतरी वापरली याची त्याला जाणीव आणि पश्चात्ताप झाला. मन:शांती बिघडून गेली. स्वाभाविकच अंतर्मुखता आली. या अंतर्मुखतेमधून अध्यात्मिक ग्रंथवाचन सुरू झाले. परिणामी स्वत:चा वेडेपणा अधिकाधिक लक्षात येऊ लागला. बुद्धिमान अशा या माणसाला, शाश्वत समाधान मिळवण्याच्या मार्गी लागलो असतो, प्रयत्न केले असते तर, आंतरिक समाधान मिळाले असते, असे वाटू लागले. 

म्हणजेच शाश्वत समाधानासाठी कामधेनू स्वत:जवळ असताना तीसुद्धा आपणच भिकाऱ्यासारखे अशाश्वत सुख मिळवण्यासाठी दृष्यवस्तू, माणसे यांच्या दारी अशाश्वत सुखाचे ताक मागत फिरलो, याची खंत वाटली. परंतु आता फार उशीर झाला होता. असेच काहीसे आपल्या बाबतीतही घडते. 

अशा वेळी समर्थ रामदास स्वामींच्या ओळी आठवतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे,हरीबोध सांडूनि वीवाद लागे,करी सार चिंतामणी कांचखडे,तया मागता देत आहे उदंडे। स्वत:मधील चैतन्याची जाणीव करून न घेतल्यामुळे आयुष्यात बहुतेक लोकांना बाह्यसुखाचे नसलेले ऐश्वर्य वाटणारे दारिद्रय भोगावे लागते. यासाठीच संत सांगतात, प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या. आज काम उद्या आराम याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. म्हणून आज आराम करून घ्या असेही योग्य नाही. वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा समतोल राखला तर पश्चात्तापाचे क्षण वाट्याला येणार नाहीत.